शहरं
Join us  
Trending Stories
1
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
2
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
3
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
4
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
5
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
6
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
7
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
8
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
9
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
10
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
11
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
12
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
13
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
14
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
15
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
16
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
17
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
18
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
19
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
20
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर

१४ मृतदेह सापडले कित्येक मैलांवर

By admin | Updated: August 5, 2016 05:35 IST

सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेतील १४ मृतदेह गुरुवारी घटनास्थळापासून कित्येक मैल दूरवर सापडले.

जयंत धुळप/संदीप जाधव,

महाड- मुंबई-गोवा महामार्गावर महाडनजीक मंगळवारी रात्री सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेतील १४ मृतदेह गुरुवारी घटनास्थळापासून कित्येक मैल दूरवर सापडले. नदीच्या जोरदार प्रवाहामुळे इतर बेपत्ता व्यक्तीही कदाचित समुद्रापर्यंत वाहत गेल्या असाव्यात, अशी शक्यता वर्तविली जात आहे.पुलासह नदीपात्रात पडलेल्या तवेरा जीपमधील रंजना वझे यांचा मृतदेह घटनास्थळापासून १ कि.मी. अंतरावर महाड शहराजवळ केंबुर्ली नदी किनाऱ्यावर एका शेतात आढळला. तर याच गाडीतील शेवंती मिरगल यांचा मृतदेह त्याहून खूप पुढे ८० कि.मी. अंतरावर हरिहरेश्वर समुद्रकिनाऱ्यावर सापडला. जयगड-मुंबई एसटी बसचे चालक श्रीकांत कांबळे यांचा मृतदेह ९० कि.मी. अंतरावर दापोली तालुक्यातील आंजर्ले किनारी तर आवेद अल्ताफ चौगुले या राजापूर-मुंबई एसटी बसमधील प्रवाशांचा मृतदेह दादली पुलाजवळ, पांडुरंग घाग राजापूर यांचा केंबुर्लीजवळ, प्रशांत माने यांचा मृतदेह ३५ कि.मी. अंतरावर म्हसळा तालुक्यातील तोराडी बंडवाडी खाडीकिनारी सापडला. स्नेहा बैकर यांचा मृतदेहदेखील २ किमीवरील राजेवाडी नदीकिनारी आढळून आला. याशिवाय सुनील बैकर, नेहा सुनील बैकर, रमेश कदम, प्रभाकर शिर्के, मंगेश कदम, अनिल संतोष बलेकर, जयेश गोपाल पाने, बालकृष्ण परब यांच्या मृतदेहाची ओळख पटली आहे.सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात सायंकाळी आणण्यात आले असून, त्यानंतर त्यांच्या नातेवाइकांकडे सुपुर्द करण्यात येणार आहेत. इतर बेपत्ता वाहनांचा तसेच प्रवाशांचा तपास लागत नसल्याने प्रशासन हतबल झाल्याचे दिसून आले. एखादा मृतदेह सापडल्याचे वृत्त मदत केंद्रात समजताच उपस्थित असलेल्या नातेवाइकांमध्ये घबराट निर्माण होत होती. आपल्याच नातेवाइकांचा हा मृतदेह असावा या आशेने दोन दिवस तळ ठोकून बसलेले हे सर्व नातेवाईक ग्रामीण रुग्णालयात धाव घेत होते. मृताची ओळख पटल्यानंतर मात्र त्या ठिकाणी त्यांना अश्रू अनावर होताना दिसून येत होते.>इतरांचा शोध सुरूच>सागरी तटरक्षक दल, एनडीआरएफ, नौदल आदी यंत्रणांनी बुधवारी पहाटेपासून सुरू केलेले शोधकार्य गुरुवारी दुसऱ्या दिवशीदेखील युद्धपातळीवर सुरू असल्याचे दिसून आले. तीनशे किलो वजनाचे लोहचुंबक पाण्यात सोडून क्रेनच्या साहाय्याने वाहनांचा नदीत शोध घेण्याचे एनडीआरएफकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. मात्र सायंकाळी ५ वाजेपर्यंत तरी या बेपत्ता वाहनांचा शोध घेण्यात अपयश आले. नौदलाच्या हेलिकॉप्टरद्वारेदेखील शोधमोहीम सुरूच होती.ज्या ठिकाणी दुर्घटना घडली त्या ठिकाणी संपूर्ण दगडी कातळ असल्याने दुर्घटनेच्या ठिकाणी वाहने न सापडता ती पुढे वाहून गेली असावीत, अशी शक्यता स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.>जोरदार प्रवाहामुळे अडचणीसुसज्ज यंत्रणा असूनही पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे तसेच जोरदार प्रवाहामुळे नदीत बेपत्ता वाहनांचा तसेच प्रवाशांचा शोध घेण्यात अडचणी येत असल्याचे एनडीआरएफचे निरीक्षक महमद शफिक यांनी ‘लोकमत’ला सांगितले. डेप्युटी कमांडर पंडित इथापे यांच्या नेतृत्वाखाली १०३ जवान मदतकार्य करीत असल्याचे शफिक यांनी सांगितले. घटनास्थळापासून सुमारे १० किमी अंतरावरील पादली पुलापर्यंतच्या प्रवाहात बोटिंग डिप डायव्हर्स आॅक्सिजनयुक्त यंत्रणेद्वारे शोधकार्य सुरूच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोकण रेल्वेची पाण्याखाली शोध घेऊ शकणारी यंत्रेही शोधमोहिमेत वापरण्यात येत आहेत.व्हीआयपी दौऱ्यांची अडचणदासगांव : गेले दोन दिवस मंत्री तसेच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळाला भेट देत आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाला वारंवार पुलावरील वाहतूक बंद करावी लागते. शिवाय, स्थानिक ग्रामस्थांना तसेच कर्मचाऱ्यांना काही अधिकाऱ्यांच्या अरेरावीचा सामना करावा लागत आहे.न्यायालयीन चौकशीपूल वाहून जाण्याच्या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत केली. याच दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने तीन तज्ज्ञांची एक समिती गठीत केली असून, या समितीने कारणांचा शोध घेण्याचे काम सुरू केले असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. - सविस्तर वृत्त/१०