शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाण पुलाच्या कामामुळे लातूरच्या सात वस्त्यांचा पाणी पुरवठा बंद 

By हणमंत गायकवाड | Updated: September 12, 2022 17:42 IST

या नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची पर्यायी सोय न करता पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

लातूर : शहरातील अंबाजोगाई रोडवर नॅशनल हायवेमार्फत उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे या भागातील आर्वी जलकुंभाअंतर्गत असलेल्या सात वस्त्यांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पाईपलाईन टाकून जोडणी पूर्ण होईपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने या वस्त्यांतील नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे. 

लातूर मनपाच्या आर्वी जलकुंभाअंतर्गत आर्वी गायरान, हनुमान नगर, सोमवंशी नगर, डाळ मिल भाग, गडदे नगर, भगवानबाबा नगर, कौशल्यधाम आदी शहरालगतचा भाग आहे. या भागातील हजार ते बाराशे कुटुंबांचे नळकनेक्शन आर्वी जलकुंभाअंतर्गत पाईपलाईंवर आहे. मात्र लातूर-अंबाजोगाई रोडवर असलेल्या उड्डाण पुलाचे काम नॅशनल हायवेमार्फत चालू असल्याने मनपाला पुरवठा बंद कावा लागला आहे. पाईपलाईन टाकून जोडणी पूर्ण होईपर्यंत पाणीपुरवठा होणार नाही. मनपाने या भागातील नागरिकांची सद्य:स्थितीत कसल्याही प्रकारची पर्यायी व्यवस्था न करता पाणी पुरवठा बंद राहणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

पर्यायी व्यवस्था न करताच काम सुरू... आर्वी गायरान, हनुमान नगर, सोमवंशी नगर, डाळ मिल भाग, गडदे नगर, भगवानबाबा नगर, कौशल्यधाम नगरात मनपाच्या नोंदीनुसार कमीत कमी हजार ते बाराशे नळकनेक्शन आहेत. या नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची पर्यायी सोय न करता पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हे पाणी मुबलक असताना या भागातील नागरिकांना आता टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. उड्डाण पुलाचे काम कधी पूर्ण होणार, पाईपलाईन टाकून जोडणी पूर्ण कधी होणार, या दोन्ही प्रश्नांची उत्तरे सध्या तरी मनपाच्या पाणी पुरवठा विभागाकडे नाहीत. त्यामुळे पाणी पुरवठा किती दिवस बंद राहील, किती दिवस नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागेल, याबाबतचे कसलेही नियोजन मनपाच्या पाणीपुरवठा विभागात नाही. पाणी पुरवठा बंद राहणार असल्याचे प्रसिद्धीपत्रक काढून मनपाला सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

नागरिकांनी सहकार्य करावे जोपर्यंत काम सुरू आहे, पाईपलाईन टाकून जोडणी पूर्ण होत नाही तोपर्यंत काही तरी पर्यायी व्यवस्था पाणीपुरवठा विभागाकडून केली जाईल. तूर्त नागरिकांनी मनपाला सहकार्य करावे. नॅशनल हायवेमार्फत उड्डाण पुलाचे काम चालू आहे. त्यांना लवकरात लवकर काम करण्याचे कळविले आहे. - कार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा विभाग मनपा

 

टॅग्स :laturलातूरWaterपाणी