शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

११ हजार कोटींच्या कर्जाचे पुनर्गठन

By admin | Updated: April 27, 2016 06:47 IST

राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील ११ लाख ३५ हजार ३७२ शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीक कर्जावरील १२७२ कोटी रुपयांचे व्याज माफ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी घेतला.

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील ११ लाख ३५ हजार ३७२ शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीक कर्जावरील १२७२ कोटी रुपयांचे व्याज माफ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी घेतला. ही रक्कम राज्य शासनाच्या तिजोरीतून बँकांना देण्यात येणार आहे. या शिवाय, २१ लाख शेतकऱ्यांकडील ११ हजार कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात येणार आहे. ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी असलेल्या गावांतील शेतकऱ्यांना या निर्णयांचा फायदा होईल. २०१४ मधील खरिप पीक कर्जाच्या पहिल्या हप्त्यास एक वर्ष मुदतवाढ, खरिप हंगाम २०१५ च्या पीक कर्जाचे पुनर्गठन तसेच, २०१२-१३ आणि २०१३-१४ मधील पीक कर्जाचे पुनर्गठन करण्याचा निर्णयही घेण्यात आला. पुनगर्ठनामुळे आधी असलेल्या कर्जाचे सुलभ हप्ते पाडले जातील आणि आधीचे कर्ज असले तरी नव्याने कर्ज मिळू शकते. २०१४ च्या खरिप हंगामातील पुनर्गठन केलेल्या ३ हजार ५०३ कोटी रुपयांच्या कर्जापोटी शेतकऱ्यांना ७०० कोटी रुपयांच्या पहिल्या वार्षिक हप्त्याची परतफेड करायची होती. या रकमेपैकी थकित ३०० कोटी रुपयांची परतफेड करण्यास एक वर्षाची मुदत देण्यात आली आहे. या रकमेवरील ३६ कोटी रुपयांचे व्याज शासन भरणार आहे. या निर्णयाचा फायदा ५ लाख ३३ हजार ७४१ शेतकऱ्यांना होईल. तसेच २०१५-१६ मधील खरीप हंगामातील पीक कर्जापैकी शासनाने ५० पेक्षा कमी पैसेवारी जाहीर केलेल्या गावातील ११ लाख ३५ हजार ३७२ शेतकऱ्यांच्या सुमारे ५ हजार कोटी रुपयांच्या थकित पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात येणार आहे. या कर्जावरील प्रथम वर्षाचे संपूर्ण व्याज व दुसऱ्या वर्षापासून चार वर्षाचे (२०१७-१८ ते २०२०-२१ ) ६ टक्के दराने होणारे व्याज असे एकूण अंदाजे १२७२ कोटी रु पये शासनाकडून बँकांना देण्यात येणार आहे. २०२१ पर्यंतचे कर्ज आणि त्यावरील व्याजाचे अंदाजित आकडे प्रशासनाने काढले आहेत. शेतकऱ्यांकडे थकीत असलेल्या २४३८.९२ कोटी पीक कर्जाचे विशेष बाब म्हणून पुनर्गठन करण्यास मान्यता देण्याची विनंती रिझर्व्ह बँकेला करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला. सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली. (विशेष प्रतिनिधी)