शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात रोजगार हमी योजनेच्या अडीच हजार मजुरांच्या हाताला काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:16 IST

जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत २ लाख ४० हजार ४५१ कुटुंबातील ६ लाख १ हजार ...

जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत २ लाख ४० हजार ४५१ कुटुंबातील ६ लाख १ हजार २४२ मजुरांची नोंदणी आहे. लाॅकडाऊन काळात पुणे, मुंबईसारख्या ठिकाणावरून अनेकांचे स्थलांतर झाले. त्यामुळे त्यांना रोहयोच्या कामात रोजगार उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे अनेकांना रोजगाराच्या संधी मिळाल्या होत्या. मात्र आता कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आली असल्याने अनेकजण आपल्या मूळ रोजगाराच्या ठिकाणी परतले आहेत. त्यामुळे रोहयोच्या कामावरील मजुरांची संख्याही घटत चालली आहे.

जिल्ह्यात सध्या ३५६ कामे सुरू असून, २ हजार ४८४ मजूर कार्यरत आहेत. यामध्ये अहमदपूर तालुक्यात ५४३, औसा २६८, चाकूर ३३२, देवणी २७, जळकोट १२६, लातूर ३७७, निलंगा २२५, रेणापूर १४२, शिरूर अनंतपाळ २८४ तर उदगीर तालुक्यातील १६० मजुरांचा समावेश आहे. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये अधिक कामे सुरू होती. मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे अनेकांचे स्थलांतर झाले. परिणामी, रोहयोच्या कामांना मागणी घटली असल्याचे जिल्ह्यातील चित्र आहे.

लाॅकडाऊनमध्ये वाढली होती कामे

कोरोनाच्या संकटामुळे पुकारण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे अनेकांचे आपल्या मूळगावी स्थलांतर झाले. त्यातील काही जणांनी रोहयोच्या कामांना पसंती दिली. त्यामुळे लाॅकडाऊनमध्ये कामांची संख्या वाढली होती. मात्र सध्या रबी हंगाम सुरू असून, शेतीची कामे सुरू आहेत. मुबलक पाणी असल्याने सिंचन क्षेत्रही वाढले असल्याने अनेकांनी रोहयोऐवजी शेती कामांना पसंती दिली आहे. त्यामुळे मागणी घटली आहे.

ग्रामीण भागात हाताला काम मिळावे, यासाठी रोजगार हमी योजना राबविली जाते. जिल्ह्यात सध्या ३५६ कामांवर २४०० मजूर कार्यरत आहेत. लाॅकडाऊन काळात अनेकांना रोजगाराच्या संधी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून उपलब्ध झाल्या.

- आशिष पावले, रोहयो कर्मचारी

अडीच लाख कुटुंबांची नोंदणी

n रोहयो विभागाकडे २ लाख ४० हजार ४५१ कुटुंबातील ६ लाख १ हजार २४२ मजुरांची नोंदणी आहे. यामध्ये अहमदपूर तालुक्यातील ७७ हजार ८३८, औसा ८१ हजार ७५७, चाकूर ५३ हजार ७३६, देवणी ४० हजार १२१, जळकोट ३४ हजार ९६०, लातूर ७२ हजार २४, निलंगा ८५ हजार ६३३, रेणापूर ४२ हजार ६४३, शिरूर अनंतपाळ ३० हजार ४०५ तर उदगीर तालुक्यातील ८२ हजार ११५ मजुरांचा समावेश असल्याचे रोहयो विभागाने सांगितले.