शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
2
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
3
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
4
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
5
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
6
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
7
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
8
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
9
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
10
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
11
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
12
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
13
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
14
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
15
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
16
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
17
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
18
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
19
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
20
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
Daily Top 2Weekly Top 5

लातूर शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पुन्हा कोलमडले

By हणमंत गायकवाड | Updated: July 31, 2023 16:45 IST

इलेक्ट्रिकल बिघाड दुरुस्तीसाठी रिमझिम पावसाचा अडथळा

लातूर : मांजरा प्रकल्पामध्ये पाणीसाठा मुबलक असताना या ना त्या कारणाने शहराचा पाणीपुरवठ्यात वारंवार अडथळा येण्याच्या घटना घडत आहेत. वर्षभरात किमान आठ-दहा वेळा तरी वेगवेगळ्या कारणांमुळे पाणीपुरवठ्यात व्यत्य आला होता. सध्या हरंगुळ रेल्वे स्टेशन परिसरात केबल वायरची समस्या निर्माण झाल्याने शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. रिमझिम पावसामुळे दुरुस्तीलाही अडथळा आला असून पर्यायी व्यवस्था करून वीजपुरवठा केल्याने शुद्धीकरण सुरू झाले आहे. मात्र या अडथळ्यामुळे शहरातील प्रत्येक भागाचा पाणीपुरवठा दोन दिवसांनी पुढे गेला आहे.

हरंगुळ रेल्वे स्थानक परिसरामध्ये केबल वायर सतत जळत आहे. त्यामुळे पाणी पुरवठ्यासाठी वियची समस्या आहे. केबल वायर टाकले की ते जळत आहे. परिणामी,शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला होता. दोन दिवस प्रयत्न करूनही दुरुस्ती झाली नाही. आता महावितरण कंपनीने पर्यायी व्यवस्था करून दिलेली आहे. मात्र ही व्यवस्था तात्पुरती आहे. मंगळवारी बिघाड झाला होता. दोन दिवस प्रयत्न केल्यानंतरही दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे बुधवारी पर्यायी व्यवस्था करून गुरुवारपासून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. मात्र वेळापत्रक कोलमडले आहे. प्रत्येक भागात दोन दिवसाने रोटेशन पुढे गेले आहे, अशी माहिती शहराचे पाणी वितरणाचे विभाग प्रमुख जलील शेख यांनी दिली.

प्रत्येक जलकुंभावरील रोटेशन बदलले....पाणीपुरवठा करण्यासाठी शहरात दहा जलकुंभ आहेत. या सर्व जलकुंभावरून पाणी सोडण्यासाठी वेळापत्रक आहे. कोणत्या भागात कोणत्या दिवशी पाणी सोडायचे याबाबतचे नियोजन असते. मात्र केबल वायरची समस्या झाल्याने इकडे वेळापत्रक कोलमडलेले आहे. शहरातील नागरिक पाणी का आले नाही याबाबत एकमेकांना विचारणा करत आहेत.

दररोज मांजरा प्रकल्पातून उचलले जाते ५० एमएलडी पाणी...शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी मांजरा प्रकल्पातून दररोज पन्नास एमएलडी पाणी उचलले जाते. लातूर येथील हरंगुळ जलशुद्धीकरण केंद्रावर शुद्धीकरण झाल्यानंतर जलकुंभ निहाय वितरण केले जाते. परंतु गेल्या दोन-तीन दिवसांपासून ज्या भागात पाणी सोडण्याचा दिवस होता. त्या भागातील नागरिकांना पाणी सुटण्याची वाट पाहावी लागत आहे.

शहरातील नागरिकांची गैरसोय..नळाला पाणी सुटण्याचा दिवस असल्यानंतर गृहणी, नागरिक भांडे धुवून, कोरडे करून वाट पाहत असतात. मात्र गुरूवारपासूनच नळाला पाणी आले नाही. त्यामुळे नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. शिवाय महानगरपालिकेकडून ही सूचना दिली नसल्यामुळे नळाला पाणी सुटण्याची वाट पाहू लागली.

टॅग्स :laturलातूरWaterपाणीMuncipal Corporationनगर पालिका