शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

राज्यातील १० हजार कामगार दिल्लीवर धडकणार - कामगार किसान संघर्ष रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 03:41 IST

केंद्र व राज्य शासनाकडून कामगार कायद्यात होणाऱ्या कामगारविरोधी बदलांना विरोध करण्यासाठी दिल्लीच्या जंतरमंतर मैदानावर ५ सप्टेंबरला कामगार किसान संघर्ष रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबई : केंद्र व राज्य शासनाकडून कामगार कायद्यात होणाऱ्या कामगारविरोधी बदलांना विरोध करण्यासाठी दिल्लीच्या जंतरमंतर मैदानावर ५ सप्टेंबरला कामगार किसान संघर्ष रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.भारतीय ट्रेड युनियन केंद्र (सीटू)चे उपाध्यक्ष डॉ. डी.एल. कराड म्हणाले की, सीटू किसानसभा आणि शेतमजूर युनियनच्या वतीने कामगार व शेतक-यांच्या जिव्हाळ्याच्या मागण्यांसाठी ५ लाख कष्टक-यांचा मोर्चा दिल्लीमध्ये काढण्यात येईल. पूर्वीच्या काँग्रेस आणि सध्याच्या भाजपाप्रणीत सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी व कामगार मेटाकुटीस आले आहेत. निवडणुकीत दिलेली आश्वासने केंद्र व राज्य सरकारने पाळलेली नाहीत. त्यामुळे कामगार, शेतकरी, मजूर यांच्या सर्व प्रश्नांनी भीषण स्वरूप धारण केले आहे. याचाच जाब विचारण्यासाठी व कामगार कायद्यांतील बदलांविरोधात रोष व्यक्त करण्यासाठी मोर्चा काढण्यात येईल.रॅलीच्या माध्यमातून सध्याच्या कामगार कायद्याची कडक अंमलबजावणी करा, कायद्यातील प्रस्तावित कामगारविरोधी व मालकधार्जिणे बदल रद्द करा, खासगीकरण व कंत्राटीकरण धोरण मागे घ्या, कंत्राटी कामगारांना कायम करा, समान कामाला समान वेतन व भत्ते द्या, आदी मागण्या सरकारपुढे ठेवण्यात येतील. याशिवाय बेरोजगारांना काम, दरमहा ३ हजार निर्वाह भत्ता, बंद उद्योग सुरू करण्याचे आवाहन केले जाईल. शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी, शेतीमालाला उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा धरून आधारभूत भावाची हमी आदी मागण्यांसह शेतकरी, शेतमजूरही रॅलीत सामील होतील.‘१० हजारांहून जास्त कामगार सहभागी होणार’रॅलीच्या तयारीसाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कामगारांचे मेळावे घेऊन जागृती केली आहे. कामगार वर्गाच्या जिव्हाळ्याच्या ३६ प्रश्नांवर प्रचाराचे मुद्दे, ६ पुस्तिका प्रसिद्ध केल्या आहेत. त्यामुळे किमान १० हजारांहून जास्त कामगार या मोर्चात सहभागी होण्याची आशा संघटनेने व्यक्त केली.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र