शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

२० जि.प.मध्ये ओबीसींच्या ११८ जागा होणार कमी; अध्यादेशाचा परिणाम, ४२२ जागा वाचणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 06:46 IST

१४ जिल्हा परिषदांमधील २७ टक्के आरक्षण टिकवायचे तर अध्यादेश काढणे आवश्यकच आहे. कारण अध्यादेश हा सर्व जिल्हा परिषदांसाठी एकत्रितपणे लागू असेल.

यदु जोशी - मुंबई : ओबीसींना ५० टक्क्यांच्या मर्यादेत आरक्षण देण्यासाठी राज्य शासनाने अध्यादेश काढल्यानंतरही २० जिल्हा परिषदांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण २७ टक्क्यांपेक्षा कमी होणार आहे. १४ जिल्हा परिषदांमधील २७ टक्के आरक्षण पूर्वीप्रमाणेच कायम राहील.

नंदुरबार, पालघर, नाशिक, धुळे, अमरावती, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, ठाणे, अकोला, गोंदिया, नागपूर, वाशिम, नांदेड, वर्धा, जळगाव, बुलडाणा, भंडारा, हिंगोली आणि लातूर या जिल्हा परिषदांमधील ओबीसींची आरक्षणाची टक्केवारी २७ पेक्षा कमी होईल. या जिल्ह्यांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापूर्वी ओबीसींसाठी ३०३ जागा आरक्षित होत्या. आता त्यातील ११८ जागा कमी होऊन १८५ जागा अध्यादेशानंतर मिळणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने राज्यातील सर्व ३४ जिल्हा परिषदांमधील ओबीसींसाठी आरक्षित ५४० जागा संपुष्टात आलेल्या आहेत. राज्य शासनाने अध्यादेश काढला नाही तर तशीच स्थिती कायम राहिली असती; मात्र आता अनुसूचित जाती, जमातीच्या लोकसंख्येच्या सरासरीतील आरक्षण वगळता ५० टक्क्यांच्या मर्यादेत ओबीसींना आरक्षण देण्याचा अध्यादेश काढण्यात येणार असल्याने ५४० पैकी ४२२ जागांवरील ओबीसींचे आरक्षण टिकवता येणार आहे. तथापि, २० जिल्ह्यांमध्ये ११८ जागा कमी होतील. एकूण विचार करता आधीच्या जागांपैकी ७९ टक्के जागा टिकतील आणि २१ टक्के जागांचे आरक्षण जाईल.

१४ जिल्हा परिषदांमधील २७ टक्के आरक्षण टिकवायचे तर अध्यादेश काढणे आवश्यकच आहे. कारण अध्यादेश हा सर्व जिल्हा परिषदांसाठी एकत्रितपणे लागू असेल.

या १४ जिल्ह्यांमध्ये २७ टक्के आरक्षण कायम राहणाररायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, उस्मानाबाद या १४ जिल्हा परिषदांमधील ओबीसींचे २७ टक्के राजकीय आरक्षण अध्यादेशामुळे कायम राहणार आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती जागा कमी?नंदुरबार ११, पालघर १५, नाशिक १८, धुळे १३, अमरावती १०, गडचिरोली ८, चंद्रपूर ७, यवतमाळ ६, ठाणे ४, अकोला ३, गोंदिया ३, नागपूर ४, वाशिम ३, नांदेड ३, वर्धा २, जळगाव ३, बुलडाणा २, भंडारा १, हिंगोली १, लातूर १. एकूण ११८.

२० जिल्ह्यांमध्ये ओबीसी आरक्षित जागांची संख्यानंदुरबार ०, पालघर ०, नाशिक २, धुळे २, अमरावती ६, गडचिरोली ६, चंद्रपूर ८, यवतमाळ १०, ठाणे १०, अकोला ११, गोंदिया ११, नागपूर १२, वाशिम ११, नांदेड १४, वर्धा १२, जळगाव १५, बुलडाणा १४, भंडारा १३, हिंगोली १३, लातूर १५.एकूण १८५. 

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषदOBC Reservationओबीसी आरक्षणOBCअन्य मागासवर्गीय जातीElectionनिवडणूक