शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

१ हजार औरंगाबादकर झाली विशेष पोलीस अधिकारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 19:48 IST

शहर पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन  पुढे आलेल्या सात हजार लोकांमधून निष्कलंक एक हजार नागरिकांची विशेष पोलीस अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. उत्कृष्ट काम करणा-या विशेष पोलीस अधिका-यांना शस्त्र परवान्यासह सुरक्षा एजन्सी परवाना देण्यात येईल, असे आश्वासन पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी दिले.

ठळक मुद्देसात हजार लोकांमधून झाली निष्कलंक एक हजार नागरिकांची नेमणूक  तीन महिन्यांनंतर मिळणार शस्त्र परवाना

औरंगाबाद, दि. 4 : शहर पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन  पुढे आलेल्या सात हजार लोकांमधून निष्कलंक एक हजार नागरिकांची विशेष पोलीस अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. उत्कृष्ट काम करणा-या विशेष पोलीस अधिका-यांना शस्त्र परवान्यासह सुरक्षा एजन्सी परवाना देण्यात येईल, असे आश्वासन पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी दिले.

तापडिया नाट्यमंदिर येथे नवनियुक्त एक हजार विशेष पोलीस अधिका-यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पोलीस उपायुक्त डॉ.दीपाली धाटे-घाडगे, उपायुक्त राहुल श्रीरामे, उपायुक्त विनायक ढाकणे, सहायक आयुक्त  रामेश्वर थोरात यांच्यासह अन्य अधिका-यांची उपस्थिती होती. यावेळी आयुक्त म्हणाले की, विशेष पोलीस अधिका-यांचे कर्तव्य आणि कामाची पद्धत कशी असेल, याबाबतची माहिती त्यांनी दिली. ज्या ठाण्यांतर्गत तुमची नियुक्ती आहे, त्या ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी जर कोणतेही काम करण्यासाठी पैशाची मागणी करीत असेल तर त्याबाबतची तक्रार तुम्ही थेट आपल्या मोबाईलवर व्हॉटस्अ‍ॅपद्वारे करा, असे आवाहन त्यांनी केले. विशेष पोलीस अधिका-यांनी रोज दोन तास पोलिसांसाठी देणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विशेष पोलीस अधिका-यांना जॅकेट, लाठी आणि सिटीचे वाटप करण्यात आले.

देवगिरी मैदानावर प्रशिक्षणनवनियुक्त विशेष पोलीस अधिका-यांना पोलीस मुख्यालयाच्या देवगिरी मैदानावर पोलीस निरीक्षक राजेंद्र कत्तुल यांनी सुमारे एक तास प्रशिक्षण दिले. यावेळी उपस्थितांकडून सॅल्युट कसा मारावा, सावधान, विश्राम उभे राहणे, सिटी वाजविण्याचे विविध प्रकार याविषयी प्रात्यक्षिक करून घेण्यात आले. 

एका तरुणीला आली भोवळपोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पोलीस निरीक्षक कत्तुल हे विशेष पोलीस अधिका-यांना शिस्तीचे महत्त्व विशद करून सांगताना पोलीस खात्यातील महत्त्वाच्या टिप्स देत होते. यावेळी विशेष पोलीस अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या तरुणीला परेडदरम्यान भोवळ आली. यामुळे तिला महिला पोलिसांनी उचलून बाजूला नेऊन बसविले.