शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

१५ प्रवासी अद्यापही बेपत्ता

By admin | Updated: August 8, 2016 08:15 IST

सावित्री पूल दुर्घनेत बेपत्ता झालेल्या ४२ प्रवाशांपैकी २७ प्रवाशांचे मृतदेह नदी किनारी सापडले असून यापैकी १५ बेपत्ता प्रवाशांचा शोध लागला नाही आहे

सावित्री पूल दुर्घटना : शोधमोहीम मंदावली; वाहनांचाही तपास नाही
प्रशासनाने घेतली स्थानिकांची मदत
महाड : सावित्री पूल दुर्घनेत बेपत्ता झालेल्या ४२ प्रवाशांपैकी २७ प्रवाशांचे मृतदेह नदी किनार्‍यावर सापडले असून यापैकी १५ बेपत्ता प्रवाशांचा शोध लागला नसल्याने शोधकार्यात गेल्या पाच दिवसांपासून गुंतलेली यंत्रणा चक्रावून गेली आहे. या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या दोन एसटी बसेसह एका तवेरा जीपचा छडा अद्यापही लागला नाही. या वाहनांचा शोध घेण्यासाठी सोनार तंत्रज्ञानाचाही गेल्या दोन दिवसांपासून वापर केला जात असून या अत्याधुनिक तंत्राचा वापर केला जात असूनही या शोधपथकाला या वाहनांचा वेध घेता येणे अशक्य झाल्याचे दिसून येत आहे.
नदीच्या प्रवाहात वाहून गेलेल्या एसटी बसचा महिलांसाठी आरक्षित हा लोखंडी पत्र्याचा फलक, घटनास्थळापासून तीन ते चार किती अंतरावरील विसावा हॉटेलच्या मागील बाजूस शनिवारी सापडला तर बसच्या सिटचा भाग देखील वराठी जवळ पाण्यात वाहून जाताना सापडला. 
रविवारी दिनेश सखाराम कांबळे, रमेश सखाराम मिरगल, अविनाश सखाराम मालप, जयेश गोपाळ बने हे चार मृतदेह वहूर आंबेत, वेश्‍वी ओवळे अशा विविध किनार्‍यावर आढळून आले. स्थानिक ग्रामस्थ व मच्छिमारांनी हे मृतदेह पाण्यातून बाहेर काढून प्रशासनाच्या ताब्यात दिले.
अद्यापही तेवरा जीपमधील दत्ताराम मिरगल, जयवंत मिरगल, संतोष वाजे, आदिनाथ कांबळे व चालक दिलीप वीर हे बेपत्ता आहेत. तर एसटी बसमधील धोंडू कोकरे, जितेश जैतापकर, विलास देसाई, इस्माइल वाघू, मंगेश चव्हाण, गोविंद जाधव, राजेश कलमकर, गोरखनाथ मुंढे, अनंत मोंडे व सुरेश निकम हे प्रवासी बेपत्ता आहेत. या बेपत्ता प्रवाशांचे नातेवाईक मदत केंद्रात तपासाची प्रतिक्षा करीत गेली पाच दिवसांपासून बसलेले आहेत. (वार्ताहर) 
दासगाव : सावित्री पूल दुर्घटनेतील मृतदेहांचा शोध अद्याप सुरू असून रविवारी केवळ दोनच मृतदेह सापडले असून सापडलेल्या मृतदेहांची संख्या २७ झाली आहे. काही मृतदेह नसल्याने मदत केंद्रात बसलेल्या नातेवाईकांचे डोळे पानावले आहेत. तवेरा कारमधील मृतदेह रविवारी सापडला असून त्यांची ओळख पटली आहे. दरम्यान रविवारी परिवहन मंत्री राते व खा. युवराज संभाजीराजे यांनी घटनास्थळाला भेट दिली. सावित्री पूल दुर्घटनेतील उर्वरित मृतदेहांचा आणि वाहनांचा शोध पाचव्या दिवशीही सुरूच होता. एनडीआरएफचे जवान सावित्री नदीमध्ये शोध घेत असले तरी त्यांच्या हाती अद्याप काहीच लागलेले नाही. अखेर प्रशासनाने स्थानिक ग्रामस्थांचा आधार घेतला आहे. आधुनिक तंत्रज्ञान वापरून देखील वाहनांचा शोध लागत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. दासगांव आणि परिसरातील भोई समाजाने लोकांना रविवारी प्रशासनाने मृतदेह आणि वाहनांचा शोध घेण्याकरिता नदीमध्ये पाठवले आहे. जवळपास १00 हून अधिक लोकांचे पथक दादली पुलाजवळ वाहनांचा शोध घेत आहे. घटनास्थळाजवळ मदत केंद्रात बसलेल्या नातेवाईकांना आपल्या गमावलेल्या व्यक्तीचा मृतदेह सापडत नसल्याने चिंता निर्माण झाली आहे. यातील अनेक नातेवाईकांनी प्रशासनाच्या कामावर नाराजी व्यक्त केली. राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि खा. युवराज संभाजीराजे यांनी घटनास्थळाला आणि येथे जमलेल्या नातेवाईकांची भेट घेतली. या ठिकाणी सुरू असलेल्या मदत कामाची माहिती जाणून घेतली. महाड आगारात महाड परिवहन विभागाच्या वतीने श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते, आ. भरत गोगावले, महामंडळाचे रिजनल मॅनेजर राहुल तोरो, महाव्यवस्थापक गोहोत्रे, मुख्य कार्यकारी अधिकारी पवार, उपमहाव्यवस्थापक माईन हाळीकर, यंत्र अभियंता चालक मुकुंद बंडगर आदि उपस्थित होते. यावेळी दिवाकर रावते यांनी प्रवासी हे आमचे दैवत आहेत. त्यांच्यावर कोसळलेल्या दु:खात एसटी महामंडळ सहभागी असून महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी या दुर्घटनेनंतर केलेली मदत कौतुकास्पद असल्याचे सांगितले. कर्मचार्‍यांच्या प्रत्येक प्रसंगात एसटी अध्यक्ष म्हणून आपण कायम पाठीशी राहू असेही स्पष्ट केले.