शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
2
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
4
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
5
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
6
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
7
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
8
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
9
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
10
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
11
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
12
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
13
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
14
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
15
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
16
दीर्घकालीन कोमातील रुग्ण आणि दयामरणाचे वास्तव
17
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
18
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
19
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
20
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
Daily Top 2Weekly Top 5

पाणी वळवावळवीचा 100 वर्षांचा इतिहास

By admin | Updated: September 19, 2015 21:32 IST

ममहाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती आणि वाढत्या नागरीकरणातून शहरी भागाची पाण्याची गरज असा नवा संघर्ष उभा राहण्याची दाट शक्यता नजीकच्या काळात आहे.

- वसंत भोसले (लेखक लोकमतच्या कोल्हापूर आवृत्तीचे संपादक आहेत.)महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती आणि वाढत्या नागरीकरणातून शहरी भागाची पाण्याची गरज असा नवा संघर्ष उभा राहण्याची दाट शक्यता नजीकच्या काळात आहे. कृष्णा किंवा गोदावरी खोऱ्यातील किंवा कावेरीचा पाणी तंटा आदी वादाने आंतरराज्य प्रश्न खूपच गाजले आहेत. आता ते खालपर्यंत येऊ पाहत आहेत. पूर्व वाहिन्या नद्यांच्या खोऱ्यातील पाणी पश्चिमेकडे वळविण्यात आले. त्याला आता १०० वर्षे होऊन गेली. १९११पासून त्याची सुरुवात झाली आणि आता पश्चिमेकडे वळविलेले पाणी मुंबई परिसरातील महानगरांच्या पिण्याच्या पाण्याची तहान भागविण्यासाठी वळविता येईल का? याचा विचार चालू झाला आहे. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर उगम पावणाऱ्या नद्यांचे पाणी अडवून कोकणाच्या तळाशी बसविण्यात आलेल्या वीज उत्पादन केंद्रातून वीज तयार करायची अशी पहिली योजना १९११मध्ये सुरू झाली. टाटा पॉवरने हा यशस्वी प्रयोग केला. तत्पूर्वी, कोयनेचे सर्वेक्षण करण्यात आले होते, पण कोयनेच्या खोऱ्याचा विस्तार मोठा आणि प्रचंड पाणी असल्याने आर्थिक भार पेलवणे शक्य नव्हते. त्यामुळे टाटा पॉवरने पुणे जिल्ह्यातील मुळशी आणि लोणावळ्याजवळ इंद्रायणी नदीवर धरणे बांधली. त्याचे पाणी पूर्व वाहिनी होते. ते पश्चिमेकडे वळवून अनुक्रमे भिरा आणि खोपोली (जि. रायगड) येथे वीजनिर्मिती केंद्रे उभारली. स्वातंत्र्योत्तर काळात कोयनेवर ९८ टीएमसीचे धरण बांधण्यात आले. त्यापैकी ६७.५ टीएमसी पाणी पश्चिमेकडे कोयनेत वळविण्यात आले. त्यातून आता २००० मेगावॅट विजेचे उत्पादन केले जात आहे. या धरणाची साठवण क्षमता वाढवून १०८ टीएमसी पाणी अडविले जाते. त्यापैकी ७५ टीएमसी पाणी पश्चिमेकडे विजेसाठी वळविले जाते. कोयना, मुळशी व खोपोली असे सुमारे १२५ टीएमसी पाणी वापरून खाली सोडण्यात येते.एका बाजूने वाहणारे पाणी दुसरीकडे वळविण्याचे हे मोठे प्रयोग झाले आहेत. त्यापैकी कोयनेचे पाणी वाया जात आहे आणि पूर्वेकडील पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाडा आणि कर्नाटकचा मोठा प्रदेश कायमस्वरूपी अवर्षणाच्या खाईत आहे. आता विजेची मागणी पूर्ण करायची की, शेती, पिण्याचे तसेच इतर उपयोगाचे पाणी म्हणून हे पूर्ववत पूर्वेकडे सोडायचे हा चर्चेचा विषय होऊ शकतो. मुंबईला पाण्याची वाढती मागणी आहे. ती मागणी पूर्ण करावीच लागेल, पण पाणी वळवून द्यायचे का, हा सवाल उपस्थित होतो.कोयनेचे पाणी मुंबईकडे वळविण्यास हरकत नाही, पण कोयनेच्या विजेचा ताण कमी केला तर मुंबईकडे पाणी वळवूनही पूर्वेकडील दुष्काळग्रस्त भागाला अधिक देता येईल, असे दुहेरी नियोजन करण्याची गरज आहे. पाणी वळवावळणीच्या इतिहासावरून काही शिकण्यासारखे आहे, अन्यथा पाण्यासाठी मोठे संघर्ष उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. - भिरा आणि खोपोली (जि. रायगड) येथे वीजनिर्मिती केंद्रे उभारली. त्यातून सुमारे ४०० मेगावॅट विजेचे उत्पादन होत आहे.- २००० मेगावॅट विजेचे उत्पादन सध्या कोयनेच्या धरणात केले जात आहे.- केंद्र सरकारने कोयनेचे पाणी मुंबईकडे वळविण्याच्या प्रस्तावास नुकतीच तत्त्वत: मान्यता दिली आहे. तो प्रकल्प पूर्ण झाल्यास कोयनेचे पाणी कायमस्वरूपी पश्चिमेकडेच द्यावे लागेल. मात्र, पूर्वेकडील वाढती गरजही दुर्लक्षून चालणार नाही. कोयनेचे पाणी मुंबईकडे वळविण्यास हरकत नाही, पण कोयनेच्या विजेचा ताण कमी केला तर मुंबईकडे पाणी वळवूनही पूर्वेकडील दुष्काळग्रस्त भागाला अधिक देता येईल, असे नियोजन हवे. - पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी पाणी वळविण्याचे प्रकल्प हिताचे नाहीत, पाण्याची उपलब्धता पाहून विकासाचे नियोजन व्हायला हवे.- एका बाजूने वाहणारे पाणी दुसरीकडे वळविण्याचे हे मोठे प्रयोग झाले आहेत. त्यापैकी कोयनेचे पाणी वाया जात आहे आणि पूर्वेकडील पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाडा आणि कर्नाटकचा मोठा प्रदेश कायमस्वरूपी अवर्षणाच्या खाईत आहे.