शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

विष्णुपूरीच्या १० दरवाजांचे आयुष्य संपले

By admin | Updated: April 10, 2017 20:14 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपूरी प्रकल्पाच्या १८ दरवाजांपैकी १० दरवाजांचे आयुष्य संपले आहे़

ऑनलाइन लोकमतनांदेड, दि. 10 - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपूरी प्रकल्पाच्या १८ दरवाजांपैकी १० दरवाजांचे आयुष्य संपले आहे़ आश्चर्य म्हणजे नवीन दहाही दरवाजे तयार असून ते तीन वर्षांपासून धूळखात पडून आहेत़ सदरील दरवाजे बसविण्यासाठी गोदावरी महामंडळ निधी देत नसल्याने प्रकल्पाच्या सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण झाला आहे़गेल्या वर्षी प्रकल्प तुडुंब भरला होता़ यंदाही समाधानकारक पाऊस झाला तर प्रकल्पातील पाणी साठवून ठेवता येईल इतकी क्षमता दरवाजांमध्ये नाही़ हा विषय तीन वर्षांपासून प्रलंबित आहे़ दुरुस्तीचे काम, प्रशासकीय मान्यतेच्या फेऱ्यात अडकलेले दरवाजे तयार असूनही बसविले जात नाहीत़ अधीक्षक अभियंता बी़एस़ स्वामी यांनी १० मार्च २०१७ रोजी जलसंपदा विभागाच्या मुख्य सचिवांना पत्र पाठविले आहे़ तसेच विष्णुपूरी पंपगृह विभागाच्या कार्यकारी अभियंत्याच्या अहवालाची प्रतही शासनाकडे आहे़ त्यानुसार पूरस्थिती निर्माण झाली तर मोठी दुर्घटना होवू शकते़ प्रकल्पाची सुरक्षितता व जनहितासाठी ४ कोटी ८६ लाखांचा तातडीचा निधी द्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे़ हा संपूर्ण विषय राष्ट्रवादी बहुजन मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष के़एल़सदावर्ते, सचिव एस़ झेड़ चिखलीकर यांनी चव्हाट्यावर आणला आहे़ सदरचे काम येत्या दीड महिन्यांत पूर्ण झाले नाही तर उद्भवणाऱ्या दुर्घटनेबद्दल जनता माफ करणार नाही, असेही सदावर्ते, चिखलीकर यांनी म्हटले आहे़ प्रकल्पाच्या दरवाजांची अवस्था लक्षात घेवून विष्णुपूरी पंपगृह विभागाने अहवाल दिला होता़ त्यानुसार दापोली येथील कार्यशाळेत तयार केलेले नवीन दरवाजे आणण्यात आले़ शिवाय पाच दरवाजांची उर्वरित कामे खाजगी कंत्राटदाराकडून करून घेण्यात आली़ त्याचेही सुमारे तीन कोटींचे देणे आहे़ एकंदर सर्व कामे पूर्ण करण्यासाठी आठ कोटींची आवश्यकता असल्याचे सांगण्यात येते़ परंतु निधीची तरतूद करण्यासाठी तीन वर्षांपासून टोलवाटोलवी सुरू आहे़ (प्रतिनिधी)।सरकारची उदासिनता अक्षम्य - खा.अशोक चव्हाणअत्यंत महत्त्वाच्या व तातडीच्या विषयावरही शासन गंभीर नाही, सरकारची उदासिनता अक्षम्य आहे़, अशी टीका करीत माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़अशोक चव्हाण यांनी विष्णुपूरी प्रकल्पाचे दरवाजे बसविण्यासाठी तातडीने निधी पुरवावा, अशी भूमिका मांडली आहे़ लोकमतशी बोलताना ते म्हणाले, मराठवाड्यातील प्रकल्पांबाबत शासन दुजाभाव करीत आहे़ नवीन दहा दरवाजे तीन वर्षांपासून तयार आहेत़ ते बसविण्यासाठी निधी देण्याची तयारी शासन व महामंडळाची नसेल तर हा जनतेच्या आयुष्याशी खेळ आहे़ विष्णुपूरी प्रकल्पाद्वारे लाखो लोकांना पेयजलाचा पुरवठा होतो, हे तरी ध्यानात ठेवा, असा टोलाही खा़चव्हाण यांनी लगावला़