शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
4
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
5
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
6
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
7
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
8
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
9
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
10
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
11
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
12
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
13
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
14
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
15
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
16
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
17
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
18
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
19
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
20
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा

‘त्यांना’ आता मिळतोय सन्मान; मागच्या सरकारांना निवडणुकीतच येत होती आठवण: पंतप्रधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2023 05:29 IST

अविश्वास ठरावावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षांनी ‘लोकसभेतून पळ काढला’; पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

सागर (मध्य प्रदेश) : आपल्या सरकारच्या कार्यकाळातच मागासवर्गीय, ओबीसी आणि आदिवासी यांना योग्य सन्मान मिळू लागला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले. आधीच्या सरकारांनी या वर्गांची उपेक्षाच केली; केवळ निवडणुकीच्या काळातच त्यांची आठवण काढली जात होती, असेही मोदी यांनी सांगितले.

मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यातील बडतुमा येथे महान संत व समाज सुधारक संत रविदास यांच्या मंदिर-सह-स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. १०० कोटी रुपये खर्च करून हे स्मारक उभे करण्यात येणार आहे. मोदी म्हणाले की, मागच्या सरकारांनी गरिबांना साधे पिण्याचे पाणीही उपलब्ध करून दिले नाही. आपल्या सरकारच्या जल जीवन मिशनमुळे आता दलितांच्या वस्त्या, ओबीसींचे भाग आणि आदिवासी क्षेत्रात नळाद्वारे पाणी मिळत आहे.

११ एकरवर उभे राहणार मंदिर व स्मारक

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संत रविदासांचे मंदिर व स्मारक ११ एकर जागेवर उभे राहणार आहे. हे स्मारक संत रविदास यांच्या शिकवणुकीचे प्रदर्शन करेल. यात एक संग्रहालय, आर्ट गॅलरी आणि अन्य सुविधांसह निवासी व्यवस्था असेल.

विराेधकांनी ‘लोकसभेतून पळ काढला’

अविश्वास ठरावावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षांनी ‘लोकसभेतून पळ काढला’ असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (दि.१२) करत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. विरोधकांनी देशभरात जी नकारात्मकता पसरविली आहे त्याचा आमच्या सरकारने प्रतिकार केला, असेही त्यांनी सांगितले. पश्चिम बंगालमधील पंचायती राज परिषदेला ऑनलाइन संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी आरोप केला की, मणिपूरवरील चर्चेत विरोधक गंभीर नव्हते. कारण, यामुळे त्यांना अधिक नुकसान झाले असते. विरोधी पक्षांनी लोकहितापेक्षा त्यांच्या राजकारणाला प्राधान्य दिले.

‘त्या’ लोकांवर कारवाई नाही  

सरकारने ईशान्येकडील राज्यातील अत्याचारात सहभागी असलेल्या लोकांवर कोणतीही कारवाई केली नाही. तेथे १६०हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच, पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या ग्रामीण निवडणुकांमध्ये भाजपने १५ ते १६ लोकांची हत्या केली. - ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, पं. बंगाल.

...त्यांना फक्त राजकारणाची काळजी

विरोधी पक्षांना लोकांच्या वेदना आणि त्रासाची पर्वा नाही. त्यांना फक्त राजकारणाची काळजी आहे. त्यामुळेच त्यांनी चर्चा टाळण्याचा निर्णय घेतला आणि अविश्वास प्रस्ताव आणून राजकीय चर्चेला प्राधान्य दिले. १४० कोटी भारतीयांच्या आशीर्वादाने केंद्र सरकारने संसदेत विरोधी पक्षांच्या अविश्वास प्रस्तावाचा पराभव केला. देशातील जनतेसमोर विरोधी पक्षांचा पर्दाफाश करा. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान.

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMadhya Pradeshमध्य प्रदेश