शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

लातूर शहरात दर आठवड्याला तीन दिवस राहणार पाणी पुरवठा बंद

By हणमंत गायकवाड | Updated: March 17, 2024 18:06 IST

२०११च्या जनगणनेनुसार लातूर शहराची लोकसंख्या ३,८२,७५४ इतकी असून, सध्याची एकंदर लोकसंख्या पाच लाखांच्या घरात आहे.

लातूर : लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पामध्ये सद्यस्थितीत ९.५१ टक्के अति अल्प जिवंत पाणीसाठा आहे. त्यामुळे लातूर महापालिकेने पाणी बचतीचा निर्णय घेतला असून, दर आठवड्याला तीन दिवस पाणीपुरवठा बंद, तर चार दिवस प्रकल्पातून पाणी उचलून शहरात आठ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे महिन्याला दीडऐवजी एक दलघमी पाणी लागणार आहे. अर्ध्या दलघमची बचत महिन्याला होणार आहे. नागरिकांनीही पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

सन २०११च्या जनगणनेनुसार लातूर शहराची लोकसंख्या ३,८२,७५४ इतकी असून, सध्याची एकंदर लोकसंख्या पाच लाखांच्या घरात आहे. १४५ लिटर दरडोई दररोज याप्रमाणानुसार शहरातील नागरिकांना ६७.५० दलली इतके पाणी लागते. २०% तूट आणि दहा टक्के इतर मागणी गृहीत धरले तर शहराला दैनंदिन ढोबळ पाणी मागणी ८९.१० दलली इतकी आहे. या गरजेनुसार महिन्याला अर्धा दलघमी पाणीबचत या उपायोजनेतून केली जात आहे. महिन्याला १.५ दलघमी पाणी उचलले जात होते. परंतु, सध्या एकदलघमी. पाणी उचलले जात आहे. तीन दिवस पाणी पुरवठा बंद ठेवून चार दिवस पाणीपुरवठा आठ दिवसाला होईल, या पद्धतीने पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार वितरणही केले जात असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विजयकुमार चव्हाण यांनी दिली.

शनिवार, रविवार, सोमवार असे तीन दिवस पाणीपुरवठा राहतो बंद

मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार असे चार दिवस जलकुंभनिहाय पाण्याचे वितरण केले जात असून, त्याचे वेळापत्रक मनपाने प्रसिद्ध केलेले आहे.शनिवार, रविवार, सोमवार असे तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहतो. मांजरा प्रकल्पातूनही पाणी उचलले जात नाही.बचतीचा हा उपाय गेल्या आठवड्यापासून सुरू आहे.

बचतीचा उपक्रम दोन महिने राबविल्यास एक महिन्याची बचत 

लातूर शहराला लागणारे पाणी आणि केलेली बचत याचे गणित केले तर एक महिन्याला लागणाऱ्या पाण्याची बचत होणार आहे. महिन्याला अर्धा दलघमी म्हणजे एक दलघमी पाण्याची बचत होईल. दोन महिने हा उपक्रम राबविल्यास एक दलघमी पाणी बचत होणार आहे.

टॅग्स :laturलातूरwater scarcityपाणी टंचाई