शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

पॉलिटेक्निकच्या १५ हजारांवर जागा रिक्त राहणार

By admin | Updated: July 4, 2016 20:04 IST

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पॉलिटेक्निक प्रवेशाची स्थिती फारच खराब झाली आहे. प्रवेशप्रक्रियेत विभागातील जागांसाठी केवळ ३७ टक्के अर्ज आले असून १५ हजारांवर जागा रिक्त राहण्याचा धोका आहे

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. ४ : मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पॉलिटेक्निक प्रवेशाची स्थिती फारच खराब झाली आहे. प्रवेशप्रक्रियेत विभागातील जागांसाठी केवळ ३७ टक्के अर्ज आले असून १५ हजारांवर जागा रिक्त राहण्याचा धोका आहे. विशेष म्हणजे प्रवेश अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली होती. मात्र तरीदेखील विद्यार्थ्यांचा निरुत्साह कायमच राहीला. दरम्यान फारच कमी प्रमाणात अर्ज आल्याने जागा कशा भरावा असा यक्षप्रश्न महाविद्यालय प्रशासनांसमोर उभा राहिला आहे.

पॉलिटेक्निकच्या प्रवेशप्रक्रियेला १८ जून रोजी प्रारंभ झाला. परंतु सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांचा फारसा प्रतिसाद दिसून आला नाही. प्रवेशप्रक्रियेच्या आधीच्या वेळापत्रकानुसार अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ३० जून ही होती. मात्र विद्यार्थ्यांचा अतिशय कमी प्रमाणात मिळालेला प्रतिसाद पाहता प्रवेश अर्ज दाखल करण्याची मुदत ४ दिवसांनी वाढवण्यात आली होती.

नागपूर विभागातील सर्व ६९ पॉलिटेक्निक महाविद्यालये मिळून एकूण २५,२८५ जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी आतापर्यंत अखेरच्या दिवसापर्यंत केवळ ९,३०० अर्ज आले आहेत व याची टक्केवारी काढली असता ती अवघी ३७ टक्के आहे. त्यामुळे यंदा विभागात १५ हजारांहून अधिक जागा रिक्त राहण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. सोमवारी अखेरच्या दिवशी शेवटच्या २ तासांत २०० विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले.