शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

दहावी, बारावी पुनर्परीक्षार्थींना परीक्षेसाठी 100% अभ्यासक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 04:51 IST

शिक्षण मंडळ; नियमित विद्यार्थ्यांची २५ टक्के कपातीचा भाग वगळून परीक्षा

मुंबई : जे विद्यार्थी यंदा दहावी-बारावीच्या परीक्षांना नियमित व माेजके विषय घेऊन बसणार आहेत ते शासनाने अभ्यासक्रमात केलेल्या २५ टक्के कपातीचा लाभ घेऊन परीक्षा देऊ शकतील, तर पुनर्परीक्षार्थींना १०० टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा द्यावी लागणार असल्याचे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने स्पष्ट केले. दहावी, बारावीच्या परीक्षा अवघ्या दोन ते दोन महिन्यांवर असताना अजूनही विद्यार्थी-पालकांमध्ये परीक्षांच्या अभ्यासक्रमाबाबत संभ्रम असल्याने शाळा मुख्याध्यापक, कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य यांच्या माहितीसाठी शिक्षण मंडळाकडून ही  माहिती स्पष्ट करण्यात आली आहे.काेराेना संसर्ग व लाॅकडाऊनमुळे यंदा मार्च २०२० पासून राज्यातील ऑफलाईन शिक्षण बंद झाले. ऑनलाइन शिक्षण सुरू असले तरी या अभ्यासातही विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामाना करावा लागत आहे. ऑनलाइन अभ्यास उशिराने सुरू   झाल्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करणे अवघड झाले आहे. प्रत्यक्ष शिक्षण सुरू नसल्याने प्रात्यक्षिकांचा भाग समजून घेतानाही अडचणी येत असल्याचा नाराजीचा सूर विद्यार्थ्यांमध्ये आहे. मागील डिसेंबर महिन्यापासून राज्यातील शाळा टप्प्याटप्प्याने अर्ध्याच उपस्थितीत सुरू आहेत. पण, अजूनही मुंबई महापालिका क्षेत्रासारख्या शहरी भागात शाळा सुरू झालेल्या नाहीत. अशा परिस्थितीत शासनाकडून दहावी, बारावी बोर्डांच्या परीक्षा जाहीर करण्यात आल्या आहेत.  त्यामुळे पूर्ण अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा घेण्यात येऊ नयेत अशी मागणी विद्यार्थी तसेच पालकांकडून सातत्याने करण्यात येत हाेती.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसेच विद्यार्थी व पालक यांनी केलेल्या मागणीची दखल घेऊन शालेय शिक्षण विभागाने दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचा २५ टक्के अभ्यासक्रम कमी केला. यामुळे विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळेल. मात्र, पुढील दोन ते तीन महिन्यांत परीक्षा असून, या काळात  ७५ टक्के अभ्यासक्रम पूर्ण करणे व त्याची उजळणी घेणे शक्य नाही. तसेच कमी वेळात शिकविलेल्या अभ्यासक्रमाचे विद्यार्थ्यांना नीट आकलन होणे अशक्य असल्याचे मत मुख्याध्यापक संघटनांनी मांडले. संघटनांची ५० टक्के अभ्यासक्रम कपातीची मागणीअभ्यासक्रम पूर्ण शिकवून न झाल्याने नापास होण्याची चिंता अनेक विद्यार्थ्यांना सतावत आहे. परिणामी, विद्यार्थी मानसिक तणावाखाली येण्याची शक्यता लक्षात घेऊन अभ्यासक्रम आणखी २५ टक्के कमी करून ५० टक्के करावा, अशी मागणी मुंबई माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटनेतर्फे करण्यात आली आहे.