शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
2
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
3
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
4
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
5
पाकिस्तान युद्धात सैनिक लढला होता, नंतर पेन्शनशिवाय काढून टाकले; पत्नीला ५७ वर्षांनंतर मिळाला न्याय
6
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
7
Ultraviolette ने कमाल केली, X47 Crossover मोटरसायकल भारतात आली: 2.74 लाख रुपयांपासून किंमत सुरु!
8
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
9
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
10
एकाच वेळी पाच-सहा मराठी सिनेमे रिलीज, कसं व्हायचं? प्रसिद्ध गायकाने मांडलं मत, इंडस्ट्रीबद्दल म्हणाला...
11
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
12
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
13
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
14
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
15
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
16
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
17
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
18
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
19
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
20
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले

पासवर्ड चोरून एटीएममधून १४ जणांची फसवणूक करणारा अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2017 20:17 IST

गर्दी असलेल्या एटीएम सेंटरवर रांगेत उभे राहून घाई करीत समोरच्या व्यक्तींना गोंधळात टाकून, तर कधी पासवर्ड हेरून कार्डची अदलाबदल करीत १४ जणांच्या बँक खात्यातून तब्बल ५ लाख ५९ हजार ५०० रुपये काढून फसवणूक करणाऱ्यास मुकुंदवाडी पोलिसांनी अखेर पकडले.

औरंगाबाद, दि. 2 - गर्दी असलेल्या एटीएम सेंटरवर रांगेत उभे राहून घाई करीत समोरच्या व्यक्तींना गोंधळात टाकून, तर कधी पासवर्ड हेरून कार्डची अदलाबदल करीत १४ जणांच्या बँक खात्यातून तब्बल ५ लाख ५९ हजार ५०० रुपये काढून फसवणूक करणाऱ्यास मुकुंदवाडी पोलिसांनी अखेर पकडले. आरोपीला पकडण्यासाठी सायबर क्राइम एक्सपर्टचे योगदान महत्त्वपूर्ण होते, अशी माहिती पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी पत्रकार परिषदेत दिली.मोहम्मद सलीम हजीर खान (३३,रा. सुनारी, ता. तौर, जि. मेवात, हरियाणा) असे अटक आरोपीचे नाव आहे. उपायुक्त म्हणाले की, गतवर्षी २८ मे २०१६ रोजी विनायक मेळगावे (रा. रामनगर, सिडको) यांच्या एटीएम कार्डचा वापर करून अज्ञात व्यक्तीने बँक खात्यातून ३५ हजार रुपये काढले होते. एटीएममधून रक्कम काढण्यात आली तेव्हाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. मुकुंदवाडी परिसरातील भाजी मंडई आणि एपीआय कॉर्नर येथील एटीएम सेंटरसह अन्य दोन एटीएम सेंटरमध्ये कार्डची अदलाबदल करून, पासवर्ड चोरून आणि रांगेत उभ्या राहणाऱ्या व्यक्तींच्या खात्यातून रकमा पळविण्याच्या तब्बल १४ घटना वर्षभरात घडल्या. काही वेळा पैसे काढण्यासाठी मदत करण्याचा बहाणा करून पासवर्ड विचारल्यानंतर आरोपी कार्डची अदलाबदल करून फसवणूक करायचा, तर कधी तो रांगेत उभे असलेल्या व्यक्तींना लवकर पैसे काढा,असे म्हणून घाई करायचा. मागील व्यक्तीला आपल्यामुळे उशीर होतो, असे समजून कार्ड एटीएममध्ये टाकल्यानंतर लवकर पैसे न आल्यास संबंधित व्यक्ती तेथून बाहेर पडली की, मागे उभा आरोपी सलीम एटीएममधील तांत्रिक बाबी हाताळून गैरफायदा घेई. सर्व ठिकाणच्या गुन्ह्यात, तेथील सीसीटीव्हीत हा आरोपी कैद झाला. मात्र तो सापडत नव्हता.सासूरवाडीत यायचा आणि फसवणूक करायचा४ ठिकाणच्या घटनास्थळ परिसरात काही जण एकमेकांच्या मोबाइलवर सतत संपर्कात असल्याचे पोलिसांना समजले. यातील एक क्रमांक कधी औरंगाबादेत तर कधी हरियाणा राज्यात असायचा. त्याच्याशी संपर्कात असलेली व्यक्ती खोडेगाव येथील असल्याने पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे, सायबर क्राइम एक्स्पर्ट सहायक पोलीस निरीक्षक राहुल खटावकर, उपनिरीक्षक संजय बनसोडे, पोलीस कर्मचारी शेख अस्लम, कैलास काकड, प्रकाश सोनवणे, विष्णू हगवणे यांनी त्याच्याशी संपर्कात असलेल्या त्याच्या सासूरवाडीच्या लोकांना उचलले. त्यांच्या मदतीने त्यास औरंगाबादेत बोलावून ताब्यात घेतले, तेव्हा त्याने गुन्ह्याची कबुली दिली.