शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
4
"राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
7
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
8
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
9
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
10
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
11
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
12
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
13
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
14
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
15
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
16
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
17
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
18
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
19
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
20
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...

१२०० ब्लॅक स्पॉट जाहीर

By admin | Published: October 14, 2016 3:16 AM

‘एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास’असे सांगणाऱ्या एसटीचा प्रवास हा धोकादायक मार्गांवरूनच होत आहे. असलेले खड्डे, वळणदार रस्ते, यामुळे एसटी बसेसचा वेग कमी

मुंबई : ‘एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास’असे सांगणाऱ्या एसटीचा प्रवास हा धोकादायक मार्गांवरूनच होत आहे. असलेले खड्डे, वळणदार रस्ते, यामुळे एसटी बसेसचा वेग कमी होतानाच, बसेसना अपघातांना आणि त्यातील जीवितहानीला तोंड द्यावे लागते. राज्यात असे तब्बल १,२१0 ‘ब्लॅक स्पॉट’(धोकादायक ठिकाणे) असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून तयार करण्यात आली आहे. यामध्ये एकट्या मुंबई प्रदेशात (ठाणे जिल्हा, सिंधुदुर्ग) ३९२ ठिकाणे आहेत. यानंतर, नाशिक प्रदेश (नाशिक ते अहमदनगर,धुळे) आणि औरंगाबाद प्रदेशाचा नंबरही लागतो.

२0१४-१५ मध्ये एकूण ४९५ जण अपघातांत दगावले होते. यामध्ये एसटी प्रवासी, एसटी कर्मचारी व अन्य वाहनांमधील प्रवाशांना समावेश आहे. २0१५-१६ शी तुलना करता, या वर्षात ४0७ जण दगावले. हे प्रमाण फारच कमी असले पाहिजे, असे मत एसटीचे अधिकारी व्यक्त करतात. सरासरी वर्षाला जवळपास ४00 पेक्षा जास्त जण एसटीच्या अपघातात दगावतात. यामध्ये एसटी प्रवाशांच्या अपघातांचे प्रमाण साधारणपणे ६९ एवढे आहे. अपघात होऊ नये, यासाठी चालकांमध्ये महामंडळाकडून जनजागृती केली जाते. एकट्या मुंबई प्रदेशात ३९२ धोकादायक ठिकाणे असून, यामध्ये सिंधुदुर्गात १३६ व ठाणे जिल्ह्यात ७५ ठिकाणे असल्याचे समोर आले. त्यानंतर, नाशिक प्रदेशात २८६, औरंगाबाद प्रदेशात १९५ ठिकाणे आहेत. नाशिक प्रदेशात येणाऱ्या धुळेमध्ये ५0 ठिकाणे असल्याची माहिती देण्यात आली. यावर उपाययोजना करण्यासाठी एसटीकडून शासनाकडेही सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. (प्रतिनिधी)