शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

राज्यातले १२१ प्रकल्प मार्गी लागणार! मुंबईत शुक्रवारी गडकरी घेणार बैठक

By अतुल कुलकर्णी | Updated: September 6, 2017 02:21 IST

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या फेरबदलात नितीन गडकरी यांच्याकडे जलसंपत्ती खाते आल्यामुळे राज्याच्या जलसंपदा विभागात दिवाळीचे वातावरण आहे.

मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या फेरबदलात नितीन गडकरी यांच्याकडे जलसंपत्ती खाते आल्यामुळे राज्याच्या जलसंपदा विभागात दिवाळीचे वातावरण आहे. स्वत: गडकरी यांनी ८ सप्टेंबरला राज्यातील प्रलंबित प्रकल्पांबाबत बैठक बोलावली असून, त्यात १२१ प्रकल्पांच्या पूर्ततेचा मार्ग मोकळा होणार आहे. हे प्रकल्प उमा भारती यांच्याकडे प्रलंबित होते.राज्यात जलसंपदा विभागाचे ३७६ प्रकल्पांचे काम सुरू असून, त्यातील ४९ प्रकल्पांत तांत्रिक अडचणी व न्यायालयीन अडथळे आहेत. ते वगळता ३२७ प्रकल्पांसाठी ७० हजार कोटी रुपये लागणार आहेत. त्यापोटी जलसंपदा विभागाने राज्य सरकार व उमा भारती यांच्या मदतीने ६७,३०० कोटींचे नियोजन केले आहे. आता गडकरी यांच्याकडे हा विभाग आल्यामुळे राज्यात सिंचनाआधीच निधीचा महापूर येणार आहे.जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, केंद्राकडे जे प्रकल्प प्रलंबित आहेत, त्याबाबत गडकरींनी तातडीची बैठक मुंबईत बोलावली आहे. मुख्यमंत्र्यांकडे ही बैठक होईल. त्यात आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांमधील ८७ प्रकल्पांसाठी ७२०० कोटी रुपये, अतिदुष्काळी भागांतील ८ प्रकल्पांसाठी ३५०० कोटी रुपये, विविध प्रकल्पांसाठी केंद्राचा हिस्सा म्हणून ३,८६० कोटी रुपये असे १४,५६० कोटी रुपये येणार होते. उमा भारती यांनी त्यास होकार दिला होता, पण त्याला गती आली नव्हती. या फायली आता मार्गी लागाव्यात, यासाठी, ८ तारखेच्या बैठकीचे नियोजन चालू आहे.राज्यातले ३७६ तालुके अवर्षणप्रवण म्हणून जाहीर झाले आहेत. या तालुक्यांमध्ये सिंचनाचे १०७ प्रकल्प कासवगतीने चालू आहेत. यासाठी २०१५च्या दरानुसार २४,९९५ कोटी रुपये लागणार होते. यासाठी गडकरी यांनी काही महिन्यांपूर्वी पुढाकार घेऊन मुंबईत उमा भारतींना बोलावून बैठक घेतली होती. एवढे पैसे केंद्र सरकार कधीही देणार नाही, त्यामुळे १०७पैकी अत्यंत दुष्काळी भागातले प्रकल्प निवडा, अशा सूचना त्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार ८ प्रकल्प निवडले गेले. त्यासाठी ३५०० कोटी रुपये लागणार आहेत.

टॅग्स :Nitin Gadakriनितिन गडकरी