शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मुंबईत सहा महिन्यांत स्वाइनचे १६ बळी

By admin | Updated: June 24, 2017 04:21 IST

यंदा स्वाईन फ्लूचा प्रार्दुभाव अधिक वाढत असल्याचे दिसून आले आहे. जानेवारी ते २२ जून २०१७ पर्यंत मुंबई शहर-उपनगरात स्वाईन फ्लूमुळे एकूण १६ मृत्यू ओढावले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : यंदा स्वाईन फ्लूचा प्रार्दुभाव अधिक वाढत असल्याचे दिसून आले आहे. जानेवारी ते २२ जून २०१७ पर्यंत मुंबई शहर-उपनगरात स्वाईन फ्लूमुळे एकूण १६ मृत्यू ओढावले आहेत. त्यातील ६ रुग्ण मुंबई बाहेरील होते. तसेच, १३ ते २२ जून या कालावधीत तीन रुग्णांचा स्वाईन फ्लूने बळी गेल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली.२००९ मध्ये साथ स्वरुपात आलेल्या ‘एच 1-एन 1’ हा विषाणू आता वातावरणाचा अविभाज्य भाग झाल्याने साथीच्या रोगाप्रमाणे दिसून येत आहे. मुंबई महानगर पालिकेच्या साथ रोग नियंत्रण कक्षात प्राप्त माहितीनुसार, जून महिन्यात मागील महिन्यांच्या तुलनेत अधिक स्वाईन फ्लूच्या रुग्णांची नोंद झाली आहे. वातावरणात होणारे बदल व दैनंदिन कमाल आणि किमान तापमानात आढळून येणारी तफावत यामुळे फ्लू विषाणूच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे हा आजार बळावत असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.गेल्या आठवड्यातील स्वाईन फ्लूच्या बळीनंतर पालिकेतर्फे करण्यात आलेल्या कारवाईत धारावीत ५०० घरांचे व २६१४ लोकसंख्येचे सर्व्हेक्षण करण्यात आले. या परिसरात ४ रुग्णांना स्वाईन फ्लू सदृश लक्षणे आढळली, त्यांच्या उपचार सुरु आहेत. त्याचप्रमाणे, मानखुर्द परिसरात ४७५ घरांचे व १३८४ लोकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले, येथे कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. तर मालवणी परिसरात ४९२ घरांचे २४६९ लोकसंख्येचे सर्व्हेक्षण करण्यात आले, त्यापैकी केवळ एका व्यक्तीत स्वाईन फ्लू सदृश लक्षणे आढळली. त्याच्यावर पुढील उपचार सुरु आहेत.७ महिन्यांच्या गर्भवतीचा बळीधारावी येथील ७ महिन्यांच्या गर्भवती असणाऱ्या महिलेला ८ जूनपासून ताप, खोकला, श्वासास त्रास व घसा दुखणे असा त्रास होत होता. ११ जून रोजी तिला पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. १३ जून रोजी तिचा स्वाईनमुळे मृत्यू झाला. याशिवाय, मानखुर्द येथील ४५ वर्षीय व्यक्तीला ८ जूनपासून ताप, श्वासास त्रास आणि खोकल्यातून रक्त असा त्रास उद्भवला होता, त्या व्यक्तीस क्षय रोग होता. ११ जून रोजी त्या व्यक्तीस पालिकेच्या रुग्णालयात दाखल केले, १६ जून रोजी स्वाईन फ्लूमुळे बळी गेला. मालवणी येथील ३५ वर्षीय महिलेचाही स्वाईन फ्लूमुळे १८ जून रोजी मृत्यू ओढावलागेल्या वर्षी एकही मृत्यू नाही : २०१६ साली मुंबईत स्वाईन फ्लूचे तीन रुग्ण आढळले होते, परंतु एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नव्हता. त्यापूर्वी २०१५ साली स्वाईन फ्लूचे ३ हजार २९ रुग्ण आढळले होते. त्यातील ५२ रुग्णांचा बळी गेला होता. मात्र २०१७ साली जानेवारीपासून मुंबईत स्वाईन फ्लूने डोकेवर काढण्यास सुुरुवात केली.गेस्ट्रोचे रुग्णही वाढले : गेल्या आठवड्याभरात गेस्ट्रोच्या रुग्णांमध्येही वाढ झाली. मुंबईत एप्रिल महिन्यातच गॅस्ट्रोचे ९१६ रुग्ण आढळले, तर या वर्षी जानेवारी ते एप्रिल महिन्यापर्यंत २२८० रुग्णांची नोंद केली गेली. गॅस्ट्रोची लागण झाल्यास अन्नावरील वासना उडणे, उलट्या होणे, वारंवार शौचास होणे अशी लक्षणे दिसतात. अतिसारावर घरगुती उपाय म्हणजे मीठ-साखरेचे पाणी रुग्णास देणे. त्याचबरोबर रुग्णाच्या आहारात सफरचंद, मऊ भात, दही यांचा समावेश असावा. ७२ तासांच्या आत त्रास थांबला नाही तर त्वरित डॉक्टरांकडे जावे.