शहरं
Join us  
Trending Stories
1
हृदयद्रावक! मुलाचा वाढदिवस करून घरी परतणाऱ्यांवर काळाचा घाला; अपघातात ७ नातेवाईकांचा मृत्यू
2
१०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांना २६% दर कपात; ७० टक्के लोकांना फायदा: फडणवीसांची घोषणा
3
NEET परीक्षेत अपयशी ठरली, मग UPSC ची तयारीही सोडली: आता ७२ लाखांचं पॅकेज घेणारी युवती आहे कोण?
4
मुंबईत ४० लाखांचा पगारही कमी? 'या' आयटी तरुणाची कहाणी ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!
5
८ दिवस रस्त्यावर आंदोलन, सरकार दखल घेईना; बिऱ्हाड आंदोलक मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटणार
6
धर्मांतरानंतर गायब झाल्या हिंदू मुली, छांगुर बाबाच्या आणखी एका चेल्याची पोलखोल; मेरठशीही थेट कनेक्शन!
7
मुंबईत लँडिंग आधी पायलटने 'PAN PAN PAN' मेसेज पाठवला; इंडिगोच्या विमानात नेमके काय घडले?
8
विशीतल्या हिरोसोबत रोमान्स करणार करीना कपूर, आगामी सिनेमात साकारणार भूताची भूमिका
9
Stock Market Today: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात; निफ्टी २५,२०० च्या वर, SBI, Hindalco, Eicher Motors मध्ये खरेदी
10
जीजू अन् मेहुणीचा सुरू होता बेडरूम रोमान्स, इतक्यात पती आला; पुढे जे घडलं त्यानं अख्खं गाव सुन्न झालं!
11
ज्येष्ठांसाठी जॅकपॉट आहे Post Officeची ही स्कीम; फक्त एकदा गुंतवा पैसे, दर महिन्याला ₹२०,५०० चं इन्कम फिक्स
12
Bihar Election: मोफत वीज देणार, ऑगस्टपासून योजना लागू; नितीश कुमारांनी केली घोषणा, किती यूनिट वीज देणार मोफत?
13
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
14
"मी तुझ्यावर प्रेम करतो, लग्न करशील?", जिनिलियाला चाहत्याचा मेसेज, अभिनेत्री म्हणाली- "मी विचार केला असता पण..."
15
राज्यातील आजी-माजी मंत्री, बडे अधिकारी हनी ट्रॅपमध्ये? कोण कोण अडकले...
16
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
17
फडणवीसांशी बोलले...! पुढे दोन पावलांवर ठाकरे-शिंदे आमने-सामने, बाजूला बसणे सोडा बघणेही टाळले
18
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
19
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
20
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग

१३०० कि.मी. प्रवासानंतर घर मिळाले, जोडीदारही मिळणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2020 05:39 IST

वाघाचा संसार फुलणार : अभयारण्यातील प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : तब्बल १३०० किलोमीटरचा प्रवास करून गेल्या काही महिन्यांपासून बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्यात स्थिरावलेल्या ‘टी-१सी-१’ वाघाचा संसार फुलण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भात नियुक्त केलेल्या समितीच्या बैठकीत अभयारण्यात वाघीण सोडण्यावर एकमत झाले. तत्पूर्वी काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची गरज असल्याचे समितीतील सदस्यांनी स्पष्ट केले.ज्ञानगंगा अभयारण्यातील वाघाच्या अधिवासाबद्दल एक समिती नियुक्त करण्यात आली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे संचालक एम. एस. रेड्डी अध्यक्ष असून राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य किशोर रिठे, वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाचे डॉ. बिलाल हबीब आणि अकोल्याचे विभागीय वनाधिकारी एम. एन. खैरनार हे सदस्य आहेत. राष्टÑीय व्याघ्र प्राधिकरणाने निर्देशित केलेले मानद वन्यजीव सदस्य जयंत वडतकर हेही सदस्य आहेत. सोमवारी अमरावतीत या समितीची बैठक झाली. ‘टी-१सी-१’ काही महिन्यांपासून या अभयारण्यात स्थिरावला आहे. या पार्श्वभूमीवर वाघांच्या अधिवासाबाबत हा परिसर किती योग्य आहे? या ठिकाणी वाघीण सोडण्यापूर्वी काय काळजी घ्यायची, यावर बैठकीत चर्चा झाली. प्रत्येक वाघ हा क्षेत्र, अन्न किंवा वाघीण यासाठी जंगल सोडतो. ‘टी-१सी-१’ गेल्या काही महिन्यांपासून ज्ञानगंगा अभयारण्यात स्थिरावला आहे. त्याला अन्नासोबत योग्य अधिवास याठिकाणी मिळाल्याचे सध्यातरी दिसत आहे, अशी माहिती वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाचे डॉ. बिलाल हबीब यांनी दिली. या अभयारण्यात वाघ किंवा वाघीण सोडण्याआधी सुरक्षित कॉरिडॉर आणि अभयारण्यातील चराई, रस्ता या प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य किशोर रिठे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.यवतमाळपासून बुलडाण्यापर्यंत...यवतमाळ जिल्ह्यातील टीपेश्वर अभयारण्यातून सुरू झालेला या वाघाचा प्रवास ‘ज्ञानगंगा’मध्ये येऊन थांबला. टीपेश्वरमध्ये २०१६ जन्मलेल्या या ‘टी-१सी-१’ वाघाने जूनमध्ये टीपेश्वर सोडले. तेलंगणातील आदिलाबाद, पुढे नांदेड विभाग करीत तो किनवटला पोहोचला. पैनगंगा अभयारण्यात त्याने बराच काळ घालविला.आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात त्याने हिंगोली जिल्ह्यात प्रवेश केला. नोव्हेंबरच्या सुरुवातीला त्याने अकोला विभागात प्रवेश केला आणि महिन्याच्या शेवटी बुलडाणा जिल्ह्यात पोहोचला. चिखली, खामगाव करीत एक डिसेंबरला तो ज्ञानगंगा अभयारण्यात पोहोचला. रेडिओ कॉलरमुळे त्याचा हा सर्व प्रवास जगासमोर आला. तब्बल १५० दिवसांमध्ये महाराष्टÑ आणि तेलंगणातील सात जिल्ह्यांचा प्रवास पूर्ण करून तो बुलडाण्यात स्थिरावला.

टॅग्स :Tigerवाघ