शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांसाठी १० नवी शौचालये

By admin | Updated: September 3, 2016 02:09 IST

देशाच्या विकासासाठी अन्य गोष्टींप्रमाणेच स्वच्छता हीदेखील महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात सुरु केलेले स्वच्छ भारत अभियान राज्यातही सुरु

मुंबई: देशाच्या विकासासाठी अन्य गोष्टींप्रमाणेच स्वच्छता हीदेखील महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात सुरु केलेले स्वच्छ भारत अभियान राज्यातही सुरु करण्यात आले आहे. ‘माझा स्वच्छ महाराष्ट्र अभियाना’च्या माध्यमातून राज्याला संपूर्ण स्वच्छतेकडे नेण्यासाठी सामाजिक संस्थांचे महत्वपूर्ण योगदान असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.जायंट इंटरनॅशनल आणि ‘आय लव्ह मुंबई’ या संस्थेच्या सहकार्याने ‘माझा स्वच्छ महाराष्ट्र’ अभियान सुरु करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत शायना एनसी यांच्या पुढाकाराने मुंबईतील पोलीस आयुक्त कार्यालयास १० शौचालये देण्यात आली आहेत. या शौचालयांच्या उद्घाटन प्रसंगी गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, आमदार राज पुरोहित, पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर, अभिनेत्री रविना टंडन आणि ‘क्लीन सीटी’चे आदर पुनावाला उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना फडणवीस म्हणाले, या अभियानाच्या माध्यमातून राज्यात स्वच्छतेचे चांगले काम होत आहे. पंतप्रधानांनी नुकतीच देशातील १० स्वच्छ शहरांची घोषणा केली. यात ५ शहरे राज्यातील असून राज्यात ७ हजार गावेही संपूर्ण हागणदारीमुक्त झाली आहेत. स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविताना जनतेलाही स्वच्छतेची सवय होणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक ती व्यवस्था तयार होणे गरजेचे असते. ही व्यवस्था शायना एन. सी. यांच्या संस्थेच्या माध्यमातून उभी राहत आहे. आदर पुनावाला यांनी पुणे शहरात स्वच्छतेसाठी काम केले आहे. महाराष्ट्राला स्वच्छतेकडे नेण्यासाठी यांच्यासारख्या सामाजिक संस्थांचे योगदान महत्वपूर्ण आहे. पोलीस दल आणि सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन सार्वजनिक ठिकाणी जागांची निश्चिती करावी. त्याठिकाणी सार्वजनिक संस्थाच्या माध्यमातून शौचालये उपलब्ध करुन घ्यावीत. या सार्वजनिक शौचालयांचा जनतेस लाभ होऊन स्वच्छता राहण्यास मदत होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)