शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
4
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
5
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
6
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
7
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
8
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
9
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
10
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
11
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
12
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
13
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
14
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
15
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
16
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
17
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
18
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
19
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
20
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी

दहावी, बारावी फेरपरीक्षेसाठी एका वर्गात १२ विद्यार्थी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2020 02:25 IST

विभागीय मंडळ : १० मिनिटांहून अधिक विलंब झाल्यास परीक्षा देता येणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दहावी-बारावीच्या फेरपरीक्षेसाठी एका वर्गात १२ विद्यार्थी बसवायचे आहेत, १३ वा विद्यार्थी हा दुसऱ्या वर्गात बसविण्याची व्यवस्था केंद्रप्रमुखांनी करावी, अशा सूचना विभागीय मंडळांनी फेरपरीक्षेच्या शाळांच्या केंद्रप्रमुखांना दिल्या.मुंबई विभागीय मंडळाकडून फेरपरीक्षा पार पडणार आहेत. तेथील केंद्रप्रमुखांची बैठक घेऊन काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. विशेष म्हणजे आतापर्यंत अर्धा तास विद्यार्थी उशिरा पोहोचल्यास त्याला परीक्षा देण्याची परवानगी होती, मात्र या परीक्षेला केवळ १० मिनिटे उशिरा आलेल्या विद्यार्थ्यालाच परीक्षा केंद्रात प्रवेश मिळू शकेल.प्रत्येक विद्यार्थ्याने मास्क लावणे बंधनकारक असून सुरक्षितता व स्वच्छतेच्या इतर सुविधांसाठी केंद्रांना मंडळाकडून २००० रुपये अग्रीम रक्कम देण्यात येईल. केंद्रातील प्रवेश आणि बाहेर जाण्याचे नियोजन करताना विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक अंतर राखले जाईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. फेरपरीक्षेच्या वेळी पोलीस बंदोबस्त नेहमीसारखाच कडक असणार असून केंद्रप्रमुखांनी उपस्थिती, गैरहजर, गैरप्रकार, संसर्गित विद्यार्थी रुग्ण या सर्वांची नोंद व माहिती ऑनलाइन करून ती लगेच मंडळांना कळवायची आहे.रनर केंद्रावरच थांबणारल्ल दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची पेपरफुटी रोखण्यासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कस्टोडियनकडून प्रत्येक शाळेतप्रश्नपत्रिकांचे संच पोहोचवणारे रनर केवळ केंद्रांवरील बैठक व्यवस्था पाहणार आहेत.ल्ल प्रश्नपत्रिका दिल्यानंतर परीक्षा संपेपर्यंत संबंधित केंद्रातच ते थांबतील. यामुळे पेपरफुटीला आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास मंडळाने व्यक्त केला.साहित्य अपुरे पडण्याची भीतीमंडळाकडून फेरपरीक्षा केंद्रावर प्रत्येकी १०० ते ११० विद्यार्थ्यांसाठी सॅनिटायझरचे ५ लीटरचे कॅन, २ थर्मल गन, दोन हँड्स स्प्रे देण्यात येतील. फेरपरीक्षा १० दिवस असेल. त्यामुळे इतक्या दिवसांसाठी हे साहित्य पुरेसे होईल का, असा प्रश्न केंद्रप्रमुखांना पडला आहे.

टॅग्स :examपरीक्षा