शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

 दहावी फेरपरीक्षेत औरंगाबाद बोर्डातील तब्बल १० हजार विद्यार्थी नापास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 19:15 IST

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जुलै महिन्यात घेतलेल्या दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल आज मंगळवारी आॅनलाइन जाहीर करण्यात आला. औरंगाबाद विभागीय मंडळाचा निकाल २७.०७ टक्के एवढा लागला असून पाच जिल्ह्यातील १३ हजार १७२ विद्यार्थ्यांपैकी जवळपास १० हजार विद्यार्थी या परीक्षेत नापास झाले आहेत. 

ठळक मुद्दे१८ जुलै ते २ आॅगस्ट दरम्यान दहावीची फेरपरीक्षा घेण्यात आली. पाच जिल्ह्यातील १३ हजार १७२ विद्यार्थी परीक्षेला प्रवीष्ठ, यापैकी ३ हजार ५६६ विद्यार्थी उत्तिर्ण झाले.फेरपरीक्षेचा निकाल मागील वर्षाच्या तुलनेत ४.९२ अर्थात जवळपास ५ टक्क्यांनी घटला आहे.

औरंगाबाद, दि. 29:राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जुलै महिन्यात घेतलेल्या दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल आज मंगळवारी आॅनलाइन जाहीर करण्यात आला. औरंगाबाद विभागीय मंडळाचा निकाल २७.०७ टक्के एवढा लागला असून पाच जिल्ह्यातील १३ हजार १७२ विद्यार्थ्यांपैकी जवळपास १० हजार विद्यार्थी या परीक्षेत नापास झाले आहेत. 

यासंदर्भात विभागीय मंडळाच्या नवनियुक्त सचिव एस. एस. पुन्ने यांनी सांगितले की, यंदा १८ जुलै ते २ आॅगस्ट दरम्यान दहावीची फेरपरीक्षा घेण्यात आली. विभागीय मंडळांतर्गत औरंगाबाद, बीड, परभणी, जालना आणि हिंगोली या पाच जिल्ह्यातील १३ हजार १७२ विद्यार्थी परीक्षेला प्रवीष्ठ झाले होते. यापैकी ३ हजार ५६६ विद्यार्थी उत्तिर्ण झाले. अनुत्तिर्ण विद्यार्थ्यांची संख्या लक्षनीय आहे. दहावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून शिक्षणमंत्री विनोद तावडेंच्या संकल्पनेतून या विद्यार्थ्यांची जुलैमध्येच फेरपरीक्षा घेण्यात आली होती. या फेरपरीक्षेचा निकाल मागील वर्षाच्या तुलनेत ४.९२ अर्थात जवळपास ५ टक्क्यांनी घटला आहे. याही परीक्षेत मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तिर्णतेचे प्रमाण ६.१७ टक्क्यांनी अधिक आहे. 

राज्यातील नऊ विभागीय मंडळांमध्ये औरंगाबाद मंडळ या निकालात चौथ्या क्रमांकावर फेकले गेले आहे. राज्यात नागपूर विभागीय मंडळाचा निकाल ३१.१० टक्के लागला असून त्याने अव्वल स्थान पटकावले आहे. दुसºया क्रमांकावर नाशिक (२९.४६ टक्के), तिसºया क्रमांकावर अमरावती (२८.२५ टक्के) विभागीय मंडळ स्थिरावले आहे. सन २०१५ पासून जुलैमध्येच फेर परीक्षा घेण्याची पद्धत सुरू झाली. त्यावर्षी औरंगाबाद विभागीय मंडळांचा निकाल २७.६५ टक्के आणि गेल्या वर्षी ३१.१९ टक्के निकाल लागला होता. गत वर्षाच्या तुलनेत निकालात मोठी घसरण झालेली आहे. या परीक्षेत उत्तिर्ण विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावीमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने राबविलेल्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातूनच या विद्यार्थ्यांचा विचार केला जाणार आहे. 

गुणपत्रिकाबाबत बोर्डाने साधली चुप्पीदहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल तर लागला; पण या परीक्षेच्या गुणपत्रिका कधी वाटप करणार, अशी विचारणा केली असता बोर्डाच्या विभागीय सचिव एस. एस. पुन्ने यांनी सांगितले की, गुणपत्रिकेबाबत राज्य मंडळाकडून आम्हाला कोणत्याही सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे गुणपत्रिका विद्यार्थ्यांना कधी मिळणार, याबद्दल तूर्तास तरी आम्ही सांगू शकत नसल्याचे पुन्ने म्हणाल्या. तथापि, या परीक्षेत औरंगाबाद जिल्ह्यातील १ हजार १९६ विद्यार्थी, बीड- ५८२, परभणी- ५१८, जालना- ६०५ आणि हिंगोली जिल्ह्यातील ६६५ विद्यार्थी उत्तिर्ण झाले आहेत.