शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
3
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
4
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
5
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
6
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
7
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
8
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
9
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
10
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
11
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
12
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
13
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
14
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
15
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
16
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
17
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
18
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
19
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
20
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..

२६ दिवसांत १२ जणांचा मृत्यू

By admin | Updated: January 28, 2015 01:03 IST

मागील २६ दिवसांत नागपूर जिल्ह्यात स्वाईन फ्लूने १२ जणांचा मृत्यू झाला. यात २९ जण पॉझिटिव्ह आले असून असून सध्याच्या स्थितीत खासगी इस्पितळात आठ तर शासकीय रुग्णालयात पाच

स्वाईन फ्लू वाढतोय : २९ पॉझिटिव्ह; शासकीयसह खासगीमध्ये १५ भरतीनागपूर : मागील २६ दिवसांत नागपूर जिल्ह्यात स्वाईन फ्लूने १२ जणांचा मृत्यू झाला. यात २९ जण पॉझिटिव्ह आले असून असून सध्याच्या स्थितीत खासगी इस्पितळात आठ तर शासकीय रुग्णालयात पाच रुग्ण उपचार घेत आहेत. निदान होण्यास उशीर होत असल्याने रुग्णसंख्या वाढत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. स्वाईन फ्लूचे वाढते रुग्ण व मृत्यूची संख्या पाहता महापौर प्रवीण दटके यांनी आज मंगळवारी तातडीने याविषयी बैठक घेतली. बैठकीत स्वाईन फ्लूविषयी जनजागृतीवर भर देण्याचा निर्णय घेण्यात आला. लोकांना स्वाईन फ्लू म्हणजे काय, त्यावरील उपचार आणि घ्यावयाची काळजी आदी उपाययोजनांची माहिती देण्यात येणार आहे. उपराजधानीत २००९ पासून स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून येऊ लागले. मागील सहा वर्षांत या आजाराने १४२ रुग्णांचा बळी घेतला. २०११ सोडल्यास प्रत्येक वर्षी दहाच्यावर मृत्यूची नोंद आहे. २००९ मध्ये ४५, २०१० मध्ये ५४, २०१२ मध्ये १५, २०१३ व २०१४ मध्ये १०-१० तर या वर्षात आतापर्यंत ११ जणांच्या मृत्यूची नोंद आहे. विशेष म्हणजे, पॉझिटिव्हची संख्या वाढत असल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. शहरात आतापर्यंत १७ रुग्णांना हा आजार असल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील तीन रुग्ण उपचार घेत असून चार जणांना उपचारानंतर सुटी देण्यात आली. तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर जिल्ह्यात सहा जणांचा मृत्यू झाला असून १२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. (प्रतिनिधी)जनजागृतीवर भर देणारमहानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सविता मेश्राम यांनी सांगितले की, महापौरांनी आज स्वाईन फ्लूवर बैठक घेतली. यात सर्दी, खोकला आणि ताप असलेल्यांनी तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्वरित तपासणी करण्याची आणि गरज वाटल्यास स्वाईन फ्लूची तपासणी करण्याच्या जनजागृतीवर भर देण्यात येणार आहे. यामुळे लवकर निदान होऊन मृत्यू रोखणे शक्य होईल.व्हॅक्सिन देणे बंदशहरातील वोक्हार्ट, क्रिम्स, केअर, होप आणि चांडक या खासगी इस्पितळांमध्ये स्वाईन फ्लूच्या रुग्णांवर उपचार होतो. येथे प्रत्येकी पाच खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. येथील रुग्णांना महापालिकेकडून नि:शुल्क टॅमीफ्लूच्या गोळ्या देण्यात येतात. परंतु खबरदारी म्हणून संबंधित इस्पितळातील डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना व्हॅक्सीन देणे बंद आहे. २०११ पासून आरोग्य विभागाने हे व्हॅक्सीन उपलब्ध करून दिले नसल्याचे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सुदृढ लोकांनाही स्वाईन फ्लू!शहरातील काही तज्ज्ञांच्या मते, पूर्वी ज्या रुग्णांमध्ये रोग प्रतिकार शक्ती कमी असयाची, उदा. लहान मुले, गर्भवती महिला व वृद्ध यांना स्वाईन फ्लू होण्याचा धोका अधिक असायचा. असे रुग्णही मोठ्या संख्येत दिसून आलेत. परंतु आता जे रुग्ण येत आहेत त्यांच्यामध्ये रोग प्रतिकार शक्ती चांगली असतानाही हा आजार आढळून येत आहे. विशेषत: ४० ते ५० वयोगटातील सुदृढ महिलांना अचानक आलेला ताप, सर्दी आणि घसा खवखवायला लागल्यानंतर त्यांची चाचणी केली असता स्वाईन फ्लू असल्याचे निष्पन्न आले. परंतु हे काहीच रुग्णांच्या संदर्भात आहे. यावर आणखी संशोधन होणे आवश्यक आहे. मेडिकलमध्ये पाच पॉझिटीव्हशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) स्वाईन फ्लूचे १३ रुग्ण भरती आहेत. तब्बल तीन दिवसांच्या सुटीनंतर आज यांच्या नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला. यात पाच रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.