शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

गत हंगामात उडीद, मूग, सोयाबीनची हमीभाव केंद्रावर शून्य खरेदी

By हणमंत गायकवाड | Updated: August 16, 2023 19:23 IST

यंदाही उशिरा पाऊस पडल्याने उडीद-मुगाचा पेरा नगण्यच आहे.

लातूर : गतवर्षी हमीभावापेक्षा कमी भाव असल्याने हमीभाव केंद्रावर उडीद, मूग आणि सोयाबीन शून्य खरेदी झाली आहे.. मात्र, बाजारापेक्षा हरभऱ्याला हमीभाव केंद्रावर चांगला दर मिळाल्याने २ लाख ७२ हजार ८६७ क्विंटल हरभऱ्याची खरेदी हमीभाव खरेदी केंद्रांवर झाली आहे. १९ हजार ८९७ शेतकऱ्यांनी हरभरा हमीभाव केंद्रावर विकणे पसंत केले. त्यातून त्यांना १४५ कोटी ५७ लाख ४५ हजार ४४५ रुपये पेमेंट मिळाले आहे.

गतवर्षीही उडीद, मुगाचा पेरा कमी झाल्यामुळे हमीभाव केंद्रावर याची खरेदी होऊ शकली नाही. यंदाही उशिरा पाऊस पडल्याने उडीद-मुगाचा पेरा नगण्यच आहे. त्यामुळे हमीभाव केंद्राला उडीद, मूग मिळेल की नाही, याची शाश्वती कमी आहे. तर सोयाबीनचा बाजारभाव हमीभावापेक्षा थोडा जास्त मिळाल्याने शेतकऱ्यांनी मार्केट गाठले. या दोन कारणांमुळे हमीभाव केंद्रांवर उडीद, मूग आणि सोयाबीनची खरेदी होऊ शकली नाही.

म्हणून झाली हरभऱ्याचीच खरेदीहमीभाव केंद्रांवर बाजारभावापेक्षा हरभऱ्याला हमीभाव जास्त मिळाला. त्यामुळे जिल्ह्यातील १९ हजार ८७२ शेतकऱ्यांनी हमीभाव कें­द्रांवर हरभऱ्याची विक्री केली. २ लाख ७२ हजार ८६७ क्विंटल हमीभाव केंद्रावर हरभरा खरेदी केला. त्यातून शेतकऱ्यांना १४५ कोटी ५७ लाख ४५ हजार ४४५ रुपये पेमेंट करण्यात आले. आता पुढील हंगामाची वाट पाहत आहोत, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी सोमासे यांनी दिली.

पावसाने ताण दिल्याने चिंता वाढली...उडीद, मुगाचा हंगाम तर गेलाच. सोयाबीनवर शेतकऱ्यांची मदार आहे. परंतु, गेल्या १५ दिवसांपासून पावसाने ताण दिल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे. गतवर्षी सोयाबीनला म्हणावा तसा भाव मिळाला नाही. यंदा तर निसर्गाचीच वक्रदृष्टी दिसत आहे. दुपारच्या सुमारास सोयाबीनच्या माना पडत आहेत. जोमात आलेले पीक कोमात येत आहे. त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीlaturलातूर