शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

'शाळा घोटाळा'... मंत्र्यांना डच्चू मिळण्याच्या १ दिवस आधी १० शाळांचं नियमबाह्य हस्तांतरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 09:07 IST

अन्याय झालेल्या शाळेची कैफियत : मतिमंद, मूकबधिरांच्या शाळा देताना नियमबाह्य व्यवहार!

- यदु जोशीमुंबई : सामाजिक न्याय विभागाच्या मंत्रिपदावरुन राजकुमार बडोले यांची गच्छंती होण्याच्या बरोबर एक दिवस आधी मतिमंद, मूकबधिर मुलांसाठीच्या दहा शाळांचे हस्तांतरण करण्यात आले. हे हस्तांतरण नियमबाह्य व मनमानी पद्धतीने करण्यात आले असल्याच्या लेखी तक्रारी आता सुरू झाल्या आहेत.योगायोग असा की, १६ जूनला बडोलेंना डच्चू मिळाला आणि त्याच्या अदल्या दिवशी १५ जूनला सगळे जीआर निघाले. बंद झालेल्या शाळांच्या परिसरातील मूकबधिर, मतिमंद मुलांना कुठे सामावून घेतले हा प्रश्न आहे. पुण्याची शाळा नागपूरला दिली, लातूरची शाळा नागपूरच्या संस्थेला हस्तांतरित केली. हे करताना मुलांऐवजी संस्थाचालकांच्या हिताचा विचार केला गेला, असा आरोप होत आहे.अपंग कल्याण आयुक्त; पुणे यांच्या अध्यक्षतेखालील समिती आलेल्या प्रस्तावांची छाननी करून विभागाला शिफारस करेल असा जीआर आधी काढण्यात आला होता. तो रद्द का करण्यात आला, तरीही हस्तांतरण हे या समितीनेच सुचविलेले होते असे का दर्शविण्यात आले, असे प्रश्न निर्माण झाले आहेत.

वाशिम जिल्ह्यातील मिरागिरधर बहुउद्देशीय शिक्षण संस्थेने आता नवे सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे यांना पाठविलेल्या पत्रात नियमबाह्य शाळा हस्तांतरणाची तक्रार केली आहे. अपंग कल्याण आयुक्त; पुणे यांनी हस्तांतरित करावयाच्या शाळांसाठी अर्ज मागविले होते. आम्ही मुदतीत अर्ज केला. दिवंगत भास्करराव शिंगणे मूकबधिर शाळा; लोणार ही शाळा आम्ही मागितली होती पण ती आम्हाला दिली नाही. आम्ही अपात्र ठरल्याचेही आयुक्तालयाने कळविले नाही. ही शाळा समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद वाशिम येथे कार्यरत एका कर्मचाऱ्याशी संबंधित व्यक्तीच्या संस्थेला देण्यात आली. सर्व नियम धाब्यावर बसवून आणि हितसंबंध जपून हस्तांतरण करण्यात आले, असे या पत्रात म्हटले आहे.

नव्या मंत्र्यांवरही ‘लाल’जादूराजकुमार बडोले यांच्या काळात सामजिक न्याय विभागातील कंत्राटांच्या वाटपात ‘लाल’जादूची ‘वाणी’ चालायची. (लालवाणी म्हणजे काय ते विभागात सगळ्यांना कळतं). आता सुरेश खाडे यांच्यावरही तीच जादू चालू असल्याची चर्चा आहे.त्यासाठी विभागाला वेळ नाहीअपंगांसाठी काही शाळा अत्यंत चांगले काम करतात. त्यांना मंजूर असलेल्या तुकड्या व त्यातील विद्यार्थी संख्येपेक्षा अधिक संख्या त्यांच्याकडे आहेत. अधिकच्या तुकड्या व विद्यार्थ्यांवरील खर्च संस्था स्वत: करतात. त्यांना वाढीव तुकड्या व अनुदान द्यावे, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा होती. त्यांच्या निर्देशानुसार सामाजिक न्याय विभागाने वित्त विभागाला प्रस्ताव पाठविला.मंत्रिमहोदय, आपण काय करणार?च्शाळांचे नियमबाह्य हस्तांतरण करण्यात आले ही बाब समोर आलेली असताना आता नवे मंत्री सुरेश खाडे हे हस्तांतरण रद्द करणार का, हा प्रश्न आहे. नव्याने प्रस्ताव मागवायचे वा आधीच्या गैरव्यवहारांना संरक्षण देऊन निर्णय कायम ठेवायचा, असे दोनच पर्याय खाडे यांच्यासमोर आहेत.