शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange; सोमवारपासून पाणीही पिणार नाही, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा, मागण्यांवर ठाम!
2
आजचे राशीभविष्य, ०१ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, वादग्रस्त विषय आज टाळावेत
3
Maratha Reservation: आरक्षणामध्ये अडसर न्यायालयीन निकालांचा, समितीच्या सल्लामसलतीत बाब समोर
4
Maratha Reservation: मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळणे अशक्य? चंद्रकांत पाटील म्हणाले...
5
Maratha Reservation: सर्वपक्षीय बैठक, अधिवेशन बोलावून २४ तासांत निर्णय घ्या- सुप्रिया सुळे
6
Maratha Reservation: मराठा आरक्षण लढ्याला पाठिंबा देण्यासाठी सायकलवरून मुंबई गाठली!
7
कुणबी नोंदीचे पुरावे शिंदे समितीला देणार, मराठा आरक्षण अभ्यासकांसोबत जरांगेंची दीड तास चर्चा
8
विशेष लेख: शिंक्याचे तुटले आणि (कोरियन) बोक्याचे फावले!
9
Maratha Morcha : मराठा आरक्षणाबाबत हालचालिंना वेग, मुख्यमंत्र्यांनी रात्रीच बोलावली बैठक; राधाकृष्ण विखे पाटील यांचीही उपस्थिती
10
रायगडमध्ये रिक्षाचा भीषण अपघात, ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखासह तिघांचा जागीच मृत्यू
11
Maratha Morcha : फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी तुम्ही आंदोलकांना मदत करता? एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात दिले उत्तर, म्हणाले...
12
Maratha Morcha : “गोंधळ घालणाऱ्यांना सरकारने पाठवले होते का?, सरकार दंगल ...”, सुप्रिया सुळेंना घेराव घालणाऱ्यांबाबत मनोज जरांगेंचं मोठं विधान
13
मोठी दुर्घटना! धौलीगंगा वीज प्रकल्पाच्या बोगद्यात भूस्खलनामुळे १९ कामगार अडकले
14
धावत्या ट्रॅव्हल्समध्ये जळून एकाचा मृत्यू; प्रवाशाने स्वत:च्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतल्याचा संशय
15
राज ठाकरेंच्या टीकेवर एकनाथ शिंदे यांचं प्रत्युत्तर; "आधी माहिती घेऊन बोलायला हवं होते..."
16
ऑस्ट्रेलियात भारतीयांविरोधात हजारो स्थानिक लोक रस्त्यावर उतरले; नेमके काय घडले?
17
टाकळगावचे लढवय्या विजयकुमार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार; आई, पत्नी अन् मुलांनी फोडला हंबरडा
18
Maratha Morcha: मनोज जरांगेंच्या मागण्यांवर मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत काय झाला निर्णय?
19
चीन-भारत संबंधांना तिसऱ्या देशाच्या नजरेची गरज नाही, मोदी आणि जिनपिंग यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावले
20
अभिनेत्री प्रिया मराठे काळाच्या पडद्याआड, अंत्यदर्शनावेळी मराठी कलाकारांना अश्रू अनावर

१० कोटींचा खर्च; १५० कोटींची वसुली

By admin | Updated: May 30, 2015 22:57 IST

केवळ १० कोटींच्या खर्चाच्या वसुलीपोटी सुरू केलेल्या चाकण-शिक्रापूर टोलनाक्याने तब्बल १५० कोटी रुपये वसूल करून दिले आहेत.

प्रवीण गायकवाड ल्ल शिरूरकेवळ १० कोटींच्या खर्चाच्या वसुलीपोटी सुरू केलेल्या चाकण-शिक्रापूर टोलनाक्याने तब्बल १५० कोटी रुपये वसूल करून दिले आहेत. मंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे वारंवार या टोलनाक्यास मुदतवाढ दिली गेली. जमा झालेला अतिरिक्त मलिदा कोणाच्या घशात गेला आहे? टोलनाका बंद होताना शासनाने संबंधित उद्योजकांच्या कंपनीला आणखी ४४ कोटी भरपाई देऊ नये, तसे केल्यास प्रखर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.शासनाच्या आदेशानुसार १ जूनपासून राज्यातील १२ टोलनाके बंद करण्यात येणार आहेत. यात शिक्रापूर-चाकण मार्गावरील टोलनाक्याच्या समावेश आहे. वास्तविक हा टोलनाका २०१० सालातच बंद होणे अपेक्षित असताना केवळ मंत्र्यांशी संबंधित हा नाका असल्याने या नाक्याला मुदतवाढ मिळत गेली.२००१ पासून आतापर्यंत उद्योजकास १५० कोटी रुपयांची वसुली परतावा मिळाला असल्याचे आंदोलकांचे म्हणणे असून, आता बंद करताना उद्योजकास शासन जे ४४ कोटी रुपये भरपाई म्हणून देणार आहे. त्यास आंदोलकांनी विरोध दर्शविला आहे. ५ कोटी १० लाख रुपयांचा प्रकल्प होता. (बीओटी) मात्र दोनच महिन्यांत यात वाढ करून तो १० कोटी रुपयांचा करण्यात आला. त्या वेळी या प्रकल्पाची टोल वसुलीची मुदत २०१० पर्यंत निश्चित करण्यात आली. २०११ साली उद्योजकास १८ कोटी रुपये देऊन हा टोल बंद करण्याचा निर्णय तत्कालीन शासनाने घेतला होता. मात्र, टोल बंद तर दूरच तो सुरू ठेवण्यात आला. डांबर भाववाढीचे कारण दाखवून या टोलला पुन्हा १० वर्षांची मुदत वाढवून देण्यात आली.या निर्णयाविरोधात व एकंदरीतच या टोलच्या सुरुवातीपासूनच्या प्रक्रियेच्या संभ्रामित धोरणाविरोधात क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे व ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष रमेश टाकळकर यांनी १५ फेब्रुवारीला या टोलनाक्यावर आंदोलन सुरू केले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे त्यांनी टोल करारासंदर्भातील कागदपत्रांची मागणी केली. मात्र, या विभागाने ती देण्यास असमर्थता दर्शविली. दरम्यान, विधान परिषदेचे उपसभापती वसंतराव डावखरे यांनी आंदोलकांशी चर्चा करून सा. बां. मंत्र्यांशी मुंबईत बैठक घडवून आणली. मंत्र्यांसमोर आंदोलकांनी मांडलेल्या भूमिकेचा मंत्री महोदयांनी सकारात्मक विचार करून टोल बंद करण्याचा निर्णय घेतला. (आणखी वृत्त ८ वर)पवार यांनी बंद केला नाही टोलनाका४राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडी सरकार असताना तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील २० कोटी रुपयांच्या आतील खर्चाचे टोलनाके बंद केले होते. पण शिक्रापूर-चाकण हा टोलनाका १० कोटी खर्चाचा असतानादेखील तो बंद करण्यात आलेला नव्हता. २० कोटींच्या आतील खर्चाच्या टोलनाक्यांत या टोलनाक्याचा समावेश असूनही शासनाने म्हणजेच पवार यांनी बंद केला नाही. त्याच वेळी हा टोलनाका बंद होणे अपेक्षित होते.४ वसुली पाहता उद्योजकास २०१० आधीच त्याचा नफ्यासह परतावा मिळाल्याचे सिद्ध होते, असे आंदोलकांनी निदर्शनास आणले. मात्र, कवेळ मंत्र्यांशी निगडित टोल असल्याने डोळेझाक केलेल्या सा. बां. विभागाच्या आशीर्वादावर हा टोलनाका सुरू राहिला. २०१५ पर्यंतचा हिशेब पाहता उद्योजकास १५० कोटी रुपये वसुलीपोटी प्राप्त झाले आहेत. ४ आता टोल बंद करताना शासनाने त्यास ४४ कोटी रुपये भरपाईपोटी देण्याची काहीही गरज नसल्याचे पाचंगे यांनी म्हटले आहे. शासनाने ही भरपाईची रक्कम देऊ नये म्हणून पुन्हा रस्त्यावर उतरणार, तसेच न्यायालयीन लढाई लढणार असल्याचे पाचंगे यांनी सांगितले. गांधीवादी मार्गाने बंद झालेला हा राज्यातील पहिला टोलनाका असल्याचा दावा पाचंगे यांनी केला.