शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

सत्तास्थापनेत मायावती ठरणार ‘किंगमेकर’? जीजीपीसोबत आघाडी, काँग्रेस-भाजपचे वाढले टेन्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2023 06:44 IST

हे दोन्ही पक्ष एकत्र आल्याने काँग्रेसची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, भोपाळ : राज्यातील मुख्य लढत सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष काँग्रेस यांच्यात होणार आहे तरी राजकीय निरीक्षकांचे लक्ष बहुजन समाज पक्षाच्या मायावतींकडे लागले आहे. निवडणुकीत बसपला मिळणाऱ्या जागांवर राज्यातील सत्ता समीकरण पूर्णपणे बदलू शकते. २०१८ मध्ये बहुजन समाज पक्षामुळे काँग्रेसला अनेक जागा गमवाव्या लागल्या. निवडणुकीत एकूण २३० जागांपैकी ६८ जागांवर बसपचे उमेदवार दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्थानी होते. भाजपला १२८ तर काँग्रेसला ९८ जागा मिळाल्या होत्या.  

बसप-जीजीपी युतीमुळे टेंशन 

या खेपेला बसपने मध्य प्रदेशातील गोंडवाना गणतंत्र पार्टीसोबत (जीजीपी) आघाडी केली आहे. जीजीपीनेही मागच्या निवडणुकीत बसपप्रमाणेच अनेक ठिकाणी निकाल पलटवून टाकले होते. हे दोन्ही पक्ष एकत्र आल्याने काँग्रेसची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. मतविभागणी टाळण्यासाठी काय करावे, याची रणनीती आखली जात आहे.

‘जीजीपी’मुळे २०१८मध्ये असा बसला फटका 

- टिमरनी : काँग्रेसचा २,२१३ मतांनी पराभव झाला. इथे जीजीपीला साडेपाच हजार मते मिळाली होती. 

- बिजजपूर : काँग्रेस उमेदवार २,८४० मतांनी पराभूत झाला होता. इथे बसप उमेदवाराला ३७ हजारांहून अधिक मते मिळाली.

‘सायलेंट’ आघाडी काेणावर भारी?

- बसपने १७८ जागांवर उमेदवार दिले आहेत. तर, जीजीपीच्या वाट्याला ५२ जागा आल्या आहेत. 

- राज्याच्या राजकीय समीकरणाच्या दृष्टीकाेनातून ही आघाडी सर्वात माेठी असून ‘सायलेंट’ आघाडी म्हणूनही त्यास बाेलले जात आहे. 

- गेल्या वेळी दाेन्ही पक्ष वेगवेगळे लढले हाेते. त्याचा सर्वाधिक फटका काॅंग्रेसला बसला हाेता. ‘इंडिया’ आघाडीच्या निमित्ताने समाजवादी पार्टीचीही चर्चा हाेत आहे. मात्र, सपापेक्षा जास्त वजन या आघाडीला प्राप्त झाले आहे. 

- गेल्या निवडणुकीत बसपला ५.१ टक्के मते मिळाली हाेती. तर केवळ १.३० टक्के मतदान सपाला झाले हाेते.

मते खाल्ली आणि बिघडले गणित 

- अटेर : काँग्रेसच्या उमेदवाराचा ५ हजार मतांनी पराभव झाला. बसपाला इथे १६ हजाराहून अधिक मते मिळाली होती. 

- कोलारस : काँग्रेसचा उमेदवार अवघ्या ७२० मतांनी जिंकून आला. बसपच्या उमेदवाराला ७ हजार मते मिळाली होती. 

- टिकमगड : काँग्रेसने ४,१७५ मतांनी गमावली. इथेही बसपने १० हजारांहून अधिक मते खाल्ली होती.

 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशmayawatiमायावतीElectionनिवडणूक