शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
2
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
3
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
4
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
5
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
6
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
7
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
8
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
9
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
10
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
11
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
12
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
13
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
14
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
15
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
16
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
17
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
18
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
19
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
20
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?

जिल्ह्यातील आठवडा बाजार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:18 IST

लातूर : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेत, जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध लागू केले असून, दिनांक ३१ मार्चपर्यंत जिल्ह्यातील सर्व आठवडा बाजार ...

लातूर : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेत, जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध लागू केले असून, दिनांक ३१ मार्चपर्यंत जिल्ह्यातील सर्व आठवडा बाजार बंद राहणार आहेत. त्याचबरोबर रात्री ११ ते पहाटे ५ असा संचारबंदीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. आता रात्री ८ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी राहणार आहे. या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी दिले आहेत. धार्मिक विधीमध्ये पाचपेक्षा अधिक व्यक्तिंना उपस्थित राहण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. तसेच धार्मिक स्थळांच्या ठिकाणी ‘नो मास्क-नो एन्ट्री’ या नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. जीम, व्यायामशाळा, स्पोर्टस्‌ कॉम्प्लेक्स, खेळाची मैदाने, स्वीमिंग पूल हे ५० टक्के क्षमतेने शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून वैयक्तिक सरावासाठी सुरू ठेवण्यास परवानगी राहील. याठिकाणी शारीरिक अंतराचे पालन करणे अनिवार्य असेल. मोठ्या स्पर्धा आयोजित करण्यास व प्रेक्षकांना उपस्थित राहण्यास प्रतिबंध असेल. कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनाला आल्यास संबंधित जीम, व्यायामशाळा, खेळाची मैदाने, स्वीमिंग पूल बंद करण्याची कारवाई केली जाणार आहे. सर्वप्रकारचे सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम, यात्रा उत्सव, उपोषण, आंदोलने, निदर्शने, मोर्चा आदींना पुढील आदेशापर्यंत मनाई राहील. भाजी मंडईमध्ये कोविड - १९ प्रतिबंधात्मक व सुरक्षा नियम, शारीरिक अंतर, फेस मास्कचा वापर, निर्जंतुकीकरण, वैयक्तिक स्वच्छता इत्यादी नियमांचे पालन होईल. या अनुषंगाने संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी आवश्यक ती कार्यवाही करावी.

पूर्वनियोजित लग्न, त्या अनुषंगिक समारंभ हे ५० व्यक्तिंच्या मर्यादेत कोविड प्रतिबंधात्मक व सुरक्षा नियमांचे पालन करून पार पाडण्यात यावेत. लातूर जिल्ह्यातील महानगरपालिका, सर्व नगरपालिका, नगर पंचायत क्षेत्रात व त्यालगत तीन किलोमीटर त्रिज्येच्या परिसरात रात्री ८ ते पहाटे ५ वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी राहील. यामध्ये अत्यावश्यक, जीवनावश्यक सेवा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला सूट असेल.

राज्य, केंद्र शासनाच्या पूर्वनियोजित पदभरतीच्या परीक्षा, एमपीएससी परीक्षा घेण्यास, परीक्षेच्या कामकाजासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी तसेच परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात जाण्या-येण्यास कसल्याही प्रकारचे निर्बंध नाहीत. परीक्षा केंद्राच्या ठिकाणी मार्गदर्शक सूचनांनुसार कोविड प्रतिबंध व सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे निर्देश आहेत.