शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

राज्यात रोज १२ बलात्कार, महिलांची सुरक्षा वाºयावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 05:09 IST

महिलांच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकार कितीही उपाययोजनांचा दावा करीत असले तरी प्रत्यक्षात महिलांवरील अत्याचाराचा आलेख वाढतच असल्याचे स्पष्ट होत आहे. राज्यात रोज १२ बलात्कार होत असून ३४ विनयभंगाच्या घटना होत आहेत. तसेच २० अपहरण तर सरासरी १७ महिलांना कौटुंबिक छळाला सामोरे जावे लागत आहे.

- जमीर काझीमुंबई  - महिलांच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकार कितीही उपाययोजनांचा दावा करीत असले तरी प्रत्यक्षात महिलांवरील अत्याचाराचा आलेख वाढतच असल्याचे स्पष्ट होत आहे. राज्यात रोज १२ बलात्कार होत असून ३४ विनयभंगाच्या घटना होत आहेत. तसेच २० अपहरण तर सरासरी १७ महिलांना कौटुंबिक छळाला सामोरे जावे लागत आहे. गेल्या वर्षात महिलांवरील अत्याचाराच्या एकूण ३२ हजार ५३ घटना घडल्या आहेत. २०१६च्या तुलनेत गुन्ह्यांची संख्या आठशेहून अधिक आहे.माहिती अधिकार कायद्यान्वये ही आकडेवारी पुढे आली आहे. राज्यात तीन वर्षांत बलात्काराच्या एकूण १२ हजार ६८९ घटना घडल्या आहेत, तर महिलांवरील विविध प्रकारच्या अत्याचाराच्या एकूण ९४ हजार ४५४ घटना घडल्या आहेत.अर्थात ही आकडेवारी केवळ पोलिसांकडे दाखल असलेल्या गुन्ह्यांची आहे.प्रत्यक्षात अत्याचाराचे प्रमाण त्याहून अधिक असल्याचे सांगितले जाते. महाराष्टÑात तरुणी व महिलांवर होणाºया अत्याचाराला प्रतिबंध घालण्यासाठी पोलिसांकडून विविध उपाययोजना व पथके बनविण्यात आली आहेत. तरीही त्यांच्यावरील गुन्ह्यांचा आलेख चढा राहिल्याचे वास्तव आकडेवारीतून पुढेआले आहे.२०१७ या वर्षात महिलांवरील अत्याचाराच्या एकूण ३२ हजार ५३ घटना घडल्या आहेत. त्यात प्रामुख्याने ४३५६ बलात्कार, १२ हजार २३८ विनयभंग तर अपहरण आणि पती व माहेरील मंडळीकडून छळाच्या अनुक्रमे ७ हजार ११३ व ६२४२ घटना घडल्या आहेत. २०१६ व २०१५ मध्ये बलात्काराच्या घटना अनुक्रमे ४१८९ व ४१४४ इतक्या तर विनयभंगाचे गुन्हे अनुक्रमे ११ हजार ३९६ व ११ हजार ७१३ दाखल झाले आहेत, तर अपहरणाच्या ६,१६९ व ५,०९६ घटना घडल्या होत्या.गुणात्मक सुधारणा करणारमहिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक पोलीस घटकांमध्ये विशेष उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्यामध्ये गुणात्मक सुुधारणा करण्याची सूचना सर्व घटकप्रमुखांना करण्यात आली आहे. जेणेकरून तरुणी व महिलांसाठी अधिक निर्भय वातावरण निर्माण होईल.- कैसर खालिद (विशेष महानिरीक्षक,महिला अत्याचार प्रतिबंधक विभाग)

टॅग्स :Rapeबलात्कारMaharashtraमहाराष्ट्र