शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

१०५ कंत्राटी चालकांचे मानधन थकले

By admin | Updated: June 7, 2017 04:11 IST

केडीएमसीच्या कचरा वाहतूक करणाऱ्या गाड्यांवर कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या १०५ वाहनचालकांना तीन महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : केडीएमसीच्या कचरा वाहतूक करणाऱ्या गाड्यांवर कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या १०५ वाहनचालकांना तीन महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही. त्यांच्या मानधनाचा विषय मंगळवारच्या महासभेत मंजूर केला जाणार होता. मात्र, महासभाच तहकूब झाल्याने त्यांचे मानधन लांबणीवर पडले आहे. पावसाळा तोंडावर आल्याने घराची डागडुजी, कुटुंबाचा मासिक खर्च आणि १५ जूनपासून मुलांच्या शाळा सुरू होणार असल्याने वह्या, पुस्तके, गणवेशाचा खर्च कसा करा करायचा, असे प्रश्न त्यांच्यासमोर उभे आहेत. कल्याण-डोंबिवलीत घनकचऱ्याचा प्रश्न चांगलाच गाजत आहे. घनकचरा प्रकल्प राबवण्यात होणाऱ्या दिरंगाईप्रकरणी उच्च न्यायालय तसेच हरित लवादाकडे याचिका न्यायप्रविष्ट आहे. कचऱ्याची वाहतूक करण्यासाठी महापालिकेने राज्य सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानातून गाड्या खरेदी केल्या होत्या. या गाड्या अन्थोनी वेस्ट हॅण्डलिंग कंपनीला चालवण्यास दिल्या होत्या. मात्र, या कंपनीचे काम असमाधानकारक असल्याने त्यांचे कंत्राट रद्द करण्यात आले. परंतु, महापालिकेने कामावर ठेवावे, यासाठी त्यांंनी औद्योगिक न्यायालयात लढा दिला. न्यायालयाच्या आदेशानुसार २०१२ पासून हे चालक कार्यरत आहेत. मात्र, त्यांना तीन महिन्यापांसून मानधन दिले गेलेले नाही. दरमहा त्यांना १० हजार मानधन दिले जाते. त्यात वाढ केल्याने आता १६ हजार दिले जाणार आहेत. तीन महिन्यांचे ४२ हजार रुपये प्रत्येक वाहनचालकाचे थकले आहेत. महापालिकेने हे थकीत मानधन द्यावे, कंत्राटाला मुदतवाढ द्यावी, असा विषय मंगळवारच्या महासभेच्या पटलावर होता. परंतु, आयुक्तांच्या बदलीसत्राच्या कुरघोडीमुळे महासभा तहकूब झाल्याने त्यांचा विषय बारगळला. महापौरांच्या गैरहजेरीमुळे सभा झाली नसल्याचा आरोप भाजपाचे नगरसेवक राजन सामंत यांनी केला आहे.>...तर आरोग्य प्रश्न गंभीर कंत्राटी वाहन चालकांच्या सहा महिने नियुक्तीचा कालावधी २८ फेब्रुवारीला संपला. एक दिवसाचा खंड देऊन त्यांना पुन्हा १ मार्च २०१७ पासून सहा महिने मुदतवाढ देणे आवश्यक आहे. मात्र, वारंवार सभा तहकूब होत असल्याने त्याचा फटका या कामगारांना बसला आहे.या कामगारांचा संबंध दररोज घाणीशी येतो. एक दिवस कचरा वाहून न नेल्यास कचराकुंड्या तुडुंब भरतात. तसेच कचरा रस्त्याच्या लगत पडून राहतो. त्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. पावसाळा तोंडावर आहे. पावसाळ््यात कचरा न उचलल्यास अनारोग्याची स्थिती निर्माण होऊ शकते. तीन महिने मानधन मिळाले नसले तरी कामगारांनी काम थांबवलेले नाही. पगार मिळण्याच्या आशेवर ते काम करत आहेत. या विषयाला तातडीने मान्यता देऊन त्यांचा मानधनाचा मुद्दा निकाली काढावा, अशी अपेक्षा नगरसेवक सामंत यांनी व्यक्त केली आहे.