शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

'शाळा घोटाळा'... मंत्र्यांना डच्चू मिळण्याच्या १ दिवस आधी १० शाळांचं नियमबाह्य हस्तांतरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 09:07 IST

अन्याय झालेल्या शाळेची कैफियत : मतिमंद, मूकबधिरांच्या शाळा देताना नियमबाह्य व्यवहार!

- यदु जोशीमुंबई : सामाजिक न्याय विभागाच्या मंत्रिपदावरुन राजकुमार बडोले यांची गच्छंती होण्याच्या बरोबर एक दिवस आधी मतिमंद, मूकबधिर मुलांसाठीच्या दहा शाळांचे हस्तांतरण करण्यात आले. हे हस्तांतरण नियमबाह्य व मनमानी पद्धतीने करण्यात आले असल्याच्या लेखी तक्रारी आता सुरू झाल्या आहेत.योगायोग असा की, १६ जूनला बडोलेंना डच्चू मिळाला आणि त्याच्या अदल्या दिवशी १५ जूनला सगळे जीआर निघाले. बंद झालेल्या शाळांच्या परिसरातील मूकबधिर, मतिमंद मुलांना कुठे सामावून घेतले हा प्रश्न आहे. पुण्याची शाळा नागपूरला दिली, लातूरची शाळा नागपूरच्या संस्थेला हस्तांतरित केली. हे करताना मुलांऐवजी संस्थाचालकांच्या हिताचा विचार केला गेला, असा आरोप होत आहे.अपंग कल्याण आयुक्त; पुणे यांच्या अध्यक्षतेखालील समिती आलेल्या प्रस्तावांची छाननी करून विभागाला शिफारस करेल असा जीआर आधी काढण्यात आला होता. तो रद्द का करण्यात आला, तरीही हस्तांतरण हे या समितीनेच सुचविलेले होते असे का दर्शविण्यात आले, असे प्रश्न निर्माण झाले आहेत.

वाशिम जिल्ह्यातील मिरागिरधर बहुउद्देशीय शिक्षण संस्थेने आता नवे सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे यांना पाठविलेल्या पत्रात नियमबाह्य शाळा हस्तांतरणाची तक्रार केली आहे. अपंग कल्याण आयुक्त; पुणे यांनी हस्तांतरित करावयाच्या शाळांसाठी अर्ज मागविले होते. आम्ही मुदतीत अर्ज केला. दिवंगत भास्करराव शिंगणे मूकबधिर शाळा; लोणार ही शाळा आम्ही मागितली होती पण ती आम्हाला दिली नाही. आम्ही अपात्र ठरल्याचेही आयुक्तालयाने कळविले नाही. ही शाळा समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद वाशिम येथे कार्यरत एका कर्मचाऱ्याशी संबंधित व्यक्तीच्या संस्थेला देण्यात आली. सर्व नियम धाब्यावर बसवून आणि हितसंबंध जपून हस्तांतरण करण्यात आले, असे या पत्रात म्हटले आहे.

नव्या मंत्र्यांवरही ‘लाल’जादूराजकुमार बडोले यांच्या काळात सामजिक न्याय विभागातील कंत्राटांच्या वाटपात ‘लाल’जादूची ‘वाणी’ चालायची. (लालवाणी म्हणजे काय ते विभागात सगळ्यांना कळतं). आता सुरेश खाडे यांच्यावरही तीच जादू चालू असल्याची चर्चा आहे.त्यासाठी विभागाला वेळ नाहीअपंगांसाठी काही शाळा अत्यंत चांगले काम करतात. त्यांना मंजूर असलेल्या तुकड्या व त्यातील विद्यार्थी संख्येपेक्षा अधिक संख्या त्यांच्याकडे आहेत. अधिकच्या तुकड्या व विद्यार्थ्यांवरील खर्च संस्था स्वत: करतात. त्यांना वाढीव तुकड्या व अनुदान द्यावे, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा होती. त्यांच्या निर्देशानुसार सामाजिक न्याय विभागाने वित्त विभागाला प्रस्ताव पाठविला.मंत्रिमहोदय, आपण काय करणार?च्शाळांचे नियमबाह्य हस्तांतरण करण्यात आले ही बाब समोर आलेली असताना आता नवे मंत्री सुरेश खाडे हे हस्तांतरण रद्द करणार का, हा प्रश्न आहे. नव्याने प्रस्ताव मागवायचे वा आधीच्या गैरव्यवहारांना संरक्षण देऊन निर्णय कायम ठेवायचा, असे दोनच पर्याय खाडे यांच्यासमोर आहेत.