शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

१०५ कंत्राटी चालकांचे मानधन थकले

By admin | Updated: June 7, 2017 04:11 IST

केडीएमसीच्या कचरा वाहतूक करणाऱ्या गाड्यांवर कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या १०५ वाहनचालकांना तीन महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : केडीएमसीच्या कचरा वाहतूक करणाऱ्या गाड्यांवर कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या १०५ वाहनचालकांना तीन महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही. त्यांच्या मानधनाचा विषय मंगळवारच्या महासभेत मंजूर केला जाणार होता. मात्र, महासभाच तहकूब झाल्याने त्यांचे मानधन लांबणीवर पडले आहे. पावसाळा तोंडावर आल्याने घराची डागडुजी, कुटुंबाचा मासिक खर्च आणि १५ जूनपासून मुलांच्या शाळा सुरू होणार असल्याने वह्या, पुस्तके, गणवेशाचा खर्च कसा करा करायचा, असे प्रश्न त्यांच्यासमोर उभे आहेत. कल्याण-डोंबिवलीत घनकचऱ्याचा प्रश्न चांगलाच गाजत आहे. घनकचरा प्रकल्प राबवण्यात होणाऱ्या दिरंगाईप्रकरणी उच्च न्यायालय तसेच हरित लवादाकडे याचिका न्यायप्रविष्ट आहे. कचऱ्याची वाहतूक करण्यासाठी महापालिकेने राज्य सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानातून गाड्या खरेदी केल्या होत्या. या गाड्या अन्थोनी वेस्ट हॅण्डलिंग कंपनीला चालवण्यास दिल्या होत्या. मात्र, या कंपनीचे काम असमाधानकारक असल्याने त्यांचे कंत्राट रद्द करण्यात आले. परंतु, महापालिकेने कामावर ठेवावे, यासाठी त्यांंनी औद्योगिक न्यायालयात लढा दिला. न्यायालयाच्या आदेशानुसार २०१२ पासून हे चालक कार्यरत आहेत. मात्र, त्यांना तीन महिन्यापांसून मानधन दिले गेलेले नाही. दरमहा त्यांना १० हजार मानधन दिले जाते. त्यात वाढ केल्याने आता १६ हजार दिले जाणार आहेत. तीन महिन्यांचे ४२ हजार रुपये प्रत्येक वाहनचालकाचे थकले आहेत. महापालिकेने हे थकीत मानधन द्यावे, कंत्राटाला मुदतवाढ द्यावी, असा विषय मंगळवारच्या महासभेच्या पटलावर होता. परंतु, आयुक्तांच्या बदलीसत्राच्या कुरघोडीमुळे महासभा तहकूब झाल्याने त्यांचा विषय बारगळला. महापौरांच्या गैरहजेरीमुळे सभा झाली नसल्याचा आरोप भाजपाचे नगरसेवक राजन सामंत यांनी केला आहे.>...तर आरोग्य प्रश्न गंभीर कंत्राटी वाहन चालकांच्या सहा महिने नियुक्तीचा कालावधी २८ फेब्रुवारीला संपला. एक दिवसाचा खंड देऊन त्यांना पुन्हा १ मार्च २०१७ पासून सहा महिने मुदतवाढ देणे आवश्यक आहे. मात्र, वारंवार सभा तहकूब होत असल्याने त्याचा फटका या कामगारांना बसला आहे.या कामगारांचा संबंध दररोज घाणीशी येतो. एक दिवस कचरा वाहून न नेल्यास कचराकुंड्या तुडुंब भरतात. तसेच कचरा रस्त्याच्या लगत पडून राहतो. त्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. पावसाळा तोंडावर आहे. पावसाळ््यात कचरा न उचलल्यास अनारोग्याची स्थिती निर्माण होऊ शकते. तीन महिने मानधन मिळाले नसले तरी कामगारांनी काम थांबवलेले नाही. पगार मिळण्याच्या आशेवर ते काम करत आहेत. या विषयाला तातडीने मान्यता देऊन त्यांचा मानधनाचा मुद्दा निकाली काढावा, अशी अपेक्षा नगरसेवक सामंत यांनी व्यक्त केली आहे.