शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

अनुकंपा प्रकरणांबाबत १५ दिवसांत धोरण! शिक्षणमंत्र्यांचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 01:38 IST

शैक्षणिक संस्थांमध्ये सात वर्षांपासून रखडलेल्या अनुकंपा तत्त्वावरील भरतीबाबत शिक्षण विभागाकडून १५ दिवसांत धोरण निश्चित केले जाईल, असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले आहे.

मुंबई : शैक्षणिक संस्थांमध्ये सात वर्षांपासून रखडलेल्या अनुकंपा तत्त्वावरील भरतीबाबत शिक्षण विभागाकडून १५ दिवसांत धोरण निश्चित केले जाईल, असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले आहे. २०११ सालापासून प्रलंबित अनुकंपा प्रकरणांना २८ फेब्रुवारी २०१९पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत शिक्षण विभागाकडून स्वतंत्र शासन निर्णय (जीआर) जारी करण्याबाबत आमदार अ‍ॅड. निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेत विशेष उल्लेख केला होता. त्यानुसार विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी मंगळवारी विशेष बैठक बोलाविली असताना तावडे यांनी हे आश्वासन दिले.या बैठकीत तावडे यांच्यासह आमदार डावखरे, शालेय शिक्षण विभाग, वित्त आणि सामान्य प्रशासन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यात अनुकंपा प्रकरणांना सामान्य प्रशासन विभागाप्रमाणेच शिक्षण विभागानेही दोन वर्षांची मुदतवाढ द्यावी, अशी विनंती आमदार डावखरे यांनी केली. शिक्षकांच्या अनुकंपा नोकरीबाबत सरकारचे सहानुभूतीचे धोरण आहे.त्यामुळे शिक्षण विभागाकडून शिक्षकांच्या अनुकंपा भरतीला मुदतवाढ देण्याबाबत स्वतंत्र जीआर लागू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर येत्या १५ दिवसांत अनुकंपा भरतीबाबतच धोरण ठरविण्यात येईल, अशी माहिती तावडे यांनी दिली.- कोकणातील ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये २०११पासून अनुकंपा तत्त्वावर एकही नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि वरिष्ठ महाविद्यालयांमधील अकाली निधन झालेल्या कर्मचाऱ्यांची मुले न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातील अनेक कुटुंबांची आर्थिक स्थिती बिकट असल्याकडेही डावखरे यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडे