शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

११ कारखाने एफआरपी देतात, तर इतरांना काय धाड भरली आहे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 06:25 IST

ऊसदर नियंत्रण मंडळ बैठक; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची विचारणा

मुंबई/कोल्हापूर : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी १०० टक्के एफआरपी दिली आहे; मग उर्वरित १७४ कारखान्यांना धाड भरलीय का, असा बिनतोड सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसदर नियंत्रण मंडळाच्या बैठकीत केला.

मंत्रालयात शुक्रवारी मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. त्यामध्ये राज्यातील गाळप हंगाम, ऊसदर, आदीबाबत कारखान्यांचे व शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींसमवेत खडाजंगी चर्चा झाली.

साखरेचे दर घसरल्याने एकरकमी एफआरपी देणे शक्य नाही, अशी ओरड बहुतांश साखर कारखाने करीत असले तरीही राज्यातील ११ साखर कारखान्यांनी १०० टक्के एफआरपी दिली असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. यंदाच्या हंगामात १८५ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला असून आतापर्यंत ४२६.८४ लाख टन ऊस गाळप करण्यात आला आहे. गाळप झालेल्या उसाची एकूण एफआरपी १० हजार ४८७ कोटी रुपये होत असून, त्यांपैकी पाच हजार १६६ कोटी रक्कम शेतकºयांना देण्यात आली आहे. अजूनही १७४ साखर कारखान्यांकडे पाच हजार ३२० कोटींची रक्कम थकीत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

गाळप केलेल्या कारखान्यांचे उत्पन्न विभागणी सूत्रानुसार दर काढण्याची प्रक्रिया सुलभ करावी, असे निर्देश मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांनी दिले.ऊसतोडणी व वाहतूक खर्चाची चौकशी करणारकाही कारखाने ऊसतोडणी व वाहतूक खर्च जास्त दाखवतात, त्यावर कुणाचे नियंत्रण नसते, त्यांची तपासणी करावी, अशी मागणी शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी केली. त्यानुसार साखर आयुक्तालयाने दर तपासावेत, असे निर्देशही मुख्य सचिव जैन यांनी या वेळी दिले.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने