शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

मध्य प्रदेशात सुरुवातीचे कल भाजपच्या बाजूने; शिवराजसिंह चौहानांचा आत्मविश्वास दुणावला, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2023 10:09 IST

विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत सुरुवातीचे कल भाजपच्या बाजूने आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांमधील विधानसभांसाठी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आज मतमोजणी होत आहे. लोकसभा निवडणुकांना काही महिने बाकी असताना होत असलेल्या या निवडणुकांमध्ये नक्की कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. मध्य प्रदेशात सत्ताधारी भाजपला आव्हान देत काँग्रेसने ताकदीने निवडणूक लढवली होती. त्यामुळे या राज्यात सत्ताबदल होणार की भाजपला सत्ता राखण्यात यश येणार, याची उत्सुकता आहे. राज्यात आज सुरू असलेल्या मतमोजणीत सुरुवातीचे कल भाजपच्या बाजूने आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी प्रतिक्रिया देत भाजपला पूर्ण बहुमत मिळणार असल्याचा दावा केला आहे.

शिवराजसिंह चौहान यांनी आपल्या एक्स हँडलवर पोस्ट करताना म्हटलं आहे की, "भारत माता की  जय, जनता जनार्दन की जय... आज मध्य प्रदेशात मतमोजणी पार पडत असून मला विश्वास आहे की, जनतेच्या आशीर्वादाने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्वात भारतीय जनता पक्ष स्पष्ट बहुमताने पुन्हा सत्ता स्थापन करणार आहे," अशी आशा चौहान यांनी व्यक्त केली आहे. तसंच त्यांनी भाजपच्या सर्व उमेदवारांना विजयासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

मध्य प्रदेशात काय आहे स्थिती?

मध्य प्रदेशात विधानसभेच्या २३० जागा असून स्पष्ट बहुमतासाठी ११६ जागांची आवश्यकता असते. २०१८ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ११४ जागा मिळवत काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरला होता. त्यानंतर काँग्रेसने सत्ता स्थापन करत कमलनाथ हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रीही झाले. मात्र नंतर काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह बंड करत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेस सरकार अल्पमतात आलं आणि कमलनाथ यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर राजीनामा दिलेल्या काँग्रेस आमदारांच्या मतदारसंघात पुन्हा निवडणूक झाली आणि शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वात भाजपचं सरकार आलं.

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा निवडणूक निकालांच्या LIVE UPDATES साठी क्लिक करा!

दरम्यान, काँग्रेसने मागील चार वर्षांत राज्य सरकारचा भ्रष्टाचार तसेच शेतकरी आणि युवकांच्या प्रश्नांवरून सरकारविरोधात वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न केला होता. त्याआधारे राज्याची सत्ता आपल्याला काबीज करता येईल, असा विश्वास काँग्रेस नेत्यांकडून व्यक्त केला जात होता. दुसरीकडे, 'लाडली बहना'सारख्या जनतेला थेट लाभ देणाऱ्या योजना राबवत शिवराजसिंह चौहान यांनी लोकांची मने जिंकण्याचा प्रयत्न केला होता.  

टॅग्स :Madhya Pradesh Assembly Electionमध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०२३Madhya Pradeshमध्य प्रदेशElectionनिवडणूकshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहान