शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
2
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
3
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
4
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
5
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
6
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
7
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
8
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
9
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
10
धोरण बदलले अन् २२ दहशतवादी पाकमध्येच मारले; पाकिस्तानात खतरनाक दहशतवादी सैफची हत्या हे भारताच्या सक्रिय धोरणाचेच संकेत
11
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
12
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
13
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
14
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
15
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
16
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
17
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
18
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
19
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
20
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस

१२ आदिवासी वाड्यांत पाणीटंचाई

By admin | Updated: April 28, 2016 03:23 IST

कर्जत तालुक्याच्या दुर्गम भागात तेथील आदिवासी लोकांना मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

नेरळ : कर्जत तालुक्याच्या दुर्गम भागात तेथील आदिवासी लोकांना मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यातील नेरळ-माथेरान घाटात असलेल्या १२ आदिवासी वाड्यांत मोठ्या प्रमाणात पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. त्या भागात टँकरने पाणीपुरवठा सुरु न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा कर्जत तालुका आदिवासी संघटनेने दिला आहे.माथेरानच्या मधल्या पट्ट्यात नेरळच्या जुम्मापट्टीपासून कर्जतच्या किरवलीपर्यंत १२ आदिवासी वाड्या आहेत. त्यातील सर्व वाड्या या उंच भागात वसल्या असल्याने तेथे दरवर्षी पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते. बेकरेवाडी,आसलवाडी, नान्याचामाळ, मन्याचामाळ, मना धनगरवाडा, सागाचीवाडी, चिंचवाडी, भूतिवलीवाडी, आषाणेवाडी, सावरगाव, किरवलीवाडी, धामनदांड,या १२ आदिवासी वाड्या माथेरानच्या मध्यावर वसल्या आहेत. वन विभागाच्या दळी जमिनीवर वसलेल्या या सर्व वाड्यांपर्यंत जाण्यासाठी रस्ता करता येत नाही. त्यामुळे रस्त्याअभावी तेथे पाणीटंचाई काळात टँकर देखील सुरु करणे शक्य नाही. त्यामुळे प्रशासनासमोर तेथे पाणीपुरवठा करण्याबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. त्या स्थितीत स्थानिक आदिवासी लोकांनी दाहीदिशा भटकत राहायचे का, हा प्रश्न अधांतरी आहे. परंतु आदिवासी लोकांनी पाणी न पिता तडफडून मरायचे का, असा प्रश्न कर्जत तालुका आदिवासी ठाकूर कातकरी संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. शासनाने तेथे टँकर सुरु न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा आदिवासी संघटनेने दिला आहे. (वार्ताहर )