शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

राज्यातील १० हजार कामगार दिल्लीवर धडकणार - कामगार किसान संघर्ष रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 03:41 IST

केंद्र व राज्य शासनाकडून कामगार कायद्यात होणाऱ्या कामगारविरोधी बदलांना विरोध करण्यासाठी दिल्लीच्या जंतरमंतर मैदानावर ५ सप्टेंबरला कामगार किसान संघर्ष रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबई : केंद्र व राज्य शासनाकडून कामगार कायद्यात होणाऱ्या कामगारविरोधी बदलांना विरोध करण्यासाठी दिल्लीच्या जंतरमंतर मैदानावर ५ सप्टेंबरला कामगार किसान संघर्ष रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.भारतीय ट्रेड युनियन केंद्र (सीटू)चे उपाध्यक्ष डॉ. डी.एल. कराड म्हणाले की, सीटू किसानसभा आणि शेतमजूर युनियनच्या वतीने कामगार व शेतक-यांच्या जिव्हाळ्याच्या मागण्यांसाठी ५ लाख कष्टक-यांचा मोर्चा दिल्लीमध्ये काढण्यात येईल. पूर्वीच्या काँग्रेस आणि सध्याच्या भाजपाप्रणीत सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी व कामगार मेटाकुटीस आले आहेत. निवडणुकीत दिलेली आश्वासने केंद्र व राज्य सरकारने पाळलेली नाहीत. त्यामुळे कामगार, शेतकरी, मजूर यांच्या सर्व प्रश्नांनी भीषण स्वरूप धारण केले आहे. याचाच जाब विचारण्यासाठी व कामगार कायद्यांतील बदलांविरोधात रोष व्यक्त करण्यासाठी मोर्चा काढण्यात येईल.रॅलीच्या माध्यमातून सध्याच्या कामगार कायद्याची कडक अंमलबजावणी करा, कायद्यातील प्रस्तावित कामगारविरोधी व मालकधार्जिणे बदल रद्द करा, खासगीकरण व कंत्राटीकरण धोरण मागे घ्या, कंत्राटी कामगारांना कायम करा, समान कामाला समान वेतन व भत्ते द्या, आदी मागण्या सरकारपुढे ठेवण्यात येतील. याशिवाय बेरोजगारांना काम, दरमहा ३ हजार निर्वाह भत्ता, बंद उद्योग सुरू करण्याचे आवाहन केले जाईल. शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी, शेतीमालाला उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा धरून आधारभूत भावाची हमी आदी मागण्यांसह शेतकरी, शेतमजूरही रॅलीत सामील होतील.‘१० हजारांहून जास्त कामगार सहभागी होणार’रॅलीच्या तयारीसाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कामगारांचे मेळावे घेऊन जागृती केली आहे. कामगार वर्गाच्या जिव्हाळ्याच्या ३६ प्रश्नांवर प्रचाराचे मुद्दे, ६ पुस्तिका प्रसिद्ध केल्या आहेत. त्यामुळे किमान १० हजारांहून जास्त कामगार या मोर्चात सहभागी होण्याची आशा संघटनेने व्यक्त केली.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र