शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

‘त्यांना’ आता मिळतोय सन्मान; मागच्या सरकारांना निवडणुकीतच येत होती आठवण: पंतप्रधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2023 05:29 IST

अविश्वास ठरावावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षांनी ‘लोकसभेतून पळ काढला’; पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

सागर (मध्य प्रदेश) : आपल्या सरकारच्या कार्यकाळातच मागासवर्गीय, ओबीसी आणि आदिवासी यांना योग्य सन्मान मिळू लागला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले. आधीच्या सरकारांनी या वर्गांची उपेक्षाच केली; केवळ निवडणुकीच्या काळातच त्यांची आठवण काढली जात होती, असेही मोदी यांनी सांगितले.

मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यातील बडतुमा येथे महान संत व समाज सुधारक संत रविदास यांच्या मंदिर-सह-स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. १०० कोटी रुपये खर्च करून हे स्मारक उभे करण्यात येणार आहे. मोदी म्हणाले की, मागच्या सरकारांनी गरिबांना साधे पिण्याचे पाणीही उपलब्ध करून दिले नाही. आपल्या सरकारच्या जल जीवन मिशनमुळे आता दलितांच्या वस्त्या, ओबीसींचे भाग आणि आदिवासी क्षेत्रात नळाद्वारे पाणी मिळत आहे.

११ एकरवर उभे राहणार मंदिर व स्मारक

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संत रविदासांचे मंदिर व स्मारक ११ एकर जागेवर उभे राहणार आहे. हे स्मारक संत रविदास यांच्या शिकवणुकीचे प्रदर्शन करेल. यात एक संग्रहालय, आर्ट गॅलरी आणि अन्य सुविधांसह निवासी व्यवस्था असेल.

विराेधकांनी ‘लोकसभेतून पळ काढला’

अविश्वास ठरावावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षांनी ‘लोकसभेतून पळ काढला’ असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (दि.१२) करत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. विरोधकांनी देशभरात जी नकारात्मकता पसरविली आहे त्याचा आमच्या सरकारने प्रतिकार केला, असेही त्यांनी सांगितले. पश्चिम बंगालमधील पंचायती राज परिषदेला ऑनलाइन संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी आरोप केला की, मणिपूरवरील चर्चेत विरोधक गंभीर नव्हते. कारण, यामुळे त्यांना अधिक नुकसान झाले असते. विरोधी पक्षांनी लोकहितापेक्षा त्यांच्या राजकारणाला प्राधान्य दिले.

‘त्या’ लोकांवर कारवाई नाही  

सरकारने ईशान्येकडील राज्यातील अत्याचारात सहभागी असलेल्या लोकांवर कोणतीही कारवाई केली नाही. तेथे १६०हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच, पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या ग्रामीण निवडणुकांमध्ये भाजपने १५ ते १६ लोकांची हत्या केली. - ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, पं. बंगाल.

...त्यांना फक्त राजकारणाची काळजी

विरोधी पक्षांना लोकांच्या वेदना आणि त्रासाची पर्वा नाही. त्यांना फक्त राजकारणाची काळजी आहे. त्यामुळेच त्यांनी चर्चा टाळण्याचा निर्णय घेतला आणि अविश्वास प्रस्ताव आणून राजकीय चर्चेला प्राधान्य दिले. १४० कोटी भारतीयांच्या आशीर्वादाने केंद्र सरकारने संसदेत विरोधी पक्षांच्या अविश्वास प्रस्तावाचा पराभव केला. देशातील जनतेसमोर विरोधी पक्षांचा पर्दाफाश करा. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान.

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMadhya Pradeshमध्य प्रदेश