शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

तब्बल ३८ वर्षांनी कोर्टानं दिला घटस्फोटाचा निर्णय; हा खटला इतका लांबला की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2023 14:26 IST

पहिल्या पत्नीसोबत इंजिनिअर पतीचे १९८१ मध्ये लग्न झाले होते. परंतु तिला मुले होत नसल्याने दोघांमध्ये वाद सुरू झाले.

भोपाळ – मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे अजब-गजब प्रकार समोर आला आहे. याठिकाणी एका दाम्पत्याने घटस्फोटासाठी ३८ वर्षापूर्वी अर्ज केला होता. १९८५ मध्ये पतीने पत्नीपासून सुटका व्हावी यासाठी कोर्टाला याचिका दाखल केली होती. मात्र रखडलेल्या न्यायिक प्रक्रियेत अखेर ३८ वर्षांनी कोर्टाने यावर निर्णय सुनावला आहे. कोर्टाने पतीची याचिका मान्य करत ३८ वर्षांनी घटस्फोटाला परवानगी दिली आहे.

विशेष म्हणजे न्यायाच्या प्रतिक्षेत खटला इतकी वर्ष चालला त्यात अर्ज करणाऱ्या इंजिनिअर पतीच्या मुलांची लग्न झाली. पत्नीपासून घटस्फोट घेण्याचे हे प्रकरण भोपाळ न्यायालयापासून सुरू झाले, त्यानंतर विदिशा कुटुंब न्यायालय, ग्वाल्हेर कुटुंब न्यायालय, हायकोर्ट आणि आता सुप्रीम कोर्टापर्यंत खटला सुरू होता. निवृत्त इंजिनिअर भोपाळमध्ये राहणारा आहे. त्याची पत्नी ग्वालियर येथे राहत होती. इंजिनिअर पतीला ३८ वर्षांनंतर पहिली पत्नीपासून कायदेशीर घटस्फोटाला मान्यता दिली आहे.

पहिल्या पत्नीसोबत इंजिनिअर पतीचे १९८१ मध्ये लग्न झाले होते. परंतु तिला मुले होत नसल्याने दोघांमध्ये वाद सुरू झाले. लग्नाला ४ वर्ष झाले तरीही मुले नसल्याने अखेर पतीने १९८५ मध्ये भोपाळमध्ये घटस्फोटासाठी अर्ज दिला. मात्र त्याचा दावा खारीज केला. त्यानंतर पती कौटुंबिक न्यायालयात गेला. मात्र डिसेंबर १९८९ मध्ये पत्नीने हा खटला ग्वाल्हेर कुटुंब न्यायालयात चाललावा अशी मागणी केली. पती-पत्नी एकमेकांविरोधात याचिकेवर दिर्घकाळ कोर्टात तारखांना हजर राहिले. त्यानंतर कोर्टाने पतीच्या अर्जाला सुनावणी करत निर्णय त्याच्या बाजूने दिला. परंतु पहिल्या पत्नीने या आदेशाविरोधात वरच्या कोर्टात धाव घेतली. जी स्वीकार झाली.

एप्रिल २००० मध्ये पतीचा प्रलंबित घटस्फोटाचा खटला विदिशा येथील न्यायालयाने फेटाळला होता. यानंतर पतीने उच्च न्यायालयात अपील केले. उच्च न्यायालयाने २००६ मध्ये पतीचे अपील फेटाळून लावले. याविरोधात पतीने सर्वोच्च न्यायालयात एसएलपी दाखल केली. पतीचा एसएलपी सुप्रीम कोर्टाने २००८ मध्ये फेटाळला होता. पतीने २००८ मध्ये पुन्हा घटस्फोटासाठी अर्ज केला. जुलै २०१५ मध्ये विदिशा कोर्टाने पतीचा अर्ज फेटाळला होता. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयाच्या ग्वाल्हेर खंडपीठात अपील दाखल केले. अखेर ३८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दोघांनी उच्च न्यायालयातून घटस्फोट घेतला.

पती-पत्नी वादामुळे एकमेकांपासून विभक्त राहत होते. १९९० मध्ये पतीने दुसरे लग्न केले. दुसऱ्या पत्नीपासून पतीला २ मुलेही आहेत. ज्यांचे आता लग्न झालंय. ३८ वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर अखेर पती आणि पहिली पत्नी यांच्यात सहमतीने घटस्फोट झाला. हायकोर्टाच्या निर्देशानुसार पतीकडून पत्नीला एकरकमी १२ लाख रुपये चुकवावे लागणार आहेत. पहिल्या पत्नीचे वडील पोलीस अधिकारी होते. मुलीचे नाते तुटू नये अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे वारंवार कोर्टात घटस्फोट नाकारावा यासाठी ती अपील करत होती. परंतु घरच्यांनी समजवल्यानंतर ती राजी झाली. हायकोर्टाने तिच्या देखभालीसाठी एकरकमी १२ लाख रुपये देण्याचे आदेश पतीला दिले.

टॅग्स :Courtन्यायालय