शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

लातूर शहरात दर आठवड्याला तीन दिवस राहणार पाणी पुरवठा बंद

By हणमंत गायकवाड | Updated: March 17, 2024 18:06 IST

२०११च्या जनगणनेनुसार लातूर शहराची लोकसंख्या ३,८२,७५४ इतकी असून, सध्याची एकंदर लोकसंख्या पाच लाखांच्या घरात आहे.

लातूर : लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पामध्ये सद्यस्थितीत ९.५१ टक्के अति अल्प जिवंत पाणीसाठा आहे. त्यामुळे लातूर महापालिकेने पाणी बचतीचा निर्णय घेतला असून, दर आठवड्याला तीन दिवस पाणीपुरवठा बंद, तर चार दिवस प्रकल्पातून पाणी उचलून शहरात आठ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे महिन्याला दीडऐवजी एक दलघमी पाणी लागणार आहे. अर्ध्या दलघमची बचत महिन्याला होणार आहे. नागरिकांनीही पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

सन २०११च्या जनगणनेनुसार लातूर शहराची लोकसंख्या ३,८२,७५४ इतकी असून, सध्याची एकंदर लोकसंख्या पाच लाखांच्या घरात आहे. १४५ लिटर दरडोई दररोज याप्रमाणानुसार शहरातील नागरिकांना ६७.५० दलली इतके पाणी लागते. २०% तूट आणि दहा टक्के इतर मागणी गृहीत धरले तर शहराला दैनंदिन ढोबळ पाणी मागणी ८९.१० दलली इतकी आहे. या गरजेनुसार महिन्याला अर्धा दलघमी पाणीबचत या उपायोजनेतून केली जात आहे. महिन्याला १.५ दलघमी पाणी उचलले जात होते. परंतु, सध्या एकदलघमी. पाणी उचलले जात आहे. तीन दिवस पाणी पुरवठा बंद ठेवून चार दिवस पाणीपुरवठा आठ दिवसाला होईल, या पद्धतीने पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार वितरणही केले जात असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विजयकुमार चव्हाण यांनी दिली.

शनिवार, रविवार, सोमवार असे तीन दिवस पाणीपुरवठा राहतो बंद

मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार असे चार दिवस जलकुंभनिहाय पाण्याचे वितरण केले जात असून, त्याचे वेळापत्रक मनपाने प्रसिद्ध केलेले आहे.शनिवार, रविवार, सोमवार असे तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहतो. मांजरा प्रकल्पातूनही पाणी उचलले जात नाही.बचतीचा हा उपाय गेल्या आठवड्यापासून सुरू आहे.

बचतीचा उपक्रम दोन महिने राबविल्यास एक महिन्याची बचत 

लातूर शहराला लागणारे पाणी आणि केलेली बचत याचे गणित केले तर एक महिन्याला लागणाऱ्या पाण्याची बचत होणार आहे. महिन्याला अर्धा दलघमी म्हणजे एक दलघमी पाण्याची बचत होईल. दोन महिने हा उपक्रम राबविल्यास एक दलघमी पाणी बचत होणार आहे.

टॅग्स :laturलातूरwater scarcityपाणी टंचाई