शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

दहावी, बारावी फेरपरीक्षेसाठी एका वर्गात १२ विद्यार्थी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2020 02:25 IST

विभागीय मंडळ : १० मिनिटांहून अधिक विलंब झाल्यास परीक्षा देता येणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दहावी-बारावीच्या फेरपरीक्षेसाठी एका वर्गात १२ विद्यार्थी बसवायचे आहेत, १३ वा विद्यार्थी हा दुसऱ्या वर्गात बसविण्याची व्यवस्था केंद्रप्रमुखांनी करावी, अशा सूचना विभागीय मंडळांनी फेरपरीक्षेच्या शाळांच्या केंद्रप्रमुखांना दिल्या.मुंबई विभागीय मंडळाकडून फेरपरीक्षा पार पडणार आहेत. तेथील केंद्रप्रमुखांची बैठक घेऊन काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. विशेष म्हणजे आतापर्यंत अर्धा तास विद्यार्थी उशिरा पोहोचल्यास त्याला परीक्षा देण्याची परवानगी होती, मात्र या परीक्षेला केवळ १० मिनिटे उशिरा आलेल्या विद्यार्थ्यालाच परीक्षा केंद्रात प्रवेश मिळू शकेल.प्रत्येक विद्यार्थ्याने मास्क लावणे बंधनकारक असून सुरक्षितता व स्वच्छतेच्या इतर सुविधांसाठी केंद्रांना मंडळाकडून २००० रुपये अग्रीम रक्कम देण्यात येईल. केंद्रातील प्रवेश आणि बाहेर जाण्याचे नियोजन करताना विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक अंतर राखले जाईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. फेरपरीक्षेच्या वेळी पोलीस बंदोबस्त नेहमीसारखाच कडक असणार असून केंद्रप्रमुखांनी उपस्थिती, गैरहजर, गैरप्रकार, संसर्गित विद्यार्थी रुग्ण या सर्वांची नोंद व माहिती ऑनलाइन करून ती लगेच मंडळांना कळवायची आहे.रनर केंद्रावरच थांबणारल्ल दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची पेपरफुटी रोखण्यासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कस्टोडियनकडून प्रत्येक शाळेतप्रश्नपत्रिकांचे संच पोहोचवणारे रनर केवळ केंद्रांवरील बैठक व्यवस्था पाहणार आहेत.ल्ल प्रश्नपत्रिका दिल्यानंतर परीक्षा संपेपर्यंत संबंधित केंद्रातच ते थांबतील. यामुळे पेपरफुटीला आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास मंडळाने व्यक्त केला.साहित्य अपुरे पडण्याची भीतीमंडळाकडून फेरपरीक्षा केंद्रावर प्रत्येकी १०० ते ११० विद्यार्थ्यांसाठी सॅनिटायझरचे ५ लीटरचे कॅन, २ थर्मल गन, दोन हँड्स स्प्रे देण्यात येतील. फेरपरीक्षा १० दिवस असेल. त्यामुळे इतक्या दिवसांसाठी हे साहित्य पुरेसे होईल का, असा प्रश्न केंद्रप्रमुखांना पडला आहे.

टॅग्स :examपरीक्षा