शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

टीव्ही रिमोटवरून बहिणीशी झालेल्या वादानंतर ११ वर्षीय मुलाची आत्महत्या

By admin | Updated: February 27, 2016 09:48 IST

रिमोट कंट्रोलने टीव्ही चॅनेल बदलण्याच्या मुद्यावरून बहिणीशा झालेल्या वादानंतर ११ वर्षीय मुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली

ऑनलाइन लोकमत
कल्याण, दि. २७ - रिमोट कंट्रोलने टीव्ही चॅनेल बदलण्याच्या मुद्यावरून बहिणीशा झालेल्या वादानंतर ११ वर्षीय मुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे. या मुलाच्या वडिलांनी तीन वर्षांपूर्वी  राहत्या घरीच आत्महत्या केली होती, तेव्हापासूनच तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता, असे समजते.
मृत मुलगा एस.व्ही.एम. इंग्रजी शाळेचा विद्यार्थी असून कल्याण पूर्वेकडील शिवाजी नगर परिसरातील एका इमारतीत आई, चार बहिणी व एका लहान भावासह रहात होता. बुधवारी संध्याकाळी ४.३० च्या सुमारास टीव्ही पाहण्यावरून त्याचा मोठ्या बहिणीशी वाद झाला. त्यामुळे रागावलेला मुलगा दुस-या खोलीत निघून गेला आणि त्याने थेट पंख्याला गळफास लावून घेत आत्महत्या केली. थोड्या वेळाने त्याची दुसरी बहीण त्या खोलीत गेली असता, तिला आपला भाऊ पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला.
या घटनेमुळे त्याच्या कुटुंबियांना विशेषत: त्याच्या आईला मोठा धक्का बसला. तीन वर्षांपूर्वी त्यांच्या पतीच्या आत्महत्येनंतर त्या मुलांसाठी खंबीरपणे उभ्या राहिल्या व पतीचे किराणा मालाचे दुकान सांभाळू लागल्या. आर्थिक तंगी असतानाही त्यांनी अथक मेहनत करून सर्व मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवले होते. मात्र आपल्या मुलाच्या या कृत्यामुळे त्या पूर्णपणे खचूगेल्या आहेत. ' माझा मुलगा अभ्यासात अतिशय हुशार होताच, पण त्याने असे ( आत्महत्येचे) पाऊल का उचलले मला समजत नाही !  आपल्यालाही एक दिवस चांगल जीवन जगता येईल अशा माझ्या सर्व आशा आता धुळीत मिळाल्या आहेत' अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.