शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे पाकिस्तान करतोय बॉम्बिंग, इकडे भारतानं अफगाणिस्तानला पाठवली मोठी मदद; तालिबान सरकार खुश
2
एकतर्फी प्रेमातून मुलाचं 'LIVE Suicide', आधी पेट्रोल ओतून पेटून घेतलं, मग रुग्णालयाच्या छतावरून मारली उडी
3
मनमोहनसिंग सरकारमधील कोळसामंत्री श्रीप्रकाश जायसवाल यांचे निधन, कानपूरमधून तीन वेळा झाले होते खासदार
4
SMAT 2025 : आयुष म्हात्रेचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
5
डीके शिवकुमार यांच्या आमदारांशी गाठीभेटी; उद्या सकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांसोबत ब्रेकफास्ट करणार...
6
IND vs SA ODI Series : टेस्टमध्ये नापास! इथं पाहा गंभीर 'गुरुजीं'चं वनडेतील 'प्रगतीपुस्तक'
7
११ जहाल नलक्षवाद्यांचे गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण; हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षल चळवळीला हादरा
8
कांदा निर्यात धडाम...! केंद्राचे धोरण आड आले;  बांगलादेश, सौदी अरब सारख्या देशांनी फिरवली पाठ
9
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
10
अविस्मरणीय अन् ऐतिहासिक! PM मोदींच्या हस्ते गोव्यात ७७ फूट उंच 'श्रीराम मूर्ती'चे अनावरण
11
५ राजयोगात १४१ दिवसांनी शनि मार्गी: ९ राशींचे कल्याण, सुख-समृद्धीचे वरदान; सौभाग्य-यश-लाभ!
12
“काँग्रेसमध्ये काही राहिले नाही, वडेट्टीवारांनी खांद्याला धनुष्यबाण लावावा”; कुणी दिली ऑफर?
13
Ayush Mhatre Century : षटकार-चौकारांची 'बरसात'; आयुष म्हात्रेचा २०० च्या स्ट्राइक रेटसह शतकी धमका!
14
भारताची क्षेपणास्त्र चाचणीची घोषणा, हिंदी महासागरात चौथे चिनी 'हेरगिरी जहाज' दाखल
15
SMAT 2025: अर्जुन तेंडुलकरची हवा! पहिल्या स्पेलमध्ये ५ धावांत २ विकेट्स घेत लुटली मैफील
16
सर्वांनी वयाच्या 30 व्या वर्षापूर्वीच जाणून घ्यायला हवं हे 'सीक्रेट'! असं करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग; तयार होईल मोठा निधी, आनंदात जगाल म्हातारपणी
17
गौतम गंभीरवर बीसीसीआय नाराज, कसोटी हरल्यानंतर जे बोलला, ते खटकले... 
18
Thailand Flood : हाहाकार! थायलंडमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस; १४५ जणांचा मृत्यू, ३६ लाख लोकांना फटका
19
धक्कादायक! अनियंत्रित कार तलावात कोसळली, चालक बेशुद्ध पडला, नाविक देवदूत बनून आला
20
नेपाळने भारताला डिवचले; 100 रुपयांच्या नवीन नोटेवर भारताचा भूभाग आपला दाखवला
Daily Top 2Weekly Top 5

विष्णुपूरीच्या १० दरवाजांचे आयुष्य संपले

By admin | Updated: April 10, 2017 20:14 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपूरी प्रकल्पाच्या १८ दरवाजांपैकी १० दरवाजांचे आयुष्य संपले आहे़

ऑनलाइन लोकमतनांदेड, दि. 10 - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपूरी प्रकल्पाच्या १८ दरवाजांपैकी १० दरवाजांचे आयुष्य संपले आहे़ आश्चर्य म्हणजे नवीन दहाही दरवाजे तयार असून ते तीन वर्षांपासून धूळखात पडून आहेत़ सदरील दरवाजे बसविण्यासाठी गोदावरी महामंडळ निधी देत नसल्याने प्रकल्पाच्या सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण झाला आहे़गेल्या वर्षी प्रकल्प तुडुंब भरला होता़ यंदाही समाधानकारक पाऊस झाला तर प्रकल्पातील पाणी साठवून ठेवता येईल इतकी क्षमता दरवाजांमध्ये नाही़ हा विषय तीन वर्षांपासून प्रलंबित आहे़ दुरुस्तीचे काम, प्रशासकीय मान्यतेच्या फेऱ्यात अडकलेले दरवाजे तयार असूनही बसविले जात नाहीत़ अधीक्षक अभियंता बी़एस़ स्वामी यांनी १० मार्च २०१७ रोजी जलसंपदा विभागाच्या मुख्य सचिवांना पत्र पाठविले आहे़ तसेच विष्णुपूरी पंपगृह विभागाच्या कार्यकारी अभियंत्याच्या अहवालाची प्रतही शासनाकडे आहे़ त्यानुसार पूरस्थिती निर्माण झाली तर मोठी दुर्घटना होवू शकते़ प्रकल्पाची सुरक्षितता व जनहितासाठी ४ कोटी ८६ लाखांचा तातडीचा निधी द्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे़ हा संपूर्ण विषय राष्ट्रवादी बहुजन मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष के़एल़सदावर्ते, सचिव एस़ झेड़ चिखलीकर यांनी चव्हाट्यावर आणला आहे़ सदरचे काम येत्या दीड महिन्यांत पूर्ण झाले नाही तर उद्भवणाऱ्या दुर्घटनेबद्दल जनता माफ करणार नाही, असेही सदावर्ते, चिखलीकर यांनी म्हटले आहे़ प्रकल्पाच्या दरवाजांची अवस्था लक्षात घेवून विष्णुपूरी पंपगृह विभागाने अहवाल दिला होता़ त्यानुसार दापोली येथील कार्यशाळेत तयार केलेले नवीन दरवाजे आणण्यात आले़ शिवाय पाच दरवाजांची उर्वरित कामे खाजगी कंत्राटदाराकडून करून घेण्यात आली़ त्याचेही सुमारे तीन कोटींचे देणे आहे़ एकंदर सर्व कामे पूर्ण करण्यासाठी आठ कोटींची आवश्यकता असल्याचे सांगण्यात येते़ परंतु निधीची तरतूद करण्यासाठी तीन वर्षांपासून टोलवाटोलवी सुरू आहे़ (प्रतिनिधी)।सरकारची उदासिनता अक्षम्य - खा.अशोक चव्हाणअत्यंत महत्त्वाच्या व तातडीच्या विषयावरही शासन गंभीर नाही, सरकारची उदासिनता अक्षम्य आहे़, अशी टीका करीत माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़अशोक चव्हाण यांनी विष्णुपूरी प्रकल्पाचे दरवाजे बसविण्यासाठी तातडीने निधी पुरवावा, अशी भूमिका मांडली आहे़ लोकमतशी बोलताना ते म्हणाले, मराठवाड्यातील प्रकल्पांबाबत शासन दुजाभाव करीत आहे़ नवीन दहा दरवाजे तीन वर्षांपासून तयार आहेत़ ते बसविण्यासाठी निधी देण्याची तयारी शासन व महामंडळाची नसेल तर हा जनतेच्या आयुष्याशी खेळ आहे़ विष्णुपूरी प्रकल्पाद्वारे लाखो लोकांना पेयजलाचा पुरवठा होतो, हे तरी ध्यानात ठेवा, असा टोलाही खा़चव्हाण यांनी लगावला़