शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अकरा शहरे होणार स्मार्ट!

By admin | Updated: August 1, 2015 05:06 IST

केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानाकरिता मुंबई, नवी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, ठाणे, अमरावती, सोलापूर, नागपूर, कल्याण-डोंबिवली व औरंगाबाद या अकरा शहरांची निवड करण्याचा

मुंबई : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानाकरिता मुंबई, नवी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, ठाणे, अमरावती, सोलापूर, नागपूर, कल्याण-डोंबिवली व औरंगाबाद या अकरा शहरांची निवड करण्याचा निर्णय राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. राज्य मंत्रिमंडळाच्या २३ जुलै रोजी झालेल्या बैठकीत ही योजना महाराष्ट्रात अमलात आणण्यास मान्यता देण्यात आली. देशातील १०० शहरांमध्ये पाच वर्षांच्या कालावधीकरिता हे अभियान राबवण्यात येणार असून त्यासाठी ४८ हजार कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य केंद्राकडून उपलब्ध करून दिले जाणार आहे. केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेकरिता महाराष्ट्रातून १० शहरांची निवड करायची होती. परंतु प्रत्यक्ष़ात अकरा शहरांची निवड केली गेली आहे. याकरिता एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ३६ शहरांमध्ये स्पर्धा होती. या योजनेत शहरांमधील प्रमुख नागरी समस्यांचे निवारण करण्याकरिता केंद्र सरकारकडून ५०० कोटी रुपयांचा निधी पाच वर्षांत देण्यात येणार असून उर्वरित ५०० कोटींचा निधी राज्य सरकार व महापालिकेने उभा करायचा आहे. त्यामुळे ज्या शहरांचा या योजनेत समावेश केला जाईल त्यांना २५० कोटी रुपयांची तजवीज करावी लागणार आहे. परिणामी लोकसंख्येच्या निकषानुसार योजनेस पात्र असणारी शहरे आर्थिक निकषावर मागे पडली. या अभियानाच्या अंमलबजावणी करिता विशेष हेतू यंत्रणा (स्पेशल पर्पज व्हेकल) स्थापन करण्यात येईल. तसेच स्मार्ट सिटी सल्लागार फोरमची स्थापना करण्यात येईल. त्या माध्यमातून विविध घटकांचा अभियानात समावेश केला जाईल. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समिती या अभियावर देखरेख करील व नगरविकास विभागाचे सचिव (२) या अभियानाचे संचालक म्हणून काम करतील.नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावणे तसेच गुंतवणूकदारांना आकर्षित करणे हा अभियानाचा मुख्य हेतू आहे. वाढती लोकसंख्या विचारात घेऊन विद्यमान शहरांभोवती नवी शहरे विकसीत करणे, मिश्र जमीन वापर, सर्व रहिवाशांना घरांची संधी उपलब्ध करून देणे, नैसर्गिक स्त्रोतांचा ऱ्हास थांबवण्याकरिता शहरातील गर्दी-वायू प्रदूषण कमी करणे, मोकळ््या जागांचे जतन व विकास, वाहतुकीचे विविध पर्याय उपलब्ध करणे आदी उद्दीष्टे गाठण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.अभियानात समाधानकारक पाणीपुरवठा करणे, आश्वासक विद्युत पुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, प्रभावी दळणवळण, गरिबांना परवडणाऱ्या घरांची उपलब्धता, सक्षम माहिती-तंत्रज्ञान, डिजिटलायझेशनस, ई-गव्हर्नन्स, महिला व बालकांची सुरक्षा आदी सुविधा पुरवणे अत्यावश्यक केले आहे. (विशेष प्रतिनिधी)अशी होती निवड प्रक्रिया- केंद्र सरकारने १०० गुणांचा आणि १३ प्रश्नांचा एक पेपर १ लाखाच्या वरती लोकसंख्या असलेल्या शहरांना पाठविण्यात आला. राज्यात अशी ३७ शहरे आहेत, ज्यात २६ महानगरपालिका आहेत तर ११ अ वर्ग नगरपालिका आहेत.- केंद्र सरकारने विचारलेल्या १३ प्रश्नांच्या प्रश्नपत्रिकेसोबत राज्य सरकारदेखील स्वत:ची एक प्रश्नपत्रिका पाठविली होती. ३१ जुलै ही प्रस्ताव पाठविण्याची अंतिम मुदत होती. किती शहरांचे प्रस्ताव आले होते, हे सरकारने जाहीर केलेले नाही.स्मार्ट सिटी निवडीत पक्षीय भेदाभेद- स्मार्ट सिटी योजनेत शहरांची निवड करताना पक्षीय भेदाभेद करण्यात आला आहे. भाजपा-सेना, मनसे व त्यांच्या मित्रपक्षांची सत्ता असलेल्या महापालिकांची स्मार्ट सिटी योजनेत निवड करताना निकषात बसणाऱ्या काँग्रेस महापालिका मात्र डावलल्या आहेत, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी नांदेड येथे केला.- मराठवाड्यात केवळ औरंगाबादचा समावेश करण्यात आला. प्रत्यक्षात नांदेडही स्पर्धेत परिपूर्ण उतरले होते. पवित्र स्थान असलेले नांदेडचा गुरुद्वारा प्रसिद्ध असून गुरु-ता-गद्दीच्या काळातही मोठ्या योजना येथील महापालिकेने राबविल्या आहेत. मात्र केवळ काँग्रेसची संपूर्ण सत्ता असल्याने नांदेडला डावलले, असा दावा त्यांनी केला.नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामे पाडणारउच्च न्यायालयाने नवी मुंबईतील २०१२ पर्यंतच्या अनधिकृत बांधकामांना अभय दिलेले आहे, मात्र त्यानंतरच्या बांधकामांवर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.ठाणे जिल्ह्यातून ३ मनपा!स्मार्ट सिटी अभियानासाठी निवडण्यात आलेल्या शहरांमध्ये एकट्या ठाणे जिल्हयातील ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली अशा तीन शहरांची निवड करण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यातून दोन!पुणे आणि पिंपरी-चिंचवड अशा दोन महापालिकांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे दहाच शहरे निवडायची असताना प्रत्यक्षात शहरांची संख्या अकरा झाली आहे.

२०० कोटींचे आर्थिक गणितनिवड झालेल्या शहरांना केंद्र सरकार दरवर्षी १०० कोटी आणि राज्य सरकार ५० कोटी देणार आहे. त्या शहरांनी स्वत: ५० कोटी उभे करायचे आहेत.