शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

राज्यातले १२१ प्रकल्प मार्गी लागणार! मुंबईत शुक्रवारी गडकरी घेणार बैठक

By अतुल कुलकर्णी | Updated: September 6, 2017 02:21 IST

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या फेरबदलात नितीन गडकरी यांच्याकडे जलसंपत्ती खाते आल्यामुळे राज्याच्या जलसंपदा विभागात दिवाळीचे वातावरण आहे.

मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या फेरबदलात नितीन गडकरी यांच्याकडे जलसंपत्ती खाते आल्यामुळे राज्याच्या जलसंपदा विभागात दिवाळीचे वातावरण आहे. स्वत: गडकरी यांनी ८ सप्टेंबरला राज्यातील प्रलंबित प्रकल्पांबाबत बैठक बोलावली असून, त्यात १२१ प्रकल्पांच्या पूर्ततेचा मार्ग मोकळा होणार आहे. हे प्रकल्प उमा भारती यांच्याकडे प्रलंबित होते.राज्यात जलसंपदा विभागाचे ३७६ प्रकल्पांचे काम सुरू असून, त्यातील ४९ प्रकल्पांत तांत्रिक अडचणी व न्यायालयीन अडथळे आहेत. ते वगळता ३२७ प्रकल्पांसाठी ७० हजार कोटी रुपये लागणार आहेत. त्यापोटी जलसंपदा विभागाने राज्य सरकार व उमा भारती यांच्या मदतीने ६७,३०० कोटींचे नियोजन केले आहे. आता गडकरी यांच्याकडे हा विभाग आल्यामुळे राज्यात सिंचनाआधीच निधीचा महापूर येणार आहे.जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, केंद्राकडे जे प्रकल्प प्रलंबित आहेत, त्याबाबत गडकरींनी तातडीची बैठक मुंबईत बोलावली आहे. मुख्यमंत्र्यांकडे ही बैठक होईल. त्यात आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांमधील ८७ प्रकल्पांसाठी ७२०० कोटी रुपये, अतिदुष्काळी भागांतील ८ प्रकल्पांसाठी ३५०० कोटी रुपये, विविध प्रकल्पांसाठी केंद्राचा हिस्सा म्हणून ३,८६० कोटी रुपये असे १४,५६० कोटी रुपये येणार होते. उमा भारती यांनी त्यास होकार दिला होता, पण त्याला गती आली नव्हती. या फायली आता मार्गी लागाव्यात, यासाठी, ८ तारखेच्या बैठकीचे नियोजन चालू आहे.राज्यातले ३७६ तालुके अवर्षणप्रवण म्हणून जाहीर झाले आहेत. या तालुक्यांमध्ये सिंचनाचे १०७ प्रकल्प कासवगतीने चालू आहेत. यासाठी २०१५च्या दरानुसार २४,९९५ कोटी रुपये लागणार होते. यासाठी गडकरी यांनी काही महिन्यांपूर्वी पुढाकार घेऊन मुंबईत उमा भारतींना बोलावून बैठक घेतली होती. एवढे पैसे केंद्र सरकार कधीही देणार नाही, त्यामुळे १०७पैकी अत्यंत दुष्काळी भागातले प्रकल्प निवडा, अशा सूचना त्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार ८ प्रकल्प निवडले गेले. त्यासाठी ३५०० कोटी रुपये लागणार आहेत.

टॅग्स :Nitin Gadakriनितिन गडकरी