शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

जगाला बुद्धांच्या नैतिक सुविचारी शास्त्राची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : जगाच्या आरंभी काळापासूनच वेगवेगळे तत्वज्ञान सांगण्याची सुरुवात झाली आहे. कुठे कुठे तर हुकुमशाहीव्दारे शस्त्राच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

लातूर : जगाच्या आरंभी काळापासूनच वेगवेगळे तत्वज्ञान सांगण्याची सुरुवात झाली आहे. कुठे कुठे तर हुकुमशाहीव्दारे शस्त्राच्या बळाचा वापर जगावर राज्य करण्यासाठी केला आहे. परंतु, प्रत्यक्षात जगाला शस्त्राची नसून, बुद्धांच्या नैतिक सुविचारी शास्त्राची गरज असल्याचे प्रतिपादन भन्ते पय्यानंद यांनी येथे केले.

आषाढ पौर्णिमेनिमित्ताने बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्ट, लातूरतर्फे आयोजित वर्षावास व धम्मदेसन कार्यक्रमात ते बोलत होते. भन्ते पय्यानंद म्हणाले, करुणेचे महासागर तथागत बुद्धांची शिकवण संपूर्ण मानव समूहासाठी असून, ती पूर्णतः सामाजिक आहे. सुविचार आणि नीतीमत्तेने जगाची उभारणी करणे हा सुखमय जगाचा पाया आहे. सुविचारानेच जगाची भविष्यकाळातील वाटचाल होणे अपेक्षित आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळातही नैतिक विचारांची गरज जगाला आहे. तथागत बुद्ध हे जगातील सुविचाराचे प्रथम जनक असून, मानवजातीचे गुरु आहेत. तेव्हा बुद्धांचा सुविचारच जगाचा आधार आहे, असेही ते म्हणाले. यावेळी भन्ते यशकाश्यपायन महाथेरो, सेवानिवृत्त अधिकारी एम. एन. गायकवाड, गायिका सुमनताई जोगदंड, किशोर चक्रे, कुमार सोनकांबळे यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन भरत कांबळे यांनी केले तर प्रास्ताविक डॉ. दुष्यंत कटारे यांनी केले. अनिरुध्द बनसोडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पांडुरंग अंबुलगेकर, सुधाकर कांबळे, डॉ. अरुण कांबळे, परमेश्वर आदमाने, उदय सोनवणे आदींनी परिश्रम घेतले.