शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

राज्यातील १० हजार कामगार दिल्लीवर धडकणार - कामगार किसान संघर्ष रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 03:41 IST

केंद्र व राज्य शासनाकडून कामगार कायद्यात होणाऱ्या कामगारविरोधी बदलांना विरोध करण्यासाठी दिल्लीच्या जंतरमंतर मैदानावर ५ सप्टेंबरला कामगार किसान संघर्ष रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबई : केंद्र व राज्य शासनाकडून कामगार कायद्यात होणाऱ्या कामगारविरोधी बदलांना विरोध करण्यासाठी दिल्लीच्या जंतरमंतर मैदानावर ५ सप्टेंबरला कामगार किसान संघर्ष रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.भारतीय ट्रेड युनियन केंद्र (सीटू)चे उपाध्यक्ष डॉ. डी.एल. कराड म्हणाले की, सीटू किसानसभा आणि शेतमजूर युनियनच्या वतीने कामगार व शेतक-यांच्या जिव्हाळ्याच्या मागण्यांसाठी ५ लाख कष्टक-यांचा मोर्चा दिल्लीमध्ये काढण्यात येईल. पूर्वीच्या काँग्रेस आणि सध्याच्या भाजपाप्रणीत सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी व कामगार मेटाकुटीस आले आहेत. निवडणुकीत दिलेली आश्वासने केंद्र व राज्य सरकारने पाळलेली नाहीत. त्यामुळे कामगार, शेतकरी, मजूर यांच्या सर्व प्रश्नांनी भीषण स्वरूप धारण केले आहे. याचाच जाब विचारण्यासाठी व कामगार कायद्यांतील बदलांविरोधात रोष व्यक्त करण्यासाठी मोर्चा काढण्यात येईल.रॅलीच्या माध्यमातून सध्याच्या कामगार कायद्याची कडक अंमलबजावणी करा, कायद्यातील प्रस्तावित कामगारविरोधी व मालकधार्जिणे बदल रद्द करा, खासगीकरण व कंत्राटीकरण धोरण मागे घ्या, कंत्राटी कामगारांना कायम करा, समान कामाला समान वेतन व भत्ते द्या, आदी मागण्या सरकारपुढे ठेवण्यात येतील. याशिवाय बेरोजगारांना काम, दरमहा ३ हजार निर्वाह भत्ता, बंद उद्योग सुरू करण्याचे आवाहन केले जाईल. शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी, शेतीमालाला उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा धरून आधारभूत भावाची हमी आदी मागण्यांसह शेतकरी, शेतमजूरही रॅलीत सामील होतील.‘१० हजारांहून जास्त कामगार सहभागी होणार’रॅलीच्या तयारीसाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कामगारांचे मेळावे घेऊन जागृती केली आहे. कामगार वर्गाच्या जिव्हाळ्याच्या ३६ प्रश्नांवर प्रचाराचे मुद्दे, ६ पुस्तिका प्रसिद्ध केल्या आहेत. त्यामुळे किमान १० हजारांहून जास्त कामगार या मोर्चात सहभागी होण्याची आशा संघटनेने व्यक्त केली.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र