शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवात आझादी का महोत्सवाचे देखावे करावेत; जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर 

By आशपाक पठाण | Updated: July 27, 2023 19:34 IST

नूतन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांनी पदभार घेतल्यावर पत्रकारांशी संवाद साधला.

लातूर : आझादी का अमृत महोत्सव, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन विशेष पद्धतीने साजरा केला जाणार आहे. यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. गणेशोत्सव काळातही मंडळांनी यावर देखावे सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत केले.

नूतन जिल्हाधिकारी ठाकूर यांनी पदभार घेतल्यावर पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, लातूर हे शैक्षणिक, ॲग्रीकल्चर हब आहे, ही आपल्या जिल्ह्याची ताकद आहे. जल व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. महिला सक्षमीकरणासाठी काम केले जाईल. जोपर्यंत मालकी हक्क, आर्थिक नियोजनात महिलांचा वाटा वाढत नाही तोपर्यंत त्या समक्ष होणार नाहीत, यासाठी प्रयत्न करू. यावेळी नूतन सीईओ अनमोल सागर म्हणाले, आझादी का अमृत महोत्सव, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. यासाठी तयारी सुरू आहे. यानिमित्त आदर्श अमृत वाटिका तयार केली जाणार असून यात गावांचा सहभाग महत्त्वाचा आहे. यावेळी उपजिल्हाधिकारी महाडीक, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) सुचिता शिंदे यांची उपस्थिती होती.

जळकोटमध्ये अनुदान वाटपाची प्रक्रिया...जळकोट तालुक्यात अतिवृष्टीने अनेक शेतकरी, घरांचे मोठे नुकसान झाले. याठिकाणचा सर्व्हे करण्यात आला असून तिथे आता अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अतिवृष्टीत आपत्कालीन विभाग सक्षम केला जाईल, असे जिल्हाधिकारी म्हणाल्या.

बीएलओ रुजू न झाल्यास कारवाई...मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) हे २१ जुलै ते २१ ऑगस्टदरम्यान घरोघरी भेटी देणार आहेत. मतदान नोंदणी न झालेले पात्र नागरिक संभाव्य मतदार, मयत, कायमस्वरूपी स्थलांतरित व अस्पष्ट फोटो असणारे मतदार याचे सर्वेक्षण करणार आहेत. यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. गैरहजर असलेल्या १४ जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. बीएलओंनी तात्काळ रुजू होऊन काम सुरू करावे. रुजू न झाल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांनी सांगितले.

महिला मतदारांची नोंद वाढायला हवी...महिलांचे मतदान नोंदणीत प्रमाण वाढले पाहिजे, यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. माहेरवासीयांनी सासरी आल्यावर आवर्जून आपली मतदार नोंदणी करावी. नवीन मतदारांच्या नोंदणीचे प्रमाण वाढावे, यासाठी महाविद्यालयात मोहीम राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी घरी येणाऱ्या बीएलओंना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी ठाकूर यांनी केले.

टॅग्स :laturलातूरIndependence Dayस्वातंत्र्य दिन