शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
3
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
4
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
5
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
6
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
7
रतन टाटांच्या आवडत्या कंपनीला मोठा धक्का? मार्केट कॅप २००९ नंतर पहिल्यांदाच नीचांकी पातळीवर
8
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
9
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
10
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या
11
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
12
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
13
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
14
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!
15
UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, प्रयागराजची शक्ती दुबे पहिल्या स्थानी
16
९ दिवसांत ३ शहरं! "व्हायरल झालो, आमच्याच बातम्या सर्वत्र"; जावयासह पळून गेलेली सासू म्हणाली...
17
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
18
१००-२०० नाही तर ट्रम्प यांनी थेट ३५२१% लावलं टॅरिफ, पण भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर बनले रॉकेट
19
छत्रपती संभाजीनगरात खंडपीठाला बॉम्बने उडवण्याची धमकी; कोर्टात शोध मोहीम, पोलिस अलर्ट
20
'पाच दिवसांत व्हिडीओ काढून टाका...', दिल्ली उच्च न्यायालयाचा रामदेव बाबांना दणका

राज्यातील 16 हजार उमेदवार अनुकंपा नियुक्तीच्या प्रतीक्षेत; नोकरीचे वयही गेले निघून

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 09:52 IST

१३ वर्षांपासून भरती थंडावली , स्थानिक संस्थांतील प्रतीक्षा यादी पोहोचली ५० हजारांवर

- विलास गावंडेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अनुकंपा उमेदवारांच्या नियुक्तीचे प्रमाण अतिशय नगण्य असल्याने प्रतीक्षा यादी वाढत चालली आहे. राज्य शासनाच्या कार्यालयातील १६ हजारांहून अधिक उमेदवारांना या योजनेंतर्गत नियुक्तीची प्रतीक्षा आहे. अनेक उमेदवारांचे तर नोकरीचे वयही निघून गेले आहे. जिल्हा परिषद, पालिका व इतर विभागांची अनुकंपा उमेदवार प्रतीक्षा यादी तब्बल ५० हजारांवर असल्याचे सांगण्यात येते. 

शासकीय सेवेत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तिला अनुकंपा तत्त्वावर नोकरी दिली जाते. वर्ग तीन आणि चार श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या वारसांना याचा लाभ मिळतो. मात्र, मागील १३ वर्षांपासून अनुकंपा नियुक्तीचे घोडे लंगडे झाले आहे. थेट नियुक्ती आदेशाची पद्धत बंद होऊन प्रतीक्षा यादी सुरू झाली.राज्य शासकीय कार्यालयात पदभरती निघाल्यास त्यातील दोन टक्के पदे अनुकंपा प्रतीक्षा यादीतून भरली जात होती. अर्थात, ५० टक्के जागा असल्यास त्यात अनुकंपाची केवळ एक जागा ठेवली जात होती. पुढे पाच, नंतर दहा आणि आता २० टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. अनुकंपा उमेदवाराला नोकरीसाठीची वयोमर्यादा ४५ आहे. घरातील कर्ता पुरुष निघून गेल्याने कुटुंबाची वाताहत होते. सरकारी घर त्यांना तीन महिन्यात सोडावे लागते. कुटुंब निवृत्ती वेतनात शिक्षण, घरखर्च भागत नाही. कार्यप्रसंग, आरोग्याचा प्रश्न सोडविताना आर्थिक समस्या उभ्या ठाकतात. आता तर २००५ नंतर शासकीय सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शनही मिळत नाही. त्यामुळे अनुकंपा नियुक्त्या तातडीने मिळाव्यात, अशी अपेक्षा प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना आहे. 

    २० टक्केची मुदत डिसेंबरपर्यंतn पदभरतीत २० टक्के जागा अनुकंपा उमेदवारांमधूनच घ्याव्यात, या सवलतीची मुदतही ३१ डिसेंबर २०२१ला संपणार आहे. n याला मुदतवाढ दिली जाते की, मर्यादा दहा टक्क्यांवर आणली जाते, याकडे प्रतीक्षा यादीतील उमेदवारांचे लक्ष लागले आहे. n राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये अडीच लाखांहून अधिक जागा रिक्त आहेत. असे असतानाही अनुकंपा उमेदवारांना ताटकळत का ठेवले जाते, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

खास बाब म्हणून नियुक्त्या कराव्याअनुकंपाच्या सर्व १०० टक्के उमेदवारांना नियुक्ती देण्यात यावी. २० ते २५ वर्षे सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना वाऱ्यावर सोडू नये, अशी मागणी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने शासनाकडे लावून धरला आहे.      - अविनाश दौंड,     कार्यालय सचिव, राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटना

टॅग्स :government jobs updateसरकारी नोकरी