शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

उपपदार्थ निर्मितीचे प्रकल्प उभारून कारखान्याला आणखीन वैभव प्राप्त करून देऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:19 IST

विलास २ मांजरा परिवारात येण्यापूर्वी मोठ्या आर्थिक अडचणीत होता. माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांच्या मार्गदर्शनात व लातूर जिल्हा मध्यवर्ती ...

विलास २ मांजरा परिवारात येण्यापूर्वी मोठ्या आर्थिक अडचणीत होता. माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांच्या मार्गदर्शनात व लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहकार्याने मांजरा परिवारात आता एकूण आठ कारखाने झाले असून सर्वच उत्कृष्टरीत्या चालत आहेत. यातून परिसराच्या सर्वांगीण विकासाला त्यांचा हातभार लागत आहे. विलास युनिट २ हा कारखाना खरेदीसाठी घेतलेल्या संपूर्ण कर्जाची परतफेड मुदतीत केल्याबद्दल संचालक मंडळ, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन संस्थापक अध्यक्ष अमित देशमुख यांनी केले.

विलास कारखान्याच्या अध्यक्ष वैशालीताई देशमुख म्हणाल्या,

पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे मराठवाड्यातही सहकारी साखर कारखाने यशस्वी करण्याचा प्रयोग लोकनेते विलासराव देशमुख यांनी मांजरा कारखान्याच्या उभारणीतून चालवला होता, त्यांचा तो प्रयोग यशस्वी तर झालाच. शिवाय पुढे तो देशासाठी एक आदर्श प्रयोग ठरला आहे. मांजरा कारखान्याच्या यशस्वी प्रयोगामुळे लातूर परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊस लागवड केली होती. त्यातून १९९८-९९ च्या दरम्यान अतिरिक्त उसाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्याकाळी नुकतेच केमिकल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त करून अमित देशमुख यांनी सामाजिक कार्याची सुरुवात केली होती. यादरम्यान शेतकऱ्यांशी हितगूज करत असताना त्यांनी सदरील समस्या सोडविण्याचा निर्धार व्यक्त केला होता. केवळ निर्धार व्यक्त करून न थांबता सरासरी २५ वर्षे वयाच्या तरुण सहकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी अवघ्या ९ महिन्यांत विलास सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. या कारखान्याने आजवर २८ राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार पटकावले आहेत. सर्वांत कमी वयाच्या संचालक मंडळाने विक्रमी कमी वेळेत कारखाना उभा करून तो देशात आदर्श ठरावा, अशा पद्धतीने यशस्वीरीत्या चालवला आहे, या कारखान्याने दुसरा कारखाना म्हणजे आताचा विलास युनिट २ विकत घेतला असून तोही उत्कृष्टरीत्या चालवण्यात येत आहे.

उदगीर येथील प्रियदर्शनी हा कारखाना तर लातूर जिल्ह्यातील होता, शिवाय या कारखाना परिसरात माजी पंतप्रधान स्व. इंदिराजी गांधी यांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे. त्यामुळे हा कारखाना चांगल्या पद्धतीने चालावा ही लोकनेते विलासराव देशमुख यांची मनोमन इच्छा होती. त्यामुळे प्रारंभी मांजरा कारखान्याच्या वतीने तो भाडेतत्त्वावर चालवण्यात आला; परंतु हा करार संपल्यानंतर पुन्हा तो कारखाना बंदच राहणार अशी स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे नंतर अमित देशमुख यांनी तो कारखाना विलास साखर कारखान्यामार्फत विकत घेण्याचा निर्णय घेतला व कारखान्याची खरेदी झाली; परंतु पुढे कारखान्याची दुरुस्ती आणि तर कामकाजासाठी कर्ज घेऊन भांडवल उभारावे लागले, अनेक अडचणींवर मात करीत आता हा कारखाना यशस्वीरीत्या चालवण्यात येत आहे. यावर्षी सुरुवातीपासूनच कारखाना उत्तमरीत्या चालवण्यात येत आहे.