शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

१६५ खलाशी पाकमध्ये भोगताहेत नरकयातना, मच्छीमारांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारकडे केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 09:36 IST

Palghar: पाकिस्तानी कारागृहात मागील चार वर्षांपासून शिक्षा पूर्ण झालेले १४ भारतीय खलाशी, तर तीन वर्षांपासून १५१ खलाशी असे एकूण १६५ खलाशी आजही नरकयातना भोगत आहेत. मायभूमीत परतण्यासाठी ते व्याकूळ झाले आहेत.

पालघर : ओखा, पोरबंदर येथील बंदरातून समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या पालघर जिल्ह्यातील अनेक आदिवासी मच्छीमारांना पाकिस्तानी सैन्याने तुरुंगात डांबले आहे. अनेक मच्छीमारांनी तुरुंगातील शिक्षा भोगूनही त्यांची सुटका केली जात नाही. पाकिस्तानी कारागृहात मागील चार वर्षांपासून शिक्षा पूर्ण झालेले १४ भारतीय खलाशी, तर तीन वर्षांपासून १५१ खलाशी असे एकूण १६५ खलाशी आजही नरकयातना भोगत आहेत. मायभूमीत परतण्यासाठी ते व्याकूळ झाले आहेत.

मच्छीमारांनी तुरुंगातील शिक्षा भोगूनही त्यांची सुटका केली जात नसल्याने  त्यांच्या सुटकेचे प्रयत्न करावेत, यासाठी आमदार सुनील भुसारा यांनी पालघरमध्ये आलेल्या केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक आणि कपिल पाटील यांना निवेदन देऊन मागणी केली आहे. पाकिस्तानी कारागृहात मागील पाच वर्षांपासून शिक्षा पूर्ण झालेले ६५४ भारतीय मच्छीमार असून, त्यातील ६३१ मच्छीमारांची शिक्षा पूर्ण झाली आहे. दरम्यान, भारताच्या तुरुंगात असलेल्या एकूण ९५ पाकिस्तानी कैद्यांपैकी १२ कैद्यांची सुटका केल्याची माहिती इंडिया पाकिस्तान पीपल्स फोरम फोर पीस अँड डेमॉक्रॅसी या संस्थेचे माजी सचिव जतिन देसाई यांनी ‘लोकमत’ला दिली.

जिल्ह्यातील मच्छीमारांच्या सुटकेसाठी विक्रमगडचे आमदार भुसारा यांनी अलीकडेच केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन त्यांच्या सुटकेसाठी युद्धपातळीवरून  प्रयत्न करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती. शनिवारी पालघर येथे एका कार्यक्रमात आलेल्या केंद्रीय पर्यटनमंत्री श्रीपाद नाईक आणि पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांचीही त्यांनी भेट घेतली.

जास्त पगारामुळे जातात गुजरातमध्येn पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू, तलासरी या तालुक्यांतील शेकडो मच्छीमार व आदिवासी खलाशी कामगार पालघरच्या किनारपट्टीवरील बोट मालकाकडून मिळणाऱ्या पगारापेक्षा जास्त पगार मिळत असल्याने गुजरात राज्यातील पोरबंदर, ओखा येथील बोटमालकांकडे कामासाठी जातात.n समुद्रात मासेमारीला जाताना प्रवाहाचा वेग आणि माशांच्या कळपाचा मागोवा घेत अनेक मच्छीमारांवर पाकिस्तानी क्षेत्रात प्रवेश केल्याचा ठपका ठेवला जातो. पाकिस्तानी सैनिकांकडून अटक केली जाते. त्यांना अटक केल्यानंतर त्यांची तुरुंगातील शिक्षा पूर्ण केल्यानंतरही त्यांची सुटका करण्यात केंद्रातील सरकारला अपयश येते. n आज शेकडो मच्छीमार पाकिस्तानी कैदेत खितपत पडून असल्याने त्यांचे कुटुंबीय संकटात सापडले आहेत. त्यांच्या कुटुंबाची होणारी दैनावस्था आमदार भुसारा यांच्यासमोर त्या कुटुंबातील सदस्यांनी मांडल्यानंतर त्यांनी या प्रकरणात जातीने लक्ष देऊन हा मुद्दा उचलून धरला आहे.

टॅग्स :palgharपालघरfishermanमच्छीमार