शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

जीवनरेखा प्रतिष्ठान येथे कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:23 IST

रयतू बाजारात स्वच्छतेची मागणी लातूर : शहरातील रयतू बाजार परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. बाजारात सकाळी ...

रयतू बाजारात स्वच्छतेची मागणी

लातूर : शहरातील रयतू बाजार परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. बाजारात सकाळी आणि सायंकाळच्या वेळी भाजीपाला विक्रीसाठी आणला जातो. उरलेला भाजीपाला रस्त्याच्या कडेलाच टाकला जात असल्याने दुर्गंधी पसरली आहे. याकडे मनपा प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे.

कृषी औजारे घटकासाठी अर्ज करावेत

लातूर : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, अन्नधान्य पिके, गळीत धान्यअंतर्गत रब्बी हंगामामध्ये प्रमाणित बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिक, सुधारित कृषी औजारे व सिंचन सुविधा साधने या बाबींसाठी महाडीबीटी प्रणालीद्वारे शेतक-यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात आले आहेत. नोंदणी करण्यासाठी ३० ऑगस्ट ते १० सप्टेंबरपर्यंत मुदत असून, शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

बंद सिग्नल सुरू करावेत

लातूर : शहरातील काही मुख्य चौकात सिग्नल बंद आहेत. त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे. याकडे संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष असून बंद असलेले सिग्नल सुरू करण्याची मागणी वाहनधारकांमधून केली जात आहे. शहरातील दयानंद गेट परिसर, रेणापूर नाका, पाच नंबर चौक या मुख्य चौकातील सिग्नल बंद आहेत. त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे.

खरिपातील पिकांना पावसाची प्रतीक्षा

लातूर : जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. दुपारच्या वेळी कडक ऊन पडत असून वातावरणात बदल झाला आहे. त्यामुळे खरिपातील पिकांना पावसाची नितांत गरज आहे. सध्या सोयाबीनचे पीक शेंगधारणेच्या स्थितीत आहेत. मागील काही दिवस पावसाने उघडीप दिल्याने पिके सुकून गेली होती. मध्यंतरी झालेल्या पावसाने पिकाला दिलासा मिळाला. मात्र, आता परत उघडीप दिल्याने पावसाची गरज आहे.