शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

२० जि.प.मध्ये ओबीसींच्या ११८ जागा होणार कमी; अध्यादेशाचा परिणाम, ४२२ जागा वाचणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 06:46 IST

१४ जिल्हा परिषदांमधील २७ टक्के आरक्षण टिकवायचे तर अध्यादेश काढणे आवश्यकच आहे. कारण अध्यादेश हा सर्व जिल्हा परिषदांसाठी एकत्रितपणे लागू असेल.

यदु जोशी - मुंबई : ओबीसींना ५० टक्क्यांच्या मर्यादेत आरक्षण देण्यासाठी राज्य शासनाने अध्यादेश काढल्यानंतरही २० जिल्हा परिषदांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण २७ टक्क्यांपेक्षा कमी होणार आहे. १४ जिल्हा परिषदांमधील २७ टक्के आरक्षण पूर्वीप्रमाणेच कायम राहील.

नंदुरबार, पालघर, नाशिक, धुळे, अमरावती, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, ठाणे, अकोला, गोंदिया, नागपूर, वाशिम, नांदेड, वर्धा, जळगाव, बुलडाणा, भंडारा, हिंगोली आणि लातूर या जिल्हा परिषदांमधील ओबीसींची आरक्षणाची टक्केवारी २७ पेक्षा कमी होईल. या जिल्ह्यांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापूर्वी ओबीसींसाठी ३०३ जागा आरक्षित होत्या. आता त्यातील ११८ जागा कमी होऊन १८५ जागा अध्यादेशानंतर मिळणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने राज्यातील सर्व ३४ जिल्हा परिषदांमधील ओबीसींसाठी आरक्षित ५४० जागा संपुष्टात आलेल्या आहेत. राज्य शासनाने अध्यादेश काढला नाही तर तशीच स्थिती कायम राहिली असती; मात्र आता अनुसूचित जाती, जमातीच्या लोकसंख्येच्या सरासरीतील आरक्षण वगळता ५० टक्क्यांच्या मर्यादेत ओबीसींना आरक्षण देण्याचा अध्यादेश काढण्यात येणार असल्याने ५४० पैकी ४२२ जागांवरील ओबीसींचे आरक्षण टिकवता येणार आहे. तथापि, २० जिल्ह्यांमध्ये ११८ जागा कमी होतील. एकूण विचार करता आधीच्या जागांपैकी ७९ टक्के जागा टिकतील आणि २१ टक्के जागांचे आरक्षण जाईल.

१४ जिल्हा परिषदांमधील २७ टक्के आरक्षण टिकवायचे तर अध्यादेश काढणे आवश्यकच आहे. कारण अध्यादेश हा सर्व जिल्हा परिषदांसाठी एकत्रितपणे लागू असेल.

या १४ जिल्ह्यांमध्ये २७ टक्के आरक्षण कायम राहणाररायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, उस्मानाबाद या १४ जिल्हा परिषदांमधील ओबीसींचे २७ टक्के राजकीय आरक्षण अध्यादेशामुळे कायम राहणार आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती जागा कमी?नंदुरबार ११, पालघर १५, नाशिक १८, धुळे १३, अमरावती १०, गडचिरोली ८, चंद्रपूर ७, यवतमाळ ६, ठाणे ४, अकोला ३, गोंदिया ३, नागपूर ४, वाशिम ३, नांदेड ३, वर्धा २, जळगाव ३, बुलडाणा २, भंडारा १, हिंगोली १, लातूर १. एकूण ११८.

२० जिल्ह्यांमध्ये ओबीसी आरक्षित जागांची संख्यानंदुरबार ०, पालघर ०, नाशिक २, धुळे २, अमरावती ६, गडचिरोली ६, चंद्रपूर ८, यवतमाळ १०, ठाणे १०, अकोला ११, गोंदिया ११, नागपूर १२, वाशिम ११, नांदेड १४, वर्धा १२, जळगाव १५, बुलडाणा १४, भंडारा १३, हिंगोली १३, लातूर १५.एकूण १८५. 

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषदOBC Reservationओबीसी आरक्षणOBCअन्य मागासवर्गीय जातीElectionनिवडणूक