शहरं
Join us  
Trending Stories
1
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
2
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
3
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
4
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
5
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
6
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
7
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
8
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
9
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
10
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
11
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
12
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
13
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
14
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
15
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
16
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
17
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
18
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
19
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
20
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...

१,१९६ घरांना तिलांजली

By admin | Updated: January 14, 2015 04:53 IST

मिशन कालावधीत बीएसयूपीच्या (बेसिक सर्व्हिस फॉर अर्बन पुअर) सदनिका उभारणीची कामे पूर्ण न झाल्याने आता या कामासाठी मुदतवाढ मिळावी

अजित मांडके, ठाणेमिशन कालावधीत बीएसयूपीच्या (बेसिक सर्व्हिस फॉर अर्बन पुअर) सदनिका उभारणीची कामे पूर्ण न झाल्याने आता या कामासाठी मुदतवाढ मिळावी, म्हणून पालिका प्रशासनाने प्रस्ताव तयार केला आहे. परंतु, दुसरीकडे काही ठिकाणी जागा न मिळाल्याने, चार टप्प्यांतील सात हजार ७४५ सदनिकांपैकी एक हजार १९६ सदनिका आणि संक्रमण शिबिरांच्या २९३ खोल्या रद्द करण्याची नामुष्की पालिकेवर ओढावली आहे. हा प्रस्ताव तयार करण्यात आला असून त्यासाठी पालिकेला मिळालेले केंद्र आणि राज्य सरकारचे १५ कोटी ९३ लाख सव्याज परत करावे लागणार आहेत. ठाणे महापालिका हद्दीत २००५ मध्ये बीएसयूपी योजनेअंतर्गत चार विकास प्रस्ताव तयार करण्यात आले. त्यानुसार शहराच्या सदनिका उभारणीची कामे हाती घेतली आहेत. त्याचा मिशन कालावधी सुरवातीला २०१४ निश्चित केला होता. परंतु, नंतर पुन्हा त्यात वाढ करून ३१ मार्च २०१५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. या कालावधीत आतापर्यंत एमएमआरडीए, तुळशीधाम येथे २ हजार १३४ सदनिकापैकी १३०० सदनिका बांधून पूर्ण झाल्या आहेत. ८३४ सदनिकांचे काम प्रगतीपथावर आहे. सिद्धार्थनगर कोपरी येथे ६८८ पैकी ३५० सदनिका बांधून पूर्ण झाल्या आहेत. खारटन रोड येथे १६० पैकी ९६ सदनिकांचे काम पूर्ण झाले आहे. वर्तकनगर येथील इमारत क्र मांक ५४, ५५ आणि ५६ येथे बांधण्यात येणाऱ्या २७० सदनिका स्थलांतरित करून टेकडी बंगला व राबोडी येथे त्या उभारण्यात येणार आहेत. माजिवडयाच्या ५३२ सदनिकापैकी पडले गाव व राबोडी येथे अनुक्रमे १३२ व २०० सदनिकांचे काम होणार आहे. तर २४० सदनिका रद्द करण्यात येणार आहेत. अंतिम भूखंड ७० येथे बांधण्यात येणाऱ्या २७० सदनिका रद्द करण्यात येणार आहेत. तर महात्मा फुले नगर येथीलही २७० सदनिका रद्द होण्याच्या मार्गावर आहेत. एकूण प्रकल्प १ मध्ये ४ हजार ६२१ सदनिकांपैकी ६४८ सदनिकाचे काम रद्द होणार आहे. प्रकल्प तीन मध्ये आनंदनगर येथे बांधण्यात आलेल्या ११६० सदनिकापैकी ५४८ सदनिका रद्द कराव्या लागणार आहेत. प्रकल्प चारमध्ये डायघर व कौसा येथे बांधण्यात येणाऱ्या ११४२ सदनिका पडले, राबोडी, महात्मा फुलेनगर येथे स्थलांतरित कराव्या लागणार आहेत.तीन प्रकल्पांचा एकूण खर्च ५४१ कोटी ८ लाख ५१ हजार असून आतापर्यंत २२० कोटी ४ लाख ५९ हजार खर्च झाला आहे. प्रकल्प पूर्ण करण्यास ३२१ कोटी ३ लाख ९२ हजार अधिक भाववाढ इतका निधी आवश्यक आहे.