शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

१५ प्रवासी अद्यापही बेपत्ता

By admin | Updated: August 8, 2016 08:15 IST

सावित्री पूल दुर्घनेत बेपत्ता झालेल्या ४२ प्रवाशांपैकी २७ प्रवाशांचे मृतदेह नदी किनारी सापडले असून यापैकी १५ बेपत्ता प्रवाशांचा शोध लागला नाही आहे

सावित्री पूल दुर्घटना : शोधमोहीम मंदावली; वाहनांचाही तपास नाही
प्रशासनाने घेतली स्थानिकांची मदत
महाड : सावित्री पूल दुर्घनेत बेपत्ता झालेल्या ४२ प्रवाशांपैकी २७ प्रवाशांचे मृतदेह नदी किनार्‍यावर सापडले असून यापैकी १५ बेपत्ता प्रवाशांचा शोध लागला नसल्याने शोधकार्यात गेल्या पाच दिवसांपासून गुंतलेली यंत्रणा चक्रावून गेली आहे. या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या दोन एसटी बसेसह एका तवेरा जीपचा छडा अद्यापही लागला नाही. या वाहनांचा शोध घेण्यासाठी सोनार तंत्रज्ञानाचाही गेल्या दोन दिवसांपासून वापर केला जात असून या अत्याधुनिक तंत्राचा वापर केला जात असूनही या शोधपथकाला या वाहनांचा वेध घेता येणे अशक्य झाल्याचे दिसून येत आहे.
नदीच्या प्रवाहात वाहून गेलेल्या एसटी बसचा महिलांसाठी आरक्षित हा लोखंडी पत्र्याचा फलक, घटनास्थळापासून तीन ते चार किती अंतरावरील विसावा हॉटेलच्या मागील बाजूस शनिवारी सापडला तर बसच्या सिटचा भाग देखील वराठी जवळ पाण्यात वाहून जाताना सापडला. 
रविवारी दिनेश सखाराम कांबळे, रमेश सखाराम मिरगल, अविनाश सखाराम मालप, जयेश गोपाळ बने हे चार मृतदेह वहूर आंबेत, वेश्‍वी ओवळे अशा विविध किनार्‍यावर आढळून आले. स्थानिक ग्रामस्थ व मच्छिमारांनी हे मृतदेह पाण्यातून बाहेर काढून प्रशासनाच्या ताब्यात दिले.
अद्यापही तेवरा जीपमधील दत्ताराम मिरगल, जयवंत मिरगल, संतोष वाजे, आदिनाथ कांबळे व चालक दिलीप वीर हे बेपत्ता आहेत. तर एसटी बसमधील धोंडू कोकरे, जितेश जैतापकर, विलास देसाई, इस्माइल वाघू, मंगेश चव्हाण, गोविंद जाधव, राजेश कलमकर, गोरखनाथ मुंढे, अनंत मोंडे व सुरेश निकम हे प्रवासी बेपत्ता आहेत. या बेपत्ता प्रवाशांचे नातेवाईक मदत केंद्रात तपासाची प्रतिक्षा करीत गेली पाच दिवसांपासून बसलेले आहेत. (वार्ताहर) 
दासगाव : सावित्री पूल दुर्घटनेतील मृतदेहांचा शोध अद्याप सुरू असून रविवारी केवळ दोनच मृतदेह सापडले असून सापडलेल्या मृतदेहांची संख्या २७ झाली आहे. काही मृतदेह नसल्याने मदत केंद्रात बसलेल्या नातेवाईकांचे डोळे पानावले आहेत. तवेरा कारमधील मृतदेह रविवारी सापडला असून त्यांची ओळख पटली आहे. दरम्यान रविवारी परिवहन मंत्री राते व खा. युवराज संभाजीराजे यांनी घटनास्थळाला भेट दिली. सावित्री पूल दुर्घटनेतील उर्वरित मृतदेहांचा आणि वाहनांचा शोध पाचव्या दिवशीही सुरूच होता. एनडीआरएफचे जवान सावित्री नदीमध्ये शोध घेत असले तरी त्यांच्या हाती अद्याप काहीच लागलेले नाही. अखेर प्रशासनाने स्थानिक ग्रामस्थांचा आधार घेतला आहे. आधुनिक तंत्रज्ञान वापरून देखील वाहनांचा शोध लागत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. दासगांव आणि परिसरातील भोई समाजाने लोकांना रविवारी प्रशासनाने मृतदेह आणि वाहनांचा शोध घेण्याकरिता नदीमध्ये पाठवले आहे. जवळपास १00 हून अधिक लोकांचे पथक दादली पुलाजवळ वाहनांचा शोध घेत आहे. घटनास्थळाजवळ मदत केंद्रात बसलेल्या नातेवाईकांना आपल्या गमावलेल्या व्यक्तीचा मृतदेह सापडत नसल्याने चिंता निर्माण झाली आहे. यातील अनेक नातेवाईकांनी प्रशासनाच्या कामावर नाराजी व्यक्त केली. राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि खा. युवराज संभाजीराजे यांनी घटनास्थळाला आणि येथे जमलेल्या नातेवाईकांची भेट घेतली. या ठिकाणी सुरू असलेल्या मदत कामाची माहिती जाणून घेतली. महाड आगारात महाड परिवहन विभागाच्या वतीने श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते, आ. भरत गोगावले, महामंडळाचे रिजनल मॅनेजर राहुल तोरो, महाव्यवस्थापक गोहोत्रे, मुख्य कार्यकारी अधिकारी पवार, उपमहाव्यवस्थापक माईन हाळीकर, यंत्र अभियंता चालक मुकुंद बंडगर आदि उपस्थित होते. यावेळी दिवाकर रावते यांनी प्रवासी हे आमचे दैवत आहेत. त्यांच्यावर कोसळलेल्या दु:खात एसटी महामंडळ सहभागी असून महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी या दुर्घटनेनंतर केलेली मदत कौतुकास्पद असल्याचे सांगितले. कर्मचार्‍यांच्या प्रत्येक प्रसंगात एसटी अध्यक्ष म्हणून आपण कायम पाठीशी राहू असेही स्पष्ट केले.