शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
4
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
5
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
6
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
7
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
8
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
9
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
10
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
11
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  
12
Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह
13
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
14
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
15
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
16
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
17
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
18
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
19
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
20
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल

विष्णुपूरीच्या १० दरवाजांचे आयुष्य संपले

By admin | Updated: April 10, 2017 20:14 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपूरी प्रकल्पाच्या १८ दरवाजांपैकी १० दरवाजांचे आयुष्य संपले आहे़

ऑनलाइन लोकमतनांदेड, दि. 10 - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपूरी प्रकल्पाच्या १८ दरवाजांपैकी १० दरवाजांचे आयुष्य संपले आहे़ आश्चर्य म्हणजे नवीन दहाही दरवाजे तयार असून ते तीन वर्षांपासून धूळखात पडून आहेत़ सदरील दरवाजे बसविण्यासाठी गोदावरी महामंडळ निधी देत नसल्याने प्रकल्पाच्या सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण झाला आहे़गेल्या वर्षी प्रकल्प तुडुंब भरला होता़ यंदाही समाधानकारक पाऊस झाला तर प्रकल्पातील पाणी साठवून ठेवता येईल इतकी क्षमता दरवाजांमध्ये नाही़ हा विषय तीन वर्षांपासून प्रलंबित आहे़ दुरुस्तीचे काम, प्रशासकीय मान्यतेच्या फेऱ्यात अडकलेले दरवाजे तयार असूनही बसविले जात नाहीत़ अधीक्षक अभियंता बी़एस़ स्वामी यांनी १० मार्च २०१७ रोजी जलसंपदा विभागाच्या मुख्य सचिवांना पत्र पाठविले आहे़ तसेच विष्णुपूरी पंपगृह विभागाच्या कार्यकारी अभियंत्याच्या अहवालाची प्रतही शासनाकडे आहे़ त्यानुसार पूरस्थिती निर्माण झाली तर मोठी दुर्घटना होवू शकते़ प्रकल्पाची सुरक्षितता व जनहितासाठी ४ कोटी ८६ लाखांचा तातडीचा निधी द्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे़ हा संपूर्ण विषय राष्ट्रवादी बहुजन मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष के़एल़सदावर्ते, सचिव एस़ झेड़ चिखलीकर यांनी चव्हाट्यावर आणला आहे़ सदरचे काम येत्या दीड महिन्यांत पूर्ण झाले नाही तर उद्भवणाऱ्या दुर्घटनेबद्दल जनता माफ करणार नाही, असेही सदावर्ते, चिखलीकर यांनी म्हटले आहे़ प्रकल्पाच्या दरवाजांची अवस्था लक्षात घेवून विष्णुपूरी पंपगृह विभागाने अहवाल दिला होता़ त्यानुसार दापोली येथील कार्यशाळेत तयार केलेले नवीन दरवाजे आणण्यात आले़ शिवाय पाच दरवाजांची उर्वरित कामे खाजगी कंत्राटदाराकडून करून घेण्यात आली़ त्याचेही सुमारे तीन कोटींचे देणे आहे़ एकंदर सर्व कामे पूर्ण करण्यासाठी आठ कोटींची आवश्यकता असल्याचे सांगण्यात येते़ परंतु निधीची तरतूद करण्यासाठी तीन वर्षांपासून टोलवाटोलवी सुरू आहे़ (प्रतिनिधी)।सरकारची उदासिनता अक्षम्य - खा.अशोक चव्हाणअत्यंत महत्त्वाच्या व तातडीच्या विषयावरही शासन गंभीर नाही, सरकारची उदासिनता अक्षम्य आहे़, अशी टीका करीत माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़अशोक चव्हाण यांनी विष्णुपूरी प्रकल्पाचे दरवाजे बसविण्यासाठी तातडीने निधी पुरवावा, अशी भूमिका मांडली आहे़ लोकमतशी बोलताना ते म्हणाले, मराठवाड्यातील प्रकल्पांबाबत शासन दुजाभाव करीत आहे़ नवीन दहा दरवाजे तीन वर्षांपासून तयार आहेत़ ते बसविण्यासाठी निधी देण्याची तयारी शासन व महामंडळाची नसेल तर हा जनतेच्या आयुष्याशी खेळ आहे़ विष्णुपूरी प्रकल्पाद्वारे लाखो लोकांना पेयजलाचा पुरवठा होतो, हे तरी ध्यानात ठेवा, असा टोलाही खा़चव्हाण यांनी लगावला़