शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

दहावी, बारावी पुनर्परीक्षार्थींना परीक्षेसाठी 100% अभ्यासक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 04:51 IST

शिक्षण मंडळ; नियमित विद्यार्थ्यांची २५ टक्के कपातीचा भाग वगळून परीक्षा

मुंबई : जे विद्यार्थी यंदा दहावी-बारावीच्या परीक्षांना नियमित व माेजके विषय घेऊन बसणार आहेत ते शासनाने अभ्यासक्रमात केलेल्या २५ टक्के कपातीचा लाभ घेऊन परीक्षा देऊ शकतील, तर पुनर्परीक्षार्थींना १०० टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा द्यावी लागणार असल्याचे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने स्पष्ट केले. दहावी, बारावीच्या परीक्षा अवघ्या दोन ते दोन महिन्यांवर असताना अजूनही विद्यार्थी-पालकांमध्ये परीक्षांच्या अभ्यासक्रमाबाबत संभ्रम असल्याने शाळा मुख्याध्यापक, कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य यांच्या माहितीसाठी शिक्षण मंडळाकडून ही  माहिती स्पष्ट करण्यात आली आहे.काेराेना संसर्ग व लाॅकडाऊनमुळे यंदा मार्च २०२० पासून राज्यातील ऑफलाईन शिक्षण बंद झाले. ऑनलाइन शिक्षण सुरू असले तरी या अभ्यासातही विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामाना करावा लागत आहे. ऑनलाइन अभ्यास उशिराने सुरू   झाल्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करणे अवघड झाले आहे. प्रत्यक्ष शिक्षण सुरू नसल्याने प्रात्यक्षिकांचा भाग समजून घेतानाही अडचणी येत असल्याचा नाराजीचा सूर विद्यार्थ्यांमध्ये आहे. मागील डिसेंबर महिन्यापासून राज्यातील शाळा टप्प्याटप्प्याने अर्ध्याच उपस्थितीत सुरू आहेत. पण, अजूनही मुंबई महापालिका क्षेत्रासारख्या शहरी भागात शाळा सुरू झालेल्या नाहीत. अशा परिस्थितीत शासनाकडून दहावी, बारावी बोर्डांच्या परीक्षा जाहीर करण्यात आल्या आहेत.  त्यामुळे पूर्ण अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा घेण्यात येऊ नयेत अशी मागणी विद्यार्थी तसेच पालकांकडून सातत्याने करण्यात येत हाेती.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसेच विद्यार्थी व पालक यांनी केलेल्या मागणीची दखल घेऊन शालेय शिक्षण विभागाने दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचा २५ टक्के अभ्यासक्रम कमी केला. यामुळे विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळेल. मात्र, पुढील दोन ते तीन महिन्यांत परीक्षा असून, या काळात  ७५ टक्के अभ्यासक्रम पूर्ण करणे व त्याची उजळणी घेणे शक्य नाही. तसेच कमी वेळात शिकविलेल्या अभ्यासक्रमाचे विद्यार्थ्यांना नीट आकलन होणे अशक्य असल्याचे मत मुख्याध्यापक संघटनांनी मांडले. संघटनांची ५० टक्के अभ्यासक्रम कपातीची मागणीअभ्यासक्रम पूर्ण शिकवून न झाल्याने नापास होण्याची चिंता अनेक विद्यार्थ्यांना सतावत आहे. परिणामी, विद्यार्थी मानसिक तणावाखाली येण्याची शक्यता लक्षात घेऊन अभ्यासक्रम आणखी २५ टक्के कमी करून ५० टक्के करावा, अशी मागणी मुंबई माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटनेतर्फे करण्यात आली आहे.