शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

११ कारखाने एफआरपी देतात, तर इतरांना काय धाड भरली आहे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 06:25 IST

ऊसदर नियंत्रण मंडळ बैठक; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची विचारणा

मुंबई/कोल्हापूर : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी १०० टक्के एफआरपी दिली आहे; मग उर्वरित १७४ कारखान्यांना धाड भरलीय का, असा बिनतोड सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसदर नियंत्रण मंडळाच्या बैठकीत केला.

मंत्रालयात शुक्रवारी मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. त्यामध्ये राज्यातील गाळप हंगाम, ऊसदर, आदीबाबत कारखान्यांचे व शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींसमवेत खडाजंगी चर्चा झाली.

साखरेचे दर घसरल्याने एकरकमी एफआरपी देणे शक्य नाही, अशी ओरड बहुतांश साखर कारखाने करीत असले तरीही राज्यातील ११ साखर कारखान्यांनी १०० टक्के एफआरपी दिली असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. यंदाच्या हंगामात १८५ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला असून आतापर्यंत ४२६.८४ लाख टन ऊस गाळप करण्यात आला आहे. गाळप झालेल्या उसाची एकूण एफआरपी १० हजार ४८७ कोटी रुपये होत असून, त्यांपैकी पाच हजार १६६ कोटी रक्कम शेतकºयांना देण्यात आली आहे. अजूनही १७४ साखर कारखान्यांकडे पाच हजार ३२० कोटींची रक्कम थकीत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

गाळप केलेल्या कारखान्यांचे उत्पन्न विभागणी सूत्रानुसार दर काढण्याची प्रक्रिया सुलभ करावी, असे निर्देश मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांनी दिले.ऊसतोडणी व वाहतूक खर्चाची चौकशी करणारकाही कारखाने ऊसतोडणी व वाहतूक खर्च जास्त दाखवतात, त्यावर कुणाचे नियंत्रण नसते, त्यांची तपासणी करावी, अशी मागणी शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी केली. त्यानुसार साखर आयुक्तालयाने दर तपासावेत, असे निर्देशही मुख्य सचिव जैन यांनी या वेळी दिले.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने