शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
6
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
7
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
8
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
9
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
10
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
11
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
12
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
13
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
14
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
15
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
16
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
17
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
18
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
19
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 

दुबार नोंदणी असलेले साडेदहा लाख मतदार वगळले, आयोगाची कार्यवाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2023 12:36 IST

 राज्यात गेल्या वर्षी जानेवारीत ९ कोटी १३ लाख ४२ हजार ४२८ मतदार होते. मात्र, दुबार, छायाचित्र नसलेले व मृत्युमुखी पडलेल्यांची नावे वगळण्यात आली.

मुंबई : राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १० लाख ५६ हजार मतदार कमी झाले आहेत. तर, दिव्यांग मतदारांत १५ हजारांनी वाढ झाली आहे. भारत निवडणूक आयोगाने ही कार्यवाही केली. दुबार नोंदणीच्या त्रुटी दूर करणे, मृत्युमुखी पडलेले व छायाचित्र नसलेल्या मतदारांची नावे वगळण्याबाबत निवडणूक आयोगाने विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला होता त्याअंतर्गत १०.५६ लाख मतदार कमी झाल्याची माहिती आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी मंत्रालयात आयोजित पत्र परिषदेत दिली. राज्यात गेल्या वर्षी जानेवारीत ९ कोटी १३ लाख ४२ हजार ४२८ मतदार होते. मात्र, दुबार, छायाचित्र नसलेले व मृत्युमुखी पडलेल्यांची नावेवगळण्यात आली. त्यामुळे आता राज्यातील मतदारांची संख्या ९ कोटी २ लाख ८५ हजार ८०१ इतकी झाली आहे. त्यामुळे १० लाख ५६ हजार इतके मतदार गेल्या वर्षीपेक्षा कमी झाले आहेत. त्यात यंदा नव्याने ४ लाख ४३ हजार ५०० मतदारांची नोंदणी करण्यात निवडणूक आयोगाला यश मिळाले आहे, असेही देशपांडे यांनी सांगितले. राज्यात गेल्या वर्षी ६ लाख ६२ हजार १५१ दिव्यांग मतदारांची नोंदणी होती, त्यात यंदा १५ हजार ३३२ ने वाढ झाली आहे. तर मतदान ओळखपत्रावर छायाचित्र नसल्याने ६ हजार २५७ मतदारांची नावे वगळण्यात आली.तर २ हजारांहून अधिक मतदारांचे छायाचित्र टाकण्यात यशमिळवल्याचे निवडणूक आयोगाने सादर केलेल्या आकडेवारीत स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक