शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

लातूर शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पुन्हा कोलमडले

By हणमंत गायकवाड | Updated: July 31, 2023 16:45 IST

इलेक्ट्रिकल बिघाड दुरुस्तीसाठी रिमझिम पावसाचा अडथळा

लातूर : मांजरा प्रकल्पामध्ये पाणीसाठा मुबलक असताना या ना त्या कारणाने शहराचा पाणीपुरवठ्यात वारंवार अडथळा येण्याच्या घटना घडत आहेत. वर्षभरात किमान आठ-दहा वेळा तरी वेगवेगळ्या कारणांमुळे पाणीपुरवठ्यात व्यत्य आला होता. सध्या हरंगुळ रेल्वे स्टेशन परिसरात केबल वायरची समस्या निर्माण झाल्याने शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. रिमझिम पावसामुळे दुरुस्तीलाही अडथळा आला असून पर्यायी व्यवस्था करून वीजपुरवठा केल्याने शुद्धीकरण सुरू झाले आहे. मात्र या अडथळ्यामुळे शहरातील प्रत्येक भागाचा पाणीपुरवठा दोन दिवसांनी पुढे गेला आहे.

हरंगुळ रेल्वे स्थानक परिसरामध्ये केबल वायर सतत जळत आहे. त्यामुळे पाणी पुरवठ्यासाठी वियची समस्या आहे. केबल वायर टाकले की ते जळत आहे. परिणामी,शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला होता. दोन दिवस प्रयत्न करूनही दुरुस्ती झाली नाही. आता महावितरण कंपनीने पर्यायी व्यवस्था करून दिलेली आहे. मात्र ही व्यवस्था तात्पुरती आहे. मंगळवारी बिघाड झाला होता. दोन दिवस प्रयत्न केल्यानंतरही दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे बुधवारी पर्यायी व्यवस्था करून गुरुवारपासून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. मात्र वेळापत्रक कोलमडले आहे. प्रत्येक भागात दोन दिवसाने रोटेशन पुढे गेले आहे, अशी माहिती शहराचे पाणी वितरणाचे विभाग प्रमुख जलील शेख यांनी दिली.

प्रत्येक जलकुंभावरील रोटेशन बदलले....पाणीपुरवठा करण्यासाठी शहरात दहा जलकुंभ आहेत. या सर्व जलकुंभावरून पाणी सोडण्यासाठी वेळापत्रक आहे. कोणत्या भागात कोणत्या दिवशी पाणी सोडायचे याबाबतचे नियोजन असते. मात्र केबल वायरची समस्या झाल्याने इकडे वेळापत्रक कोलमडलेले आहे. शहरातील नागरिक पाणी का आले नाही याबाबत एकमेकांना विचारणा करत आहेत.

दररोज मांजरा प्रकल्पातून उचलले जाते ५० एमएलडी पाणी...शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी मांजरा प्रकल्पातून दररोज पन्नास एमएलडी पाणी उचलले जाते. लातूर येथील हरंगुळ जलशुद्धीकरण केंद्रावर शुद्धीकरण झाल्यानंतर जलकुंभ निहाय वितरण केले जाते. परंतु गेल्या दोन-तीन दिवसांपासून ज्या भागात पाणी सोडण्याचा दिवस होता. त्या भागातील नागरिकांना पाणी सुटण्याची वाट पाहावी लागत आहे.

शहरातील नागरिकांची गैरसोय..नळाला पाणी सुटण्याचा दिवस असल्यानंतर गृहणी, नागरिक भांडे धुवून, कोरडे करून वाट पाहत असतात. मात्र गुरूवारपासूनच नळाला पाणी आले नाही. त्यामुळे नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. शिवाय महानगरपालिकेकडून ही सूचना दिली नसल्यामुळे नळाला पाणी सुटण्याची वाट पाहू लागली.

टॅग्स :laturलातूरWaterपाणीMuncipal Corporationनगर पालिका