शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

 दहावी फेरपरीक्षेत औरंगाबाद बोर्डातील तब्बल १० हजार विद्यार्थी नापास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 19:15 IST

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जुलै महिन्यात घेतलेल्या दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल आज मंगळवारी आॅनलाइन जाहीर करण्यात आला. औरंगाबाद विभागीय मंडळाचा निकाल २७.०७ टक्के एवढा लागला असून पाच जिल्ह्यातील १३ हजार १७२ विद्यार्थ्यांपैकी जवळपास १० हजार विद्यार्थी या परीक्षेत नापास झाले आहेत. 

ठळक मुद्दे१८ जुलै ते २ आॅगस्ट दरम्यान दहावीची फेरपरीक्षा घेण्यात आली. पाच जिल्ह्यातील १३ हजार १७२ विद्यार्थी परीक्षेला प्रवीष्ठ, यापैकी ३ हजार ५६६ विद्यार्थी उत्तिर्ण झाले.फेरपरीक्षेचा निकाल मागील वर्षाच्या तुलनेत ४.९२ अर्थात जवळपास ५ टक्क्यांनी घटला आहे.

औरंगाबाद, दि. 29:राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जुलै महिन्यात घेतलेल्या दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल आज मंगळवारी आॅनलाइन जाहीर करण्यात आला. औरंगाबाद विभागीय मंडळाचा निकाल २७.०७ टक्के एवढा लागला असून पाच जिल्ह्यातील १३ हजार १७२ विद्यार्थ्यांपैकी जवळपास १० हजार विद्यार्थी या परीक्षेत नापास झाले आहेत. 

यासंदर्भात विभागीय मंडळाच्या नवनियुक्त सचिव एस. एस. पुन्ने यांनी सांगितले की, यंदा १८ जुलै ते २ आॅगस्ट दरम्यान दहावीची फेरपरीक्षा घेण्यात आली. विभागीय मंडळांतर्गत औरंगाबाद, बीड, परभणी, जालना आणि हिंगोली या पाच जिल्ह्यातील १३ हजार १७२ विद्यार्थी परीक्षेला प्रवीष्ठ झाले होते. यापैकी ३ हजार ५६६ विद्यार्थी उत्तिर्ण झाले. अनुत्तिर्ण विद्यार्थ्यांची संख्या लक्षनीय आहे. दहावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून शिक्षणमंत्री विनोद तावडेंच्या संकल्पनेतून या विद्यार्थ्यांची जुलैमध्येच फेरपरीक्षा घेण्यात आली होती. या फेरपरीक्षेचा निकाल मागील वर्षाच्या तुलनेत ४.९२ अर्थात जवळपास ५ टक्क्यांनी घटला आहे. याही परीक्षेत मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तिर्णतेचे प्रमाण ६.१७ टक्क्यांनी अधिक आहे. 

राज्यातील नऊ विभागीय मंडळांमध्ये औरंगाबाद मंडळ या निकालात चौथ्या क्रमांकावर फेकले गेले आहे. राज्यात नागपूर विभागीय मंडळाचा निकाल ३१.१० टक्के लागला असून त्याने अव्वल स्थान पटकावले आहे. दुसºया क्रमांकावर नाशिक (२९.४६ टक्के), तिसºया क्रमांकावर अमरावती (२८.२५ टक्के) विभागीय मंडळ स्थिरावले आहे. सन २०१५ पासून जुलैमध्येच फेर परीक्षा घेण्याची पद्धत सुरू झाली. त्यावर्षी औरंगाबाद विभागीय मंडळांचा निकाल २७.६५ टक्के आणि गेल्या वर्षी ३१.१९ टक्के निकाल लागला होता. गत वर्षाच्या तुलनेत निकालात मोठी घसरण झालेली आहे. या परीक्षेत उत्तिर्ण विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावीमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने राबविलेल्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातूनच या विद्यार्थ्यांचा विचार केला जाणार आहे. 

गुणपत्रिकाबाबत बोर्डाने साधली चुप्पीदहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल तर लागला; पण या परीक्षेच्या गुणपत्रिका कधी वाटप करणार, अशी विचारणा केली असता बोर्डाच्या विभागीय सचिव एस. एस. पुन्ने यांनी सांगितले की, गुणपत्रिकेबाबत राज्य मंडळाकडून आम्हाला कोणत्याही सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे गुणपत्रिका विद्यार्थ्यांना कधी मिळणार, याबद्दल तूर्तास तरी आम्ही सांगू शकत नसल्याचे पुन्ने म्हणाल्या. तथापि, या परीक्षेत औरंगाबाद जिल्ह्यातील १ हजार १९६ विद्यार्थी, बीड- ५८२, परभणी- ५१८, जालना- ६०५ आणि हिंगोली जिल्ह्यातील ६६५ विद्यार्थी उत्तिर्ण झाले आहेत.