शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

जागा १०, रिंगणात उमेदवार ११; विधान परिषदेतही चुरशीची लढत!, अपक्षच पुन्हा ठरणार किंगमेकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 05:44 IST

राज्यसभा निवडणुकीत झटका बसलेल्या महाविकास आघाडीला २० जून रोजी पुन्हा एकदा कसोटीला सामोरे जावे लागेल ते विधान परिषदेच्या दहा जागांसाठीच्या निवडणुकीच्या निमित्ताने.

 मुंबई :

राज्यसभा निवडणुकीत झटका बसलेल्या महाविकास आघाडीला २० जून रोजी पुन्हा एकदा कसोटीला सामोरे जावे लागेल ते विधान परिषदेच्या दहा जागांसाठीच्या निवडणुकीच्या निमित्ताने. १० जागांसाठी ११  उमेदवार रिंगणात असल्याने पुन्हा एकदा महाविकास आघाडी व भाजप आमनेसामने आहेत. त्यातच या निवडणुकीत गुप्त मतदान असल्याने दोन्ही बाजूंचे टेन्शन वाढले आहे. 

भाजप समर्थित अपक्ष सदाभाऊ खोत आणि राष्ट्रवादीचे शिवाजीराव गर्जे या दोघांनी सोमवारी अर्ज मागे घेतला. भाजपने पाचवी जागा लढवू नये, अशी विनंती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना केली. मात्र, काँग्रेसने दुसऱ्या जागेवर माघार घ्यावी, असे आवाहन फडणवीस यांनी केले. दोघांनीही एकमेकांना प्रतिसाद न दिल्याने दहाच दिवसांच्या अंतराने पुन्हा एका निवडणुकीचे राजकीय थरारनाट्य होऊ घातले आहे.  

लहान पक्ष, अपक्षच पुन्हा ठरणार किंगमेकर- राज्यसभेप्रमाणेच याही निवडणुकीत अपक्ष आणि लहान पक्षांच्या एकूण २९ आमदारांच्या मतांना प्रचंड महत्त्व असेल. -  शिवसेना सोडून सर्वच पक्षांना त्यांची मनधरणी करावी लागेल, असे दिसते. नाराज आमदारांची नाराजी महाविकास आघाडी सरकारकडून दूर करून त्यांना आपल्याकडे वळविले जाते की आधीपेक्षा जास्त आमदार भाजपला साथ देतात यावर निकालाचे अवलंबून असेल. 

राष्ट्रपतिपदासाठी शरद पवार अनुत्सुक राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत बिगर भाजप पक्षांकडून उमेदवार निवडीसाठी हालचाली सुरु आहेत. यासाठी चर्चा आणि बैठकांचे सत्र सुरु आहे.  मात्र, शरद पवार हे राष्ट्रपतीपदाची  निवडणूक लढविण्यास इच्छुक नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. असे आहेत उमेदवारशिवसेना: सचिन अहीर, आमशा पाडवी.राष्ट्रवादी : रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसे. काँग्रेस : चंद्रकांत हंडोरे, भाई जगताप.भाजप : प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड.जगताप की लाड? राज्यसभा निवडणुकीत भाजपचे धनंजय महाडिक जिंकणार की संजय पवार याविषयी उत्कंठा होती. विधान परिषदेच्या निवडणुकीत सर्व पक्षांच्या मतांचे गणित बघता दहाव्या जागेवर काँग्रेसचे भाई जगताप जिंकणार की भाजपचे प्रसाद लाड बाजी मारणार अशी उत्कंठा राहू शकते.

कोणासाठी काय कठीण? शिवसेना : या निवडणुकीत पहिल्या पसंतीच्या मतांच्या आधारे निवडून येण्यासाठी २७ चा कोटा आहे. शिवसेनेचे ५५ आमदार आहेत. त्यांचे २ उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. राष्ट्रवादी : ५३ आमदार आहेत. राज्यसभेप्रमाणे अनिल देशमुख, नवाब मलिक यांना मताधिकार न मिळाल्यास राष्ट्रवादीकडे ५१ आमदार उरतील. दोन उमेदवार निवडून तीन मतांची गरज असेल.भाजप : स्वत:चे १०६ आमदार व ७ अपक्ष सोबत असल्याने आकडा ११३ आहे. चार आमदार निवडून येऊ शकतात, पण पाचवा आणण्यासाठी त्यांना १३५ मते लागतील. राज्यसभेत भाजपला पहिल्या पसंतीची १२३ मते मिळाली. तेवढी कायम ठेवून त्यांना आणखी १२ मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. काँग्रेस : ४४ आमदार आहेत. २ उमेदवार निवडून आणायचे तर १० मते लागतील. हा झाला पहिल्या पसंतीच्या मतांचा हिशेब. मात्र, निवडणूक दुसऱ्या पसंतीच्या मतांवर गेली तर चित्र आणखी वेगळे होऊ शकते.

माझा चमत्कारावर विश्वास नाही पण महाविकास आघाडीत असमन्वय आहे. त्यांच्या आमदारांमध्ये कमालीची नाराजी आहे. ती आगामी निवडणुकीत उफाळून येण्याची शक्यता आहे. भाजप पाच जागा नक्कीच जिंकेल.     - देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे विरोधी पक्षनेते.

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSadabhau Khotसदाभाउ खोत