शहरं
Join us  
Trending Stories
1
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
2
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
3
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
4
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
5
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
6
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
7
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
8
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
9
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
10
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
11
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
12
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
13
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
14
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
15
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
16
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
17
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
18
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
19
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
20
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर

कलम १८८ म्हणजे काय रे भाऊ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:14 IST

राजकुमार जाेंधळे / लातूर : काेराेना काळात साथराेग प्रतिबंधक कायदा १८९७ मधील तरतुदीनुसार जाहीर केलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल ...

राजकुमार जाेंधळे / लातूर : काेराेना काळात साथराेग प्रतिबंधक कायदा १८९७ मधील तरतुदीनुसार जाहीर केलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल ५१८ नागरिकांवर जिल्ह्यातील त्या-त्या पाेलीस ठाण्यांत कलम १८८ भादंवि अन्वये दखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, २ हजार ३१४ वाहने जप्त करण्यात आली असून, त्यांच्याकडून ४ लाख ६२ हजार ८०० रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई लातूर जिल्हा पाेलीस प्रशानाच्या वतीने गत सहा महिन्यांत करण्यात आली आहे.

काेराेना महामारीला राेखण्यासाठी मार्च २०२० पासून टप्प्याटप्प्याने विविध नियम आणि निर्बंध राज्य शासन, जिल्हा प्रशासनाच्या वतीने जारी करण्यात आले असून, या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्यासाठी पाेलीस दलातील अधिकारी, कर्मचारी तैनात आहेत. काेराेना काळात प्रसार आणि गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी लाॅकडाउन आणि संचारबंदी जारी करण्यात आली हाेती. दरम्यान, संचारबंदी काळात गर्दी हाेणार नाही यासाठी कलम १८८ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्ह्यात ठिकठिकाणी प्रमुख मार्गावर नाकाबंदी करण्यात आली हाेती. लातूर शहरातील विविध चाैकातही पाेलीस फाैजफाटा तैनात करण्यात आला हाेता. काेराेना काळात कायद्याची पायमल्ली करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या तब्ब्ल २ हजार ३१४ चालकावंर वाहन जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

कलम १८८ काय आहे?

१८९७ साथराेग प्रतिबंधक कायद्यातील तरतुदीनुसार या काळात काही नियम लागू हाेतात. शासनाने निर्देशित केलेले सरकारी अधिकारी वेगवेगळे आदेश देऊ शकतात. या आदेशाची पायमल्ली करणाऱ्या व्यक्तीविराेधात कलम १८८ अन्वये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात येताे. विशेष म्हणजे कायदा माेडणाऱ्या व्यक्तीकडून जीवित अथवा वित्तहानी झाली पाहिजे, असे नाही. नियमांचे उल्लंघन करणारा व्यक्ती हा गुन्हा दाखल करण्यासाठी पात्र ठरताे.

काय हाेऊ शकते शिक्षा?

कायद्यातील तरतुदीनुसार फक्त आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस एक महिन्याचा कारावास किंवा २०० रुपयांचा दंड अथवा दाेन्ही शिक्षा हाेऊ शकते. दुसऱ्या तरतुदीनुसार संबंधित व्यक्तीने नियमांचे उल्लंघन केले आणि त्यातून मानवी जीवन वा आराेग्य धाेक्यात आले तर त्या व्यक्तीला सहा महिन्यांचा कारावास किंवा एक हजार रुपयांचा दंड अथवा दाेन्ही शिक्षा मिळू शकतात.

नागरिकांनी कायद्याचे

पालन करण्याची गरज...

काेराेनाच्या पार्श्वभूमीवर राज्य आणि स्थानिक प्रशासनाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या नियमांचे, कायद्याचे उल्लंघन हाेणार नाही. याची काळजी प्रत्येक नागरिकांनी घेण्याची गरज आहे. साथराेग प्रतिबंधक कायद्यानुसार दाखल हाेणारे हे गुन्हे अदखलपात्र आहेत. कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यासाठी पाेलीस प्रशासन प्रयत्नशील असते. नियम माेडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई हाेणार आहे. यासाठी प्रत्येकाने जारी केलेल्या नियम, निर्बंध आणि कायद्याचे उल्लंघन करू नये.

- निखिल पिंगळे, पाेलीस अधीक्षक, लातूर.