शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताला जगातील प्रमुख देश बनवले - शिवराज सिंह चौहान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2023 14:50 IST

Shivraj Singh Chauhan: मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाची प्रशंसा केली आहे.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाची प्रशंसा केली आहे. मध्य प्रदेशमधील श्योपूर जिल्ह्यातील विजयपूर येथे लाडली बहन संमेलनामध्ये संबोधित करताना शिवराज सिंह चौहान म्हणाले की, देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ९ वर्षांच्या कार्यकाळामध्ये देशाने प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली आज भारत जगातील प्रमुख देश बनला आहे. पंतप्रधान मोदींनी श्योपूर जिल्ह्यातील कुनो येथे चित्ता प्रकल्पाची भेट दिली आहे.

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की,  मुख्यमंत्री लाडली बहना योजना आमच्या बहिणींचं जीवन बदलण्याची मोहीम आहे. योजनेमुळे त्यांना आत्मनिर्भरता मिळाली आहे. आता त्यांना माहेरी जाण्यासाठी पतीकडे पाहावे लागणार नाही. तसेच त्या त्यांच्या बहिणी मुलांच्या गरजा भागवण्यासाठी सक्षम असतील. या योजनेमध्ये देण्यात येणारी रक्कम टप्प्याटप्प्याने वाढवून तीन हजार रुपयांपर्यंत केली जाईल. सध्या महिलांना १२ हजार रुपये एक वर्षासाठी मिळतात. ते वाढवून ३६ हजार रुपये केले जातील.

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की, पीएम किसान सन्मान निधीमध्ये केंद्र सरकार वार्षिक ६ हजार रुपये देत आहे. तर राज्य सरकार ४ हजार रुपये देत आहे. आता राज्य सरकार ही रक्कम वाढवून ६ हजार रुपये करत आहे. अशा प्रकारे शेतकऱ्यांना वर्षाला १२ हजार रुपये मिळतील. त्याचप्रकारे १२वीमध्ये ७० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप दिले जात आहेत. तर बारावीमध्ये टॉपर असणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना स्कूटी देण्यात येईल. ४ जुलै रोजी मुख्यमंत्री सिखो-कमाओ योजना लाँच करत आहे. त्यामध्ये विविध कंपन्या आणि फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या तरुणांना दरमहा ८ हजार रुपये स्टायपेंड दिलं जाईल.

लाडली लक्ष्मी योजना ही मुलींसाठी वरदान ठरली आहे. या योजनेनंतर राज्यामध्ये  स्री-पुरुष गुणोत्तरामधील तफावत कमी झाली आहे. या योजनेमध्ये शासनाकडून मुलींना शिक्षणासाठी पूर्ण शुल्कासह प्रोत्साहनपर रक्कम दिली जात आहे, असेही शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहान