शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

आरटीआयअंतर्गत वर्षात १० हजार अर्ज

By admin | Updated: June 11, 2016 02:36 IST

सिडको व महानगरपालिकेमध्ये प्रत्येक वर्षी माहिती अधिकाराचे जवळपास दहा हजार अर्ज दाखल होत आहेत.

नामदेव मोरे,

नवी मुंबई- सिडको व महानगरपालिकेमध्ये प्रत्येक वर्षी माहिती अधिकाराचे जवळपास दहा हजार अर्ज दाखल होत आहेत. संदीप ठाकूर यांच्यासारखे प्रामाणिक कार्यकर्ते शहरातील अनेक समस्या आरटीआयच्या माध्यमातून सोडवत आहेत. परंतु दुसरीकडे स्वयंघोषित पूर्णवेळ आरटीआय कार्यकर्ते अधिकाऱ्यांवर दबाव आणून स्वत:चा अर्थमय हेतू साध्य करण्यात मग्न असून, अशा कार्यकर्त्यांवर आता करडी नजर ठेवली जात आहे. नेरूळमधील नाल्याची सुधारणा करण्याचे काम महापालिकेने सुरू केले आहे. काम सुरू झाल्यापासून जवळपास दीड वर्षामध्ये तब्बल १०६ माहिती अधिकाराचे अर्ज पालिकेकडे आले आहेत. एकाच कामाविषयी एवढे अर्ज आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महापालिका व सिडकोच्या अधिकाऱ्यांसाठी आता या अर्जांची सवय झाली आहे. शासकीय कामकाजामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी माहिती अधिकार कायदा तयार करण्यात आला. देशभर या कायद्यामुळे अनेक घोटाळे उघडकीस आले आहेत. नवी मुंबईमध्ये संदीप ठाकूर यांच्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांच्या भाच्याचे ग्लास हाऊस, रेतीबंदरमधील अनधिकृत बांधकामाची प्रकरणेही उघडकीस आणून त्यावर कारवाई करण्यास भाग पाडले. संजय सुर्वे यांनी सिडकोचे भूखंड वाटप प्रकरण, महापालिकेतील अतिक्रमण घोटाळा व इतर अनेक प्रकरणे उघडकीस आणून ते पूर्णत्वास नेले आहेत. नवी मुंबईमध्ये सद्य:स्थितीमध्ये आरटीआयचा योग्य वापर करण्यापेक्षा ब्लॅकमेलिंगसाठी जास्त वापर होवू लागला आहे. शहरात पूर्णवेळ आरटीआय कार्यकर्त्यांची संख्या वाढली आहे. महापालिका व सिडकोने एखादे विकासकाम सुरू केले की लगेच अर्जांची सरबत्ती सुरू होते. कामाची निविदा, त्याची मुदत यापासून अनेक अनावश्यक गोष्टींची माहिती मागविली जात आहे. माहिती मिळाली की अधिकाऱ्यांसह ठेकेदारावर दबाव आणून अर्थमय हेतू साध्य केले जात आहेत. यापूर्वी एलबीटी विभागाने सापळा रचून एका माहिती अधिकार कार्यकर्त्याला खंडणी विरोधी पथकाच्या ताब्यात दिले होते. परंतु आता पुन्हा एकदा पूर्णवेळ कार्यकर्त्यांचे प्रस्थ वाढले आहे. ऐरोली परिसरामध्ये एका जणाविरोधात नुकताच गुन्हा दाखल झाला आहे. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी असताना चुकीचे काम करणाऱ्या काही आरटीआय कार्यकर्त्यांवरही कारवाई केल्याची चर्चा आहे. त्यांनी महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून अनेक उपद्रवी कार्यकर्त्यांची वर्दळ थांबली आहे. प्रशासन प्रमुख कणखर असल्याने आता अधिकाऱ्यांचीही हिंमत वाढू लागली असून भविष्यात विनाकारण दबाव आणणाऱ्यांवर रीतसर कारवाई केली जाणार आहे. मागविलेल्या माहितीचे काय होते? महापालिका व सिडकोमध्ये प्रत्येक वर्षी जवळपास १० हजार आरटीआयचे अर्ज पडत आहेत. यामध्ये स्वयंघोषित समाजसेवकांचा वाटा मोठा आहे. माहिती मागवून पुढे त्याचे काय केले जाते? ज्या विषयांविषयी भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात, त्याचा पाठपुरावा केला का याचे सर्वेक्षण केल्यास चुकीचे काम करणाऱ्यांचा तपशील सहज उपलब्ध होवू शकणार आहे. जेवणाची वेळ काय? एक स्वयंघोषित माहिती अधिकार कार्यकर्ता पालिकेत अर्ज टाकण्यासाठी गेला होता. त्यावेळी संबंधित कर्मचारी जेवण करत होते. थोडा वेळ थांबण्यास सांगितल्याने त्यांच्या रागाचा पारा वाढला. त्यांनी बसलेल्या ठिकाणी कागद-पेन काढला व तत्काळ आरटीआयचा अर्ज तयार करून जेवणाची वेळ काय, कोणी ठरविली याविषयी माहिती मागितली. अशाप्रकारे असंबंध माहिती मागविणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे. आर्थिक व्यवहारामध्येच रस अपवाद वगळता माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा जनतेच्या समस्येशी काहीही संबंध नाही. ९५ टक्के अर्ज अभियांत्रिकी विभागाशी संबंधित असतात. जेवढे आर्थिक रकमेचे काम तेवढे जास्त अर्ज पालिका व सिडको कार्यालयात जमा होत असल्याचे चित्र दिसत आहे. एकाच विषयावर वारंवार अर्ज सिडकोकडे माहिती अधिकाराचा वापर करणाऱ्यांचे प्रमाणही जास्त आहे. घेतलेल्या माहितीचा कोणताही विधायक वापर होत नाही. एक टक्का विषयही पूर्णत्वास नेले जात नाही. एकाच विषयावर एकच व्यक्ती वारंवार अर्ज करत असल्याचेही निदर्शनास आले आहे.